कल्याण आणि भिवंडी संबंधी शिवकालातील उल्लेख
जेधे करीण्याप्रमाणे कल्याण-भिवंडी दादाजी कृष्ण व सुखो कृष्ण लोहोकरे या दोघा बंधूंनी जिंकून घेतलीं. (शिवचरित्र प्रताप पृ.४२) आबाजी सोनदेवाने नव्हेत. जेधे शकावलींतही वरील दोघांनीच कल्याण-भिवंडी घेतल्याचें उल्लेख आहे.
इसवी सन १६३६ मध्ये कल्याण शहर हे निजामशहा कडून विजापूरच्या आदिलशहाला मिळाले होतें. विजापूरकरांचा ताब्यातील कोंकणचा जो मुलूख होता त्यापैकी मध्यकोंकणात कल्याणचा सुभा (कल्याण पासून नागोठण्यापर्यंतचा मुलुख) मोडत होता. (Shivaji Tha Great Vol I Part II Page.40)
तो मुल्ला अहमद या विजापुरी अरब सरदाराच्या हाताखाली होता. ( चिटणीस बखरीत चुकून मौलाना हयाती असे नाव दिले आहे. या मुल्ला अहमदचा भाऊ मुल्ला याहीआ हा नांवाचा होता. त्याचे मराठीकरण मौलाना हयाती झाले असावे )
इसवी सन १६५६ च्या सुमारास आदिलशहा आजारी असल्याने मुल्ला मोहम्मद बरेच दिवस विजापूरांत होता. त्यामुळे कल्याण सुभ्याच्या संरक्षणव्यवस्थेत शिथिलता आली होती. त्याचा फायदा घेउन शिवाजी महाराजांनी आबाजी महादेवाच्या (डॉक्टर बाळकृष्ण ही सोनदेव हीच चूक करतात) हाताखाली कल्याण वर सैन्य पाठविले. त्याने प्रथम कल्याण व नंतर भिवंडी या दोन्ही ठिकाणांवर हल्ला करून ती घेतली. ही घटना २४ ऑक्टोबर १६५७ रोजी घडली. नंतर दादाजी बापूजी याच्या हाताखाली सुभ्याची व्यवस्था ठेवण्यासाठीं, पायदळ घोडदळ पाठवण्यांत आलें. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी चा कारभार अनुक्रमे दादाजी कृष्ण लोहोकरे व सखो कृष्ण लोहकरे यांना सांगितला. ( Source- B.of M.H Vol I J.S Page.30)
(कल्याण व भिवंडी हि ठिकाणें आबाजी सोनदेवानें न घेता आबाजी महादेवाने घेतली असावींत व पुढे कल्याण सुभ्याचा तो मुख्य सुभेदार होता.)
इसवी सन १६६१ मध्ये शाहिस्तेखानाने कल्याण व त्याचा सभोवतालचा मुलूख जिंकून घेतला. ( Shivaji and his time, 4th edition, Page.85; Sh. The Founder Of M. Swaraj By C.V. Vaidya page.134-135)
इसवी सन १६५९ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी येथे आपलें आरमार बांधलें. यासंबंधीचे त्या वेळच्या पोर्तुगीज गव्हर्नराचू असे उद्गार आहेत :
" the son of captain xagi (i.e, Shahji) who has left king Idala (Adil Shah) has taken over the lands near Bassein (वसई) and chaul, is getting very powerful and forces us to be careful as he has built a Navy in Bhivandi, Kalyan and Panvel ports in the districts of Bassein."
(Pissurlencer's Shivaji, 4- A letter by Portuguese governor to his King dated 16th August 1659)
इसवी सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी वर हल्ला केला व तेथील मोगल ठाणेदार उजबकखानास ठार मारुन तीं ठिकाणे घेतलीं. (Massir-i-Alamgiri page.99; Dil.65; See Sh. And His Times 4th edition page.164; O.C.3415; Surat,Gen.vto the Hon'ble Vo. 30th March 1670) -
"we are in a very great want of timber of largest sorte as well for the making of carriages as other uses for those carriages which they send with the guns from England are improper to Mount the gun on the bestions. This sort of timber we must procure from Cullian or Buinde, (कल्याण किंवा भिवंडी) now in Shivaji's possession"
(F.R.Bom.Vol.6, page.5, 21st March 1670)
या इंग्रजी पत्रांतील उल्लेखावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मध्ये परत घेतल्याचे ठरतें.
इसवी सन १६७५ मध्ये मोगली फौजांनी कल्याण वर हल्ला करून तेथील पुष्कळ घरें जाळली. ती फौज परत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने पुन्हा कल्याणचा ताबा घेतला. ( F.R. Surat Vol.107 .Fol 68; Rajapur To Surat 6th February Vol 107; Bombay to Surat 27 February 1675)
१६७५ मध्ये व १६७६ मध्ये मोगलांचें कल्याण घेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. (पत्रसार संग्रह १७११)
कल्याणच्या खजिन्याची लूट
मुल्ला अहमद विजापुरास पाठवीत असलेल्या सरकारी खजिन्याची लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे स्वारांनिशी त्यावर धाड घालून केली. ( शिवदिग्विजय ; Life of Sh. Maharaj By N.S. Takakhav page.112-3) या हकीकतीस अस्सल आधार नसल्यानें ती विश्वसनीय वाटत नाही.
कल्याण संबंधी फ्रायरच्या डायरीतील उतारा
"Sevagi as gentre being otherwise inclinable to raze them from the use of the donors and intention of the founders, others them to be converted into granaries, specially those within the city. Most Glorious Mosch for reception by Havalder of Shivaji-Customer in Choullry? (Frair's Dairy Vol I page.309)
- श्रीशिवछत्रपती संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा, आणि साधने (त्र्यं.शं. शेजवलकर)
Image Courtesy - British Library
No comments:
Post a Comment