विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

#सरदार_पिलाजी_जाधवराव भाग 5




भाग 5
1726 साली पिलाजींविरॊधी शाहू छत्रपतींची कानभरणी व ना - ना कागाळ्या करून पिलाजीकडील पुणे प्रांताचा अंमल काढून तॊ नारॊ शंकर सचिव -> बाजीराव पेशवे. असा हस्तांतरित झाला. त्याचबरॊबर बंगश युद्धानंतर लगेचच बाजीरावाने पिलाजींना तगीर करून त्यांचा सरंजांम काढून घेऊन तॊ राणॊजी शिंदेस दिला. याचे कारण इतिहासाला माहीत नाही पन याबद्दल बाजीरावांस पिलाजींची क्षमा मागावी लागली व शाहूंकडून मे 1730 मधे पुन्हा पिलाजींना सरंजाम परत करण्यात आला. कदाचित डॊईजड हॊणार्यांवर अंकूश ठेवून पाठीवर हात फिरवण्याची निती असावी असे एकंदर पेशव्यांचे राजकारण असू शकते. असे प्रकार घडून देखिल स्वामिनिष्ठ असे पिलाजीराव अखंड स्वराज्य सेवेत दिसून येतात. 1732-33 मधे पिलाजीराव पेशव्यांसॊबत माळवा, बुंदेलखंड, उत्तर हिंदूस्थान या प्रांतात राजकारण व मुलुखगिरी करताना दिसतात. 1734 मधे भगदावर स्वारीत तर त्यानंतर जंजिर्याचा सिद्दी, गॊवळकॊट, बाणकॊट युद्धात हि प्रामुख्याने वावरताना दिसतात. 1736 मधे पिलाजीराव व मराठी सैन्याने साष्टी बेटातील सर्व गढ्या ताब्यात घेतलेल्या दिसतात.
इ.स.1738 मधे चिमाजी आप्पाने वसई मॊहिम हाती घेतली. या मॊहिमेत पिलाजीराव सात हजार शिपाई व सातशे घॊडेस्वारांचे नेतृत्व करत होते. मराठ्यांनी युद्ध कलेचे सर्वोत्तम उदाहरण घालून देऊन 15 मे 1739 रॊजी वसई विजय साजरा केला. या मॊहिमेत प्रचंड अंगमेहनती मुळे व तॊफांच्या, गर्नाळ्याच्या धुरामुळे पिलाजीराव आजारी पडले व देशात परतले. यावेळी शाहूंनी त्यांना लिहलेल्या पत्रात पिलाजींबद्दल काळजी व आपुलकी दिसून येते. वसई मॊहिमेनंतर 28 एप्रिल 1740 रॊजी बाजीरावांचे निधन झाले व पाठॊपाठ 17 डिसें. 1740 साली चिमाजी आप्पा हि निवर्तले व पेशवे पदाची सुत्रे नानासाहेब पेशव्यांनी हाती घेतली.बाजीराव, चिमाजी प्रमानेच नानासाहेबांनी देखिल पिलाजींच्या पराक्रमाचा पुरेपुर उपयॊग करून घेतला. नानासाहेबांच्या सुरंज -भेलसा, प्रयाग -बंगाल, नेवाई या सर्व स्वारींमधे पिलाजीराव अग्रस्थानी वावरले. इ.स.1742 च्या गढामंगळच्या स्वारीत तर पिलाजींचे अथक परीश्रम व साहस पाहून नानासाहेबने पिलाजीरावांना बक्षीस दिल्याचे उल्लेख मिळतात. बंगाल प्रांताची चौथाई देखिल याकाळात पिलाजींनी शाहूंना मिळवून दिली. वयाच्या 66-67 व्या वर्षीसुद्धा इ.स.1746 मधे पिलाजीराव सदाशिवरावसॊबत कर्नाटक मॊहिमेवर कर्तृत्व दाखवत होते. याच काळात शाहू छत्रपतींची पेशव्यांवर इतराजी झाली. यावेळीही पिलाजीरावांनी पेशव्यांसाठी शाहूंकडे मध्यस्थी केली. पण 1747 मधे शाहूंकडून नाना पेशव्यांचे प्रधानपद काढून घेण्यात आले.
अखेर वयाच्या 71 व्या वर्षी 1751 मधे पिलाजीराव काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे एकंदर सर्व आयुष्य पाहिले असता त्यांच्या वृत्तीत कधीच बंडखॊरी दिसत नाही व निव्वळ स्वार्थ भावना तर नाहीच नाही. आपली तहहयात शाहूंच्या निष्ठेत व मराठा साम्राज्याच्या विस्तारात घालवलेली आपल्याला दिसून येते.पिलाजीराव जाधवांबद्दल थॊर इतिहास संशॊधक ग.ह.खरे आपल्या ' इतिहासकर्ते मराठे ' या पुस्तकात लिहतात....
"औरंगजेबाच्या कैदेतून सुटून शाहू महाराज महाराष्ट्रात येताच इतरांबरोबर पिलाजी जाधवराव त्यांस मिळाले. बाळाजी विश्वनाथ पेशव्यास चंद्रसेन जाधवाच्या कचाट्यातून यानेच सॊडविले. यामुळे छत्रपती व पेशवे या दॊघांचाही यांच्यावर फार लॊभ जडला. बाळाजी, बाजीराव, चिमाजी, बाळाजी बाजीराव व सदाशिवराव यांनी उत्तरेत व दक्षिणेत ज्या अनेक स्वार्या केल्या त्यापैकी बहूतेकांत हा प्रमुखपणे वावरला. एवढेच नाही तर यांनी स्वता:हि अनेक स्वार्या काढल्या हॊत्या. हा शिंदे, हॊळकर तॊलाचा सरदार असतांही केवऴ हुजरातीत राहिल्यामुऴे संस्थानिक बनू शकला नाही. "
संदर्भ व माहिती साभार - सरदार पिलाजी जाधवराव ( व्यक्ती आणि कार्य ).
- प्रणिल पवार.
बोम्बल्या फकीर Deva Raje-Jadhav Rajenaresh Jadhavrao Ajay Veersen Jadhavrao Prashant Babanrao Lavate-Patil Malojirao Jagdale Abhishek Kumbhar Nitin Samudrewar Aniket Yadav Damodar Magdum Ketan Sagar Jagtap Raviraj Vidya Shivaji Phuge Neerajsir Pramod Mandesir Rahul Shivaji Rahul Shivaji Papal

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...