#प्रजापतिपालक
रायगडावर राजधानीच्या दृष्टीने अनेक बांधकामे सुरू झाली. हळूहळू पूर्ण होत गेली. त्याचवेळी रायगडच्या डोंगरवाटेवर निम्म्यावरती पाचाड येथे विशाल सपाटी पाहून महाराजांनी छान राजवाडा बांधला. वाड्याच्या भोवती चिरेबंद बुरुज आणि दोन भव्य दरवाजेही बांधले. पाचाड हे एक छोटेसे कोकणी खेडेगाव , या राजवाड्याच्या अगदी जवळच आहे. पाचाडातील लोकवस्ती शेतकऱ्यांची त्यात अनेक जातीजमातींची घरं , हा पाचाडचा वाडा महाराजांनी आपल्या आईकरिता बांधला. या वाड्याला आज जिजाऊसाहेबांचा वाडा असेच म्हणतात. आता हा पडून मोडून पडला आहे. तरीही त्याच्यावर सारेजण आदरपूर्वक प्रेम करतात. पाऊस काळात आणि थंडीत रायगडाच्या ऐन माथ्यावर हवा फार गारठ्याची असते. म्हणून या काळात आऊसाहेबांना मुक्कामाला हा वाडा सोईचा असे. महाराजही राहात.
इथं वाड्यात सर्व प्रकारच्या सोई महाराजांनी केल्या. त्यात एक विहीर चिरेबंदी बांधली. छोटीशीच. पण देखणी. पाचाडमधल्या गावकऱ्यांनाही पाणी न्यायला वापरायला ही विहीर मुक्त होती. या विहिरीच्या काठावर खेटूनच एक लहानसा चिरेबंदी ओटा बांधलेला आहे. त्यावर टेकून बसायला एक सुबक तक्क्याही बांधलेला आहे. तक्क्या अर्थात अखंड एका दगडाचाच. महाराज जेव्हा जेव्हा पाचाडला मुक्कामला असत , तेव्हा तेव्हा कधी सकाळी तर कधी मावळतेवेळी ते इथं या विहिरीवर तक्क्याशी बसत. गावातल्या आयाबाया पाणी भरायला विहीरीवर येत. कोणा कोणा बायांच्या संगतीला त्यांची लहानगी मुलं बोट धरून येत. महाराजांना ते फार आवडे. ते त्या लेकीसुनांची अतिशय आस्थेनं चौकशी , विचारपूस करीत. त्यांच्या लहानग्या पोरांना महाराज जवळ घेत आणि त्यांना काही खाऊ देत. हे महाराजांचं मायेचं वागणं औरंगजेबाच्या दरबारातील मोहम्मद हाशीम खाफीखान या तवारीखनवीसाला समजलं. त्याला नवल वाटलं. प्रजेतल्या बायकामुलांना हा राजा आपल्याच कुटुंबातल्या माणसांसारखं वागवितो याची त्याला मोठी कौतुकानं गंमत वाटली.
इथं एक गोष्ट सहज मनात येते की , या तक्क्याच्या विहिरीवर पाणी भरायला येणारी सारी माणसं विविध जातींची असत. त्यांनाही हे राजमातेच्या राजवाड्यातील पाणी , वाड्यात येऊन , विहिरीवर भरता येत होतं. अधिक काय लिहिणे ?
#शिवरायांच्या_तळ्यात
#पाणी_पिती_सर्व_जाती,
#तेथे_नाही_भेदभाव...
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩
रायगडावर राजधानीच्या दृष्टीने अनेक बांधकामे सुरू झाली. हळूहळू पूर्ण होत गेली. त्याचवेळी रायगडच्या डोंगरवाटेवर निम्म्यावरती पाचाड येथे विशाल सपाटी पाहून महाराजांनी छान राजवाडा बांधला. वाड्याच्या भोवती चिरेबंद बुरुज आणि दोन भव्य दरवाजेही बांधले. पाचाड हे एक छोटेसे कोकणी खेडेगाव , या राजवाड्याच्या अगदी जवळच आहे. पाचाडातील लोकवस्ती शेतकऱ्यांची त्यात अनेक जातीजमातींची घरं , हा पाचाडचा वाडा महाराजांनी आपल्या आईकरिता बांधला. या वाड्याला आज जिजाऊसाहेबांचा वाडा असेच म्हणतात. आता हा पडून मोडून पडला आहे. तरीही त्याच्यावर सारेजण आदरपूर्वक प्रेम करतात. पाऊस काळात आणि थंडीत रायगडाच्या ऐन माथ्यावर हवा फार गारठ्याची असते. म्हणून या काळात आऊसाहेबांना मुक्कामाला हा वाडा सोईचा असे. महाराजही राहात.
इथं वाड्यात सर्व प्रकारच्या सोई महाराजांनी केल्या. त्यात एक विहीर चिरेबंदी बांधली. छोटीशीच. पण देखणी. पाचाडमधल्या गावकऱ्यांनाही पाणी न्यायला वापरायला ही विहीर मुक्त होती. या विहिरीच्या काठावर खेटूनच एक लहानसा चिरेबंदी ओटा बांधलेला आहे. त्यावर टेकून बसायला एक सुबक तक्क्याही बांधलेला आहे. तक्क्या अर्थात अखंड एका दगडाचाच. महाराज जेव्हा जेव्हा पाचाडला मुक्कामला असत , तेव्हा तेव्हा कधी सकाळी तर कधी मावळतेवेळी ते इथं या विहिरीवर तक्क्याशी बसत. गावातल्या आयाबाया पाणी भरायला विहीरीवर येत. कोणा कोणा बायांच्या संगतीला त्यांची लहानगी मुलं बोट धरून येत. महाराजांना ते फार आवडे. ते त्या लेकीसुनांची अतिशय आस्थेनं चौकशी , विचारपूस करीत. त्यांच्या लहानग्या पोरांना महाराज जवळ घेत आणि त्यांना काही खाऊ देत. हे महाराजांचं मायेचं वागणं औरंगजेबाच्या दरबारातील मोहम्मद हाशीम खाफीखान या तवारीखनवीसाला समजलं. त्याला नवल वाटलं. प्रजेतल्या बायकामुलांना हा राजा आपल्याच कुटुंबातल्या माणसांसारखं वागवितो याची त्याला मोठी कौतुकानं गंमत वाटली.
इथं एक गोष्ट सहज मनात येते की , या तक्क्याच्या विहिरीवर पाणी भरायला येणारी सारी माणसं विविध जातींची असत. त्यांनाही हे राजमातेच्या राजवाड्यातील पाणी , वाड्यात येऊन , विहिरीवर भरता येत होतं. अधिक काय लिहिणे ?
#शिवरायांच्या_तळ्यात
#पाणी_पिती_सर्व_जाती,
#तेथे_नाही_भेदभाव...
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

No comments:
Post a Comment