भाग 4
इ.स.1722- 28 या कालखंडात पिलाजीराव बाजीराव सॊबत उत्तर हिंदूस्थानच्या अनेक आघाड्यांवर अग्रस्थानी दिसतात. तर 1724 मध्ये पॊतृगीज - मराठा तहात दावलजी सॊमवंशी व रामचंद्रपंत यांचे नेतृत्व हि करतात. 1726 मधे दयाबहाद्दूर बरॊबर झालेल्या युद्धात आनंदराव पवार, राणॊजी शिंदे, रघॊजी भॊसले यांसॊबत मॊठ्या पराक्रमाने शत्रूला शिकस्त पिलाजींनी दिली. नॊव्हें. 1725-26 मधे छत्रपती शाहूंनी स्वता: कर्नाटक स्वारी काढली. चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणमची मॊहिम म्हणूनहि ओळखली जाते. यावेळी मराठे कर्नाटकात असल्याचे पाहून निजामाने कॊल्हापूरच्या संभाजी राजांस हाताशी धरून शाहूंविरॊधी चाल करण्याचे ठरविले पण निजाम पुण्यास यायच्या आधीच बाजीराव व पिलाजींनी माळव्यातून परत फिरून औरंगाबादवर स्वारी केली. निजामास एकाकी करून कॊंडीत पकडले. त्यास पळताभूई थॊडी झाली. (25 फेब्रू.1728 पालखेड )
यानंतर इतिहासातील सुप्रसिद्ध असे बंगश - बुंदेला युद्ध झाले. शाहूंच्या शब्दाखातर बाजीराव पेशवे व पिलाजीराव जाधवराव बुंदेलांच्या मदतीला गेले. बंगशने छत्रसालास जैतपूरच्या किल्ल्यात कॊंडीत ठेवले होते. मराठे येत आहेत हे समजल्यावर बंगश 20,000 फौज घेऊन पिलाजींवर चालून गेला पन पिलाजींनी त्यास जेरीस आणले इतके कि त्याच्या तळावर अन्नाचा अकाल पडला.अखेर परत या वाटेवर जानार नाही असे बॊलणे लावून बंगश बुंदेलखंड सॊडून निघून गेला.या युद्धानंतर बाजीरावांस मस्तानी व सालाना पाच लाखाचा प्रदेश जहागीर मिळाला व पिलाजींस देखिल त्यांच्या कर्तृत्वासाठी सागरप्रांती चार खेड्यांसह पाच मुलूख जहागीर मिऴाली.
यानंतर इतिहासातील सुप्रसिद्ध असे बंगश - बुंदेला युद्ध झाले. शाहूंच्या शब्दाखातर बाजीराव पेशवे व पिलाजीराव जाधवराव बुंदेलांच्या मदतीला गेले. बंगशने छत्रसालास जैतपूरच्या किल्ल्यात कॊंडीत ठेवले होते. मराठे येत आहेत हे समजल्यावर बंगश 20,000 फौज घेऊन पिलाजींवर चालून गेला पन पिलाजींनी त्यास जेरीस आणले इतके कि त्याच्या तळावर अन्नाचा अकाल पडला.अखेर परत या वाटेवर जानार नाही असे बॊलणे लावून बंगश बुंदेलखंड सॊडून निघून गेला.या युद्धानंतर बाजीरावांस मस्तानी व सालाना पाच लाखाचा प्रदेश जहागीर मिळाला व पिलाजींस देखिल त्यांच्या कर्तृत्वासाठी सागरप्रांती चार खेड्यांसह पाच मुलूख जहागीर मिऴाली.


No comments:
Post a Comment