दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला.
या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला
मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता.
कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता म्हणून ही
सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होते रामजी पांगेरा.
हा रामजी विलक्षण शूर होते. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या
सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. त्यांनी
पराक्रमाची शर्थ केली. तेच हे रामजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होते.
एक
दिवस दिवसाउजेडी त्यांना हेरांनी खबर दिली की, औरंगजेबाचा खासा सरदार
दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज
खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या
आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच
आपल्या कण्हेरा गडावर
जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि
निर्धास्त ठरले असते. पण रामजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. ते
आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभे राहीले. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून
येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला
समजलेच होते. रामजी आपल्या
लोकांच्या पुढे उभे राहिले आणि मोठ्या आवेशात ते गरजले, "मर्दांनो , खानाशी
झुंजायचंय, जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ) ते
येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी"
असे बोलून रामजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे
मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला.
साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले.
मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट
करू लागले. अन् दिलेरखान आलाच. वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने
दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडे
आठवले. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामजीचा आवेश दारूच्या
कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले.
दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामजी पांगेरा दाखवून दिले की,
मराठीयांची पोरे आम्ही,
भिणार नाही मरणाला.
चिमूटभरांनी पराभव
केला परातभरांचा
कण्हेरा गड सुरक्षित होता . दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती.
नमन या वाघाच काळीज असलेल्या आणि इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या शूरवीराला.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday 29 July 2020
शूरवीर रामजी पांगेरा
गनिमीकावा - GanimiKava
शूरवीर रामजी पांगेरा
Subscribe to:
Post Comments (Atom)
सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा
सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
-
वतनदार, जहागीरदार, जमीनदार, बलुतेदार माणूस वस्त्याच्या रूपाने एकत्रित येऊन स्थिर झाला. त्यातून वाड्या, गावे यांची निर्मिती झाली. त्यातून ...
No comments:
Post a Comment