विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 30 May 2020

इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिलेली कोल्हापूर ची लढाई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम जर पाहिला तर खरोखरच जगाला हेवा वाटेल असाच पराक्रम त्यांनी गाजवला. मुघल, आदिलशाही, निजाम, पोर्तुगीज, फ्रेंच किंवा मग इंग्रज असो यांना शेवटपर्यंत थोपवण्यासाठी मराठ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. फक्त परकीय आक्रमक यांच्या विरुध्द च नाही तर स्वराज्याची अस्मिता सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मराठ्यांनी अक्षरशः आपल्या प्राणांची बाजी लावली.

मराठ्यांचा इतिहास तर अश्या लढाया भरपूर झाल्या आहेत. आज आम्ही अश्याच एका लढाई बद्दल माहिती घेऊन आलो आहोत ज्या लढाईत आपल्या निवडक शिलेदार दहा हजार आदिलशाही सैनिकांवर भारी पडले. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करून मराठा साम्राज्याची ताकद दाखवून दिली.

प्रतापगडचं युद्ध जिंकून देखील छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले नव्हते त्याची मोहीम चालूच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड वरून कोल्हापूर पर्यंत चा सर्व मुलुख स्वराज्यामध्ये सामावून घेण्याचं ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही योजना रोखण्यासाठी आदिलशाहाने रुस्तमजमान या त्याच्या विश्वासू सरदाराला दहा हजाराची मोठी फौज, घोडदळ आणि दारूगोळ्याच्या सोबतच तोफा घेऊन पाठवलं.

नुकत्याच झालेल्या अफझलखान वधामुळे रुस्तमजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीला जाणून होता म्हणून त्याने येतानाच मोठा फौज फाटा सोबत घेऊन येत होता.

तगड्या फौजेसोबत त्याने संताजी घाडगे, फाजल खान, मलिक इतबर, हसन खान आणि याकूब खान यांसारख्या लढाऊ सरदार देखील त्याच्या सोबत होते. तर मराठ्यांचे नेतृत्व खुद्द छत्रपती शिवाजी महाराज करत होते. यात त्यांना मोलाची साथ दिली ती नेताजी पालकर, भिमाजी वाघ, सरदार गोदाजी जगताप, तसेच हिरोजी इंगळे यासारख्या लढवय्या सरदारांनी आणि मावळ्यांनी. दोन्ही फौजा समोरासमोर आल्या ती तारीख होती २८ डिसेंबर १६५९.

रुस्तमजमान हा युध्द शास्त्रात तरबेज असावा कारण युद्धभूमीवर त्याने सुरवातीला हत्ती त्यामागे त्याचे सैनिक अशी तयारी त्यांनी केली होती सुरवातीला हत्ती असल्याने मराठ्यांनी आक्रमक पणा केला तरी हत्तींमुळे मराठे लवकर थकतील त्यामुळे आपल्या ताज्या दमाच्या सैनिकांच्या पुढे मराठा सैनिक फार काळ टिकाव धरू शकणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जी योजना आखली त्याप्रमाणे युद्ध सुरू झालं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज युद्धात असल्याने जशी मोहीम आखली त्या पद्धतीने युद्धाची सुरुवात झाली. योजने प्रमाणेच मराठ्यांची तलवार वीज कडकावी तशी तळपत होती. बघता बघता मराठे आदिलशाही च्या सैनिकांवर सपासप वार करत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक ज्या पद्धतीने लढत होते हे पाहून आदिलशाहाचे कित्येक सैनिक घाबरून पळून जात होते तर काही शरण येत होते. त्यांचा मुख्य सेनापती रुस्तमजमानच युद्धभूमीवरून पळून गेला.

छत्रपती शिवरायांनी लढाई जिंकली. सोबतच रुस्तमजमान सोबत घेऊन आलेला दारुगोळा, सोन नाणं, हत्ती घोडे तसेच टाकून गेल्याने हा सारा मुद्देमाल स्वराज्यात आला होता. कोल्हापूर च्या या लढाई मुळे स्वराज्याचा विस्तार आणि छत्रपती शिवरायांच्या नावाचा डंका आदिलशाहच्या दरबारापर्यंत पोहोचला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...