विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 28 November 2020

मराठा साम्राज्य विस्ताराचा इतिहास :





 मराठा साम्राज्य विस्ताराचा इतिहास :

------------------------------------------------
1698 नंतर आधी छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात मराठ्यांनी औरंगजेब विरोधात बचावात्मक पवित्रा सोडून दिला, आणि त्याच्या युद्धामुळे खचलेल्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत आक्रमणाचा पवित्रा अंगीकारला.
ह्या काळात खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले, सरदार कदम बांडे आणि गायकवाड यांनी उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि वर्हाड ह्या प्रांतावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
------------------------------------------------
मराठा साम्राज्याचा जितका विस्तार झाला, त्यातला अर्ध्याहून जास्त साम्राज्य विस्तार हा रघूजीराजे भोसले यांनी केला आहे.
1737 ते 1740 ह्या काळात रघूजीराजे भोसले ह्यानी कर्नाटक, हैदराबाद, तसेच एकूण दक्षिण भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांनी ह्या काळात दोस्त अलीखान आणि त्याच्या सर्व साथीदार आणि शासकांचा एकंदरीत पाडाव केला.
युद्धाच्या शेवटी जवळचे सर्व साथीदार आणि सोबत नातेवाईक देखील मारले गेल्याने दोस्त अली खान रघूजीराजे भोसले यांना शरण आला.
1741 मध्ये नागपूर च्या गोंड राज्यावर रघूजीराजे यांनी अधिकार प्रस्थापित केला.
पुढे 1745 पर्यंत रघूजीराजे भोसले यांनी ओडिसा, छत्तीसगढ, झारखंड, हे प्रदेश मराठा साम्राज्यात जोडले.
ह्यानंतर च्या काळात रघूजीराजे भोसले यांनी बंगाल वर एकामागोमाग एक आक्रमणे केली व अंततः तिथल्याअली वर्दी खान ह्या नवाबाला नमवले.
शेवटी अली वर्दी खान याने रघूजीराजे भोसले यांच्याशी तह केला व बिहार व बंगाल (आजच्या बांगलादेश सहित ) ह्या प्रदेशासाठी मराठ्यांना 20 लाख रुपये वार्षिक चौथाई द्यायचे कबूल केले. शिवाय रघूजीराजे यांनी तीन कोटी युद्ध खर्च देखील घेतला.
अशाप्रकारे दक्षिण आणि पूर्व उत्तर भारतावर रघूजीराजे भोसले यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
रघूजीराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली मराठा साम्राज्याचा जो आणि जितका भाग होता, तो भाग.... बाकी शिंदे, होळकर, पेशवा, गायकवाड यांच्या कडे असलेले भाग मिळवले, तरी त्याहून मोठा आणि विस्तृत होता.
------------------------------------------------
मराठा साम्राज्याचा माळवा (म्हणजे मध्यप्रदेश) आणि बुंदेलखंड ह्या भागात विस्तार,
बाजीराव पेशवे, राणोजी शिंदे, मल्हार राव होळकर, राणोजी भोईटे, आनंदराव पवार ह्यानी केला.
1740 पर्यंत.
ह्यातली बुंदेलखंड ह्या भागाची जहागिर छत्रपती शाहू महाराजांनी बाजीराव पेशवे याना दिली.
माळवा प्रांताची जहागिर छत्रपती शाहू महाराजानी राणोजी शिंदे, मल्हार राव होळकर यांना दिली.
धार पवारांना देण्यात आले होते, आणि भोईटे याना देखील वेगळी जहागिर शाहू महाराजांनी इनाम दिली होती.
------------------------------------------------
ह्यानंतर मराठा साम्राज्य दिल्ली, राजस्थान आणि पाकिस्तान (अटक, पेशावर ) ह्या भागावर पसरवण्याचे कार्य महारराव होळकर, जनकोजी शिंदे आणि सर्वात मुख्यत्वे दत्ताजी शिंदे यांनी केले.
------------------------------------------------
अशाप्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या दरबारी असलेल्या कर्तृत्ववान लोकांद्वारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले.
हे मराठा साम्राज्य भारतभर पसरलेले होते.
सर्वांना विनम्र अभिवादन
जय भवानी...... जय शिवाजी...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...