विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 June 2020

मातोश्री पुतळाराणीसाहेब


मातोश्री पुतळाराणीसाहेब
( जन्म : अज्ञात - मृत्यू : २७ जून १६८० )

पुतळा मातोश्री या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत. पालकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. १६५३ रोजी पुतळा बाईंचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत विवाह झाला होता.पुतळाबाई राणीसाहेब या एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजेंच्याबरोबर राहिल्या.शिवाजी महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठेच योगदान होते.सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना एकच आधार वाटत होता ,तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळा बाई राणीसाहेब यांचा.

पुतळा राणीसाहेब यांनी संभाजी महाराजांना आपल्या पोटच्या मुलासारखे जपले,वाढवले.संभाजी राजांच्या वरती संस्कार करत असताना त्यांच्या कडून कोणतीही चूक होणार नाही, याची त्या काळजी घेत असत.पुतळा बाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ, भावनिक, मायाळू आणि छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणार्या राणीसाहेब होत्या.आयुष्यात राजांना या राणीसाहेबांचा खुपच आधार होता.राजांनी कित्येक वेळा आपली व्यथा या राणीसाहेबांच्याकडे कथित केली होती.

अवघे आयुष्य राणीसाहेब यांनी राजांच्या नुसत्या चरणांकडे पाहून व्यथित केले होते.आजूबाजूच्या शंभूराजे यांच्या विरुध्दच्या कारवाया पाहून त्या हतबल होत ,परंतु शंभूराजे यांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही. संभाजी महाराज यांना आपल्या आई आठवत नव्हत्या. जिजाऊ साहेबांच्या नंतर शंभूराजे यांच्यावर खरे प्रेम कोणी केले असेल तर पुतळा बाई राणीसाहेब यांनी.राजांच्या मृत्यूनंतर पुतळा बाई राणीसाहेब शिवरायांचे जोडे घेऊन सती जायला निघाल्या.

त्यावेळी शंभूराजे यांच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले होते. कंठ दाटून आला. शंभुराजे म्हणतात, आईसाहेब तुम्ही जाऊ नका. आमची अशीच माणसा उरली नाहीत तुम्ही राहीलात तर जगण्याला आम्हाच्या बळ येईल.आम्ही शंभूदेवांची शपथ घेऊन सांगतो ,ज्या निष्ठेने आबासाहेब मासाहेबांकडे पाहात होते ,त्याच निष्ठेने आम्ही राहू .तुमच्याविना आम्ही या जगात एकटे होऊ...." छत्रपतींच्या निधनानंतर रायगडावर अनेक घडामोडी घडत गेल्या.

संभाजी महाराज अनेक संकटांवर मात करतात न करतात तोच शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई ‘सती’ जाणार असं म्हटल्यावर अंगावर सरसरून काटा उभा राहिला. महाराजांच्या निधनानंतर रायगड जरा कुठे सावरतोय तोच हे संकट पुढे येऊन ठेपलेले. पुतळा मातोंश्रींचा सती जाण्याचा हा निर्णय कुणालाही मान्य नव्हता. संभाजी राजांनी पुतळाबाई राणीसाहेबांच्या पायावर मस्तक ठेवले. अश्रुंनी पुतळा राणीसाहेब यांचे पाय भिजत होते.पुतळा बाई राणीसाहेब यांनी शंभूराजे यांना आशिर्वाद दिला .त्या म्हणाल्या मी जाते म्हणून वाईट वाटून घेऊ नका. मरण चुकवू म्हणून चुकत नाही - मृत्यू अटळ आहे. मी कधी मरणाचा विचार केला नाही. मला कधी त्याच भयही वाटले नाही. तुम्हालाही मृत्यूचे भय कधी वाटू नये ,हा माझा आशिर्वाद आहे....."
राजांचे जोडे उराशी कवटाळून त्यावरील नजर न ढळू देता श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या
🚩जय जिजाऊ, जय शिवराय 🚩

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...