विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 29 July 2020

गनिमीकावा - GanimiKava

गनिमीकावा - GanimiKava

*नरवीर तानाजी मालुसरे*

*तानाजी हे* शिवाजी महाराजांचे बालपणाचे सवंगडी होते. त्यांनी स्वराज्य *स्थापनेच्या जडणघडणीमध्ये* *त्यांचा* *अतिशय मोलाचा* *वाटा होता*

स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. जेव्हा तानाजींना *ही* जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम *प्राधान्याने* घेऊन ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. *आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे* हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.

रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या *शत्रू सैन्याला* कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.
दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना *तानाजीचा असामान्य पराक्रम समजला..* महाराज म्हणाले *"गड आला पण सिंह गेला".*

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...