विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 26 August 2020

सर्वोभौम भारतवर्ष मराठा सम्राट छत्रपती शाहुजीराजे

 


सर्वोभौम भारतवर्ष मराठा सम्राट छत्रपती शाहुजीराजे
छत्रपती संभाजी महाराजानंतर मराठा स्वराज्या विस्तारक छत्रपती शाहू महाराज आसेपर्यंत कोणालाही छत्रपतीविरुध्द कारस्थान करण्याचे धाडस झाले नाही.छत्रपती शाहू महाराजांनी अखंड मराठा सम्राज्यावर नियंत्रन मिळवले.
१७१८ मधे शाहू महाराजांनी ३५ हजार मराठा सैनिक घेऊण सरसेनापती खंडेराव दाभाडे यांना दिल्ली मोहिमेवर पाठवले,सर्व नियोजन केले.मुघलाकडील हसन आपल्याकडे वळवले.तत्कालीन बादशाहा फारुखशयर याने हुद्दाम वागणूक दाखवली.त्यामुळे शाहूनीतीप्रमाने बादशाहा फारुखशायरचा दरबारातच हसन बंधूकडून कत्ल केले गेले.मराठ्याच्या मर्जीतील बादशाह दिल्लीच्या तख्तावर शंभूपुत्र शाहूराजेनी बसवला,आपल्या मर्जीप्रमाने तह करुण घेतले,आपला संपूर्ण परिवाराची शाहूछत्रपतींनी सुटका करवून घेतली, दिल्ली मराठ्याची मांडलिक झाली,बादशाहाला सुरक्षा मराठ्यानी दिली .'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' ही म्हण खऱ्या अर्थानी नावारुपाला आली असे म्हणले तर अतिशयोक्ति होणार नाही.
या संपूर्ण घटनाक्रमामधे काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.दिल्लीसारख्या मोठ्या मोहिमेचे नियोजन स्वत: शाहू महाराजांनी केले होते.दिल्ली मोहिमेचे नेतृत्व सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्याकडे देण्यात आले होते.सरसेनापती खंडेराव दाभाडे हे पहिले मराठा सेनानी दिल्लीवर चाल करुण जाणारे होत.दूसरी महत्वाची घटना सर्व अगदी शाहू महाराजांच्या मर्जीप्रमाने झाल्यावर तहाचा कागद देऊण सरकारकून बालाजी विश्वनाथला पुढे पाठवले आणि नंतर मराठा सैनिकासह खंडेराव दाभाडे आले.येथे मात्र कागद घेऊण येणाऱ्याला सर्व श्रैय देऊण टाकण्यात येते,शाहूछत्रपतीना डावलण्यात येते.
१७१८ नंतर शाहूछत्रपतीवर कसलाही मुघलाचा दबाव राहिलेला नव्हता मुत्सद्देगीरी दाखवत त्यांनी दिल्लीचे तख्तच मांडलिक केले होते.सर्व छत्रपती परिवाराची सुटका केली होती त्यामुळे पुढील काळात रायगड मोहिम वारना तह यासारख्या अभूतपूर्व मोहिमा ईतरही अनेक मोहिमा केल्या.मराठा स्वराज्याचा भगवा भारतभर फडकवला.
अखंड भारतावर ४२ वर्ष राज्या केले.शाहूछत्रपतीची प्रशासकिय व्यवस्था खुप महत्वपुर्ण होती,मराठा प्रशासकीय व्यवस्था आणि मुगली प्रशासकीय व्यवस्थाचा एकत्रीत प्रभाव त्यामधे होता.त्यानूसार त्यांनी मुत्सद्देगीरीच्या जोरावर भारतावर नियंत्रन मिळवले होते.१०० मईलाच्या आंतरावर एक एक मराठा गढी होती तर उत्तरेकडे सुभेदार शिंदे ,होळकर,पवार सारखे अभेद्या भुरुज बसवले होते.पुर्वेकडे सेनासाहेब सुभा रघोजी भोसले सारखा ५० हजाराची मनसब आसलेला महापराक्रमी महाप्रतापी साक्षात तांडव करणार शिव होता.पुर्वेकडे रघोजी भोसलेनी बंगालपर्यंत शाहूछत्रपतीच्या नेतृत्वाखाली मराठ्याची घोडदौड केली.
मराठा आरमार सरखेल आंग्रे यांनी शाहूकाळात उत्तमप्रकारे वाढवले समुद्रावर मराठ्याचे वर्चस्व कायम राखले.गुजरातकडे सरसेनापती दाभाडे आणि गायकवाड यांनी शाहूछत्रपतीच्या नियंत्रनाखाली आनले.शाहू महाराज प्रतेक मोहिमावरील माहिती घेत त्यानूसार गरज पडेल तेथे हूजूराती फौजा सरसेनापती,प्रतिनिधी,प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पाठवत.
१७-१८ शतकात शाहूछत्रपती भारतवर्षाचे हिंदूनृपती झाले होते.त्यांनी अजातशत्रू वृत्तीने कार्य केले.सातारा राजधानीतून भारताचा कारभार पाहिला.भारताची राजधानी म्हणुन व्यापर वृध्दि,आनेक सावकाराना सातार्यात बोलवून,लोकहिताची कामे करुण साताऱ्याला वैभव प्रप्त करुण दिले.
छत्रपती संभाजी महाराजानंतर मराठ्याची नीति बदलली होती.मुघलाकडील जिंकलेला प्रदेश सरंजाम म्हणुण देण्याची पध्दत सुरु झाली होती.सरदेशमुखी आधिकार छत्रपतीकडे होता.मराठा सम्राज्या राजारामकाळात वाढू लागले होते.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर त्याचा वेग वाढला.त्यामुळे छत्रपतीना मोहिमेवर जाण्याचा गरज पडत नसे.शाहूछत्रपतीच्या हाताखाली लहान मोठ्या ५०० च्या आसपास सेनापती,सरदार,सरकारकून होते.तरी शाहूछत्रपती काही मोहिमेवर जातीने हजर होते तर काही मुख्य मोहिमाचे त्यांनी स्वत: नियोजन केले होते.त्यामधे दिल्ली मोहिम,रायगड मोहिम आणि वारणेच्या तहावेळच्या वारणेची मोहिम होय.
छत्रपती शाहू महाराज म्हटलं कि आजही बहुसंख्यक लोकांना माहिती नाही.बहुसंख्यक लोकांना कोल्हापुरचे शाहू राजर्षि आठवतात,ऐवढे कमी होते म्हणुन कि काय काही ईतिहासकारानी शाहूछत्रपतीचा कार्यकाळच पेशावाई म्हणुन घोषित केला त्यासाठी युक्तीवादही खुप पोरकट केला आहे .शाहूछत्रपतीचा कालखंड मोठा आहे म्हणुन तो प्रधानाच्या नावानी विभाजित केला असे देतात.अकबर औरंगजेबाचा कालखंड मोठा आहे तो वजिराच्या नावानी विभागूण मांडण्याची चेष्टा कोणी करणार आहे का ? खरच धन्य ते राजवाडे-सरदेसाई सर !खंतपुर्वक मत मांडावे लागतेय .
एक गोष्ट मला खुप गोंधळात पाडते नक्की शंभूपुत्र शाहू महाराज दूर्दैवी आहेत कि या महाराष्ट्रातील फक्त महाराष्टेरातीलच नाही तर या भारतातील लोक दूर्दैवी आहेत.एवढा मोठा राजा या महाराष्ट्राच्या भूमित जन्माला आला हि साधी गोष्ट नाही.आजच्या घडीला मात्र तो खोल दरित ढकलून दिलेला आहे आणि त्यावर पिशवाईशाही घोडे नाचवले जात आहेत.
७ वर्षाचे वय शाहूराजेचे होते जेव्हा ते रायगड तहानंतर औरंगजेबाच्या राजकिय कैदेत सापडले.महाराणी यसूबाई सरकार जिजाऊ आऊसाहेब झाल्या.त्यांनी संस्कार केले .औरंगजेबी धर्मपरिवर्तनाच्या चक्रातून सोडवले.त्या कोवळ्या युवराज्याच्या सुटकेसाठी प्रतापराव गुज्जरांच्या दोन्ही पोरांनी मोठा त्याग केला किती ती स्वामीनिष्ठा.सुटून आले हक्कासाठी शुन्यातून लढवावे लागले.छत्रपती शिवाजी महाराजापाठीमागे तरी शहाजीराजासारखा महाबली होता.मात्र शाहू महाराजांच्या पाठीशी पुर्वजांचा वारसा आणि शिकवन आणि मुघली व्यवस्था जवळून आनूभवली या व्यतिरिक्त काही नव्हते.
१७ वर्षाच्या कैदेनंतर भारतभर मराठा साम्रज्याचा विस्तार करतो,नवी प्रशासन आणि मुलकी व्यवस्था आंमलात आणतो आणि संपूर्ण भारतावर ४२ वर्ष राज्य करतो ही काही साधी गोष्ट झाली नाही.शाहूछत्रपतीनंतरही मराठा लढत होता कारकूनी कारस्थाने होत होते तरी तो शतकभर वर्षे टिकून होता.ईंग्रजांना शाहूछत्रपतीच्याच सेनानाईक सरदाराबरोबर निकराचा लढा द्यावा लागला.बहूतेक वेळा हारही पतकारावी लागली ही पुण्याई आणि पाठबळ त्याच पुण्याश्लोक राजाचे होते.
टिप- बाकी पिशवाई भटशाही आणि सरदारशाहीचा कितीही डंका वाजवला तरी तुम्हचा पालनहार बाप शाहूराजा आहे हेच अंतिम सत्य आहे.मुळात तुम्हच्या सर्वांचा निर्माता भाग्यविधाता तोच आहे तुम्ही मात्र त्याच्या मृत्यनंतर सर्वच विसरुन गेलात आणि आज त्यालाही झाकण्याचा प्रयत्न करताय.
कधीतरी वाटतं एखदा शाहूप्रेमी हॉलिवुड/बॉलीवुड बिग बजेट बिग थिममधे जेव्हा मराठा विस्तारक भारतवर्ष सम्राट राजा शाहूछत्रपतीवर चित्रपट निर्मिती करीन आणि अल्पावधीत जगभर त्या राजाचे नाव जाईल तेव्हा काय नजारा आसेल अखंड भारत त्या पुण्याश्लोक राजापुढे नतमस्तक होईल .
शाहू महाराज हे हिंदूस्थानचे राजे झालेले आहेत त्यांच्या विरोध्दात जायचे म्हंजे संपूर्ण हिंदूस्थानच्या विरोध्दात जाणे होय - पोर्तूगीज
जय शहाजीराजे
जय शिवराय
जय शाहूराजे
साभार —मिनीनाथ रावसाहेब गेरंगे पाटिल

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...