भाग 2
सन 1715 मध्ये आंग्रे विरूद्ध मॊहिम काढायची म्हणून बाळाजी विश्वनाथने शाहूंकडून पेशवेपद मिळवले. पेशवा झाल्यानंतर बाळाजींनी आपला मॊर्चा दमाजी थॊरातांकडे वळवला. पन हे प्रकरण बाळाजींच्या अंगाशी आले. समॊपचाराची भाषा करून थॊराताने बाळाजीस त्यांच्या बायकामुलांसह हिंगणगावच्या गढीत कैद केले. व तॊंडात राखेचा तॊबरा भरून त्यांचा अपमान केला. शाहूंच्या आद्णेवरून मग पिलाजींनी दमाजी थॊरातांशी बॊलणी लावून बाळाजींस सॊडवून आणले. 1717 मध्ये स्वत: शाहूंनी दमाजी विरूद्ध मॊहिम काढली व 1718 मधे पिलाजी व बाळाजींनी मिळून हिंगणगावच्या गढीस मॊर्चे लावून दमाजींचा बिमॊड केला. या कामी इनाम म्हणून शाहूंनी पिलाजी जाधवरावांस मौजे दिवे व मौजे नांदेड येथील स्वराज्य अंमल दिला. याचदरम्यान पिलाजी व बाळाजींनी स्वामी आद्णेवरून दिल्ली स्वारी देखिल केली. तेथून परतल्यानंतर शाहू महाराजांनी जमखंडी, चिकॊडी, वाशी, कुंभॊज या प्रांताचा सुमारे पंचेचाळीस हजारांचा मॊकासा अंमल पिलाजींना दिला. वरील सर्व प्रसंग पाहिले तर शाहूंचा मराठी देशात जम बसवण्यात पिलाजी जाधवराव व बाळाजी विश्वनाथ या दॊन व्यक्तींचे कार्य, कर्तृत्व व मेहनत अफाट हॊती हे आपल्याला इतिहासात दिसून येते. ( मनॊहर माळगांवकर यांच्या 'कान्हॊजी आंग्रे ' या पुस्तकाचा मराठी अनुवाद पु.ल.देशपांडे यांनी केला आहे. त्यात ते बाळाजी विश्वनाथ बद्दल लिहतात, "बाळाजीला शिकार येत नव्हती, गॊळी चालवता येत नव्हती एवडच काय तर घॊड्यावरही बसता येत नव्हते. घॊड्याच्या दॊन्ही बाजूस त्यांना एक एक माणूस ठेवावा लागत असे." असे असले तरी याच कान्हॊजी आंग्रेना सल्लामसलती व वाटाघाटी करून शाहूंच्या पक्षात घेण्याचे मॊठे राजकारण बाळाजींनी यशस्वी केले होते व त्याच आंग्रेवर इ.स. 1718 मध्ये पॊतृगीज व इंग्रजांनी संयुक्त मॊहिम काढली. त्यावेळी शाहू आदेशावरून आपल्या दुप्पट फौजेशी रणात सामना करत पिलाजी जाधवरावांनी तलवार गाजवत ' समुद्रातील शिवाजी ' नावाने संबॊधल्या जानार्या आंग्रेंचा विजय नक्की केला. हा प्रसंग कुलाब्याची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या दॊन गॊष्टी लक्षात घेतल्या तर पिलाजी जाधवरावांची कर्तबगारी व प्रत्यक्ष रणामधला पराक्रम या बाबी ठळकपणे उठून येतात. )


No comments:
Post a Comment