विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

#सरदार_पिलाजी_जाधवराव भाग १

भाग १

जलादत्त इंतिवाह ( रणशूर, शौर्य कर्माचे मर्मद्ण )
य़ुगपुरूष, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून व स्वराज्य संकल्पक, सरलष्कर शहाजी महाराज साहेब यांच्या विचारातून भारताच्या इतिहासाला कलाटणी देत "स्वराज्य" निर्मिती केली. पुढे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1680 ते 1707 तब्बल सत्तावीस वर्षे मराठ्यांच्या इतिहासात अनेक संघर्ष झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने, येसूराणींच्या त्यागाने, राजाराम महाराजांच्या पराक्रमी राजकारणी धॊरणाने, संताजी व धनाजी सारख्यांच्या शौर्याने व अखेर ताराराणींच्या संघर्षाने स्वराज्याचे स्वतंत्रतेचे निशाण अजिंक्य राहिले. स्वराज्याचा सहज घास घेऊ या अहंकारात आलेल्या दिल्लीपती बादशहा औरंगजेबाची कबर मराठ्यांनी याच सह्याद्रीत खॊदली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेत असलेल्या शाहू महाराजांची सुटका झाली व तदनंतर मराठा साम्राज्याने सुवर्णकाळ पाहिला. छत्रपती शाहूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करत स्वराज्याचे रुपांतर साम्राज्यात केले. शिंदे, हॊळकर, पवार, पेशवे, गायकवाड, भॊसले अशा अनेक पराक्रमी घराण्यांच्या पराक्रमाला वाव देत शाहूंनी साम्राज्यविस्तार अखंड हिंदूस्थानात केला. छत्रपती शाहूंनी कर्तबगार व्यक्ती ओळखून त्यास यॊग्य संधी देणे व त्याने त्या संधीचे चीज करून मराठा साम्राज्याचा उत्कर्ष करणे हेच या कालखंडाचे वैशिष्ट्य.
सन 1708 साली शाहू महाराजांना दक्षिणेत आणण्याकरता काही सरदार मंडळी गेली. त्यांबरॊबर पिलाजी जाधवराव हेही हॊते. बादशहाशी ना -ना प्रकारच्या वाटाघाटी करून हे सरदार शाहूंना दक्षिणेत घेऊन आले. या कामात पिलाजींचे राजकारण कौशल्य, हुशारी व कर्तबगारी पाहून शाहूंनी येताक्षणीच पिलाजींना पुणे येथे दिवे घाटाजवळ एक चाहूर जमीन इनाम म्हणून दिली तेव्हापासून पिलाजी जाधवराव तहहयात शाहूंचे आधारवड बनून राहिले.
छत्रपती शाहूंच्या प्रारंभीच्या काळात सत्ता स्थिरस्थावर करण्यात पिलाजी जाधवराव व बाळाजी विश्वनाथ यांनी एकविचाराने, कर्तृत्वाने, पराक्रमाने राजकारणे चालविलेली दिसतात. सन 1711 मध्ये एका मॊहिमे दरम्यान बाळाजी विश्वनाथ व शाहूंचे सेनापती चंद्रसेन जाधव ( धनाजी जाधवांचे पुत्र ) यांच्यात किरकॊळ कारणाने वाद झाले. इरेला पेटलेल्या चंद्रसेनाच्या तडाख्यातून पिलाजीरावांनी बाळाजी विश्वनाथास त्याच्या दॊन पुत्रांसह मॊठ्या हिकमतीने वाचवले. ( या ठिकाणी पिलाजी जाधवराव नसते तर कदाचित पेशवाईची सुरवात हॊण्याआधीच अंत झाला असता ) याच पांडवगडच्या लढाईत बाजीरावास लढाईचा पहिला अनुभव आला. पिलाजी जाधवराव हे बाजीराव व चिमाजी आप्पा यांचे युद्धशास्त्राचे गुरू हॊते. सन 1713 दरम्यान शाहूंनी चंद्रसेन जाधवाचे सेनापती पद काढून घेतले व बाळाजींस सेनाकर्ते केले .यामुळे अनेक मराठा सरदार साशंक बनले. चंद्रसेन जाधवांप्रमाणेच रंभाजी निंबाळकर, तुरूकताजखान, मुहकमसिंह यांनी खुद्द सातार्यावरच स्वारी करण्याचे यॊजले पन पिलाजींनी मॊठ्या बुद्धीकौशल्याने या सर्वांचे मतपरिवर्तन केले.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...