विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 30 May 2020

शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांचा अपरिचित इतिहास

मालोजीराजे यांचे पूर्ण नाव मालोजीराजे बाबाजीराजे भोसले. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस मराठ्यांच्या इतिहासात भोसले घराणं सत्ताधीश झालं आणि वात्सल्यरूपी दबदबा महाराष्ट्राच्या इतिहासात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण केला. भोसले घराण्याची ओळख होते ती बाबाजीराजे भोसले. बाबाजीराजे यांना  दोन पुत्र रत्न होते मालोजीराजे आणि विठोजीराजे. मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा.

मालोजीराजे यांनी आपल्या कर्तृत्वावर खानदेश आणि आसपासच्या परिसरात दबदबा निर्माण केला होता. त्यांचा जन्म इ.स. १५५२ साली  वेरूळ येथे झाला. मालोजीराजे यांचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.  त्यांना शरीफजीराजे भोसले, आणि शहाजीराजे भोसले असे पुत्ररत्न प्राप्त झाले.

मालोजीराजे यांच्या पराक्रमाची सुरुवात होते ते १५८८ साली झालेल्या एका युद्धात निजामशाही च्या वंगोपाळ निंबाळकर हे जमालखानाच्या बाजूने आदिलशाही च्या विरोधात उभे होते.

आपल्या पराक्रमाची शर्थ दाखवण्यासाठी मालोजीराजे आपले बंधू विठोजीराजे यांच्या सह वंगोपाळ यांच्या सोबत कोल्हापूर येथे आदिलशाहाला रोखण्यासाठी आले. या लढाईत घनघोर युद्ध झालं मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर आदिलशाही फौजेचा अक्षरशः बिमोड केला. आदिलशाही सैन्याला रिकाम्या हाती परतावे लागले. वंगोपाळ यांच्या सैन्यात दोन्ही बंधूंच्या पराक्रमाने वाहवा मिळवली. 

मालोजीराजे यांचं या युध्दाबाबत वर्णन करताना कवींद्र म्हणतात, “याच समयी देवगिरी येथे राहून धर्मनिष्ठ निजामशहा पृथ्वीवर राज्य करत होता, निजामशाही आणि आदिलशाही यावंनांनी लढा पडला तेंव्हा बुद्धिमान निजामशहा ने मालोजीराजे हा शत्रूंचा कर्दनकाळ आहे असे ऐकूण त्यास मदतीस बोलाविले आणि अद्वितीय तेजस्वी मालोजी देवगिरीस येऊन राहिला त्याचा भिमाप्रमाणे भाऊ विठोजी आपल्या सैन्यासह निजामास येऊन मिळाला आणि उभयतां बंधूंच्या आगमनाने संतुष्ट निजामाने राजेंना गौरविले. 

मालोजीराजे आणि विठोजीराजे यांचा पराक्रम पाहून निजामाने दीड हजारी सरंजामी सह जुन्नर शिवनेरी प्रांत दिला. १५८८ ते १५९२ पर्यंत च्या काळात मालोजीराजे यांनी निजामशाही मध्ये राहून आपला पराक्रम दाखवत राहिले. दीड हजारी सरंजामी वरून पंच हजारी झाली त्या सोबत त्यांना सुपा परगण्याची सरंजामी देखील बहाल केली या सोबतच बुऱ्हाणपूर हुन खाजगी देणग्या ही येत असे.

मालोजीराजे यांचा खूप मोठा विश्वास निजामाने संपादन केला. त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजीराव रणक्षेत्रावर मरण पावले व भोसले घराण्यातील वीरतेचे ’पहिले स्मारक’ मालोजीची छ्त्रीरूपाने इंदापूरभूमीवर स्थापन झाले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...