मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 10 November 2020
शहाजी महाराजांच्या चरित्राचा सखोल अभ्यास
शहाजी महाराजांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करतांना त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता शहाजी महाराजांनी केलेले कार्य निश्चितच अतुलनीय आहे. शहाजी महाराजांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचा अभ्यास केल्यानंतर अनेक निष्कर्ष मांडता येतात .
शहाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वास प्रारंभ होण्यापूर्वीच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करता, बहामनी राज्याचे पाच शाह्यांमध्ये विघटन झाले होते. त्यांच्यामध्ये सत्तासंघर्ष सुरू होता. या सत्तासंघर्षात सत्ताधिशांना बाहेरून सैन्य आणणे शक्य नव्हते. परकीय सत्ताधिशांना स्थानिक सैन्याची फळी उभारणे आवश्यकच होते.
निजामशाही दरबारात अंतर्गत सत्तास्पर्धा सुरू होती. मलिकअंबर व मियान राजू या दोघांमघील सत्तास्पर्धेला निजामशहा मुर्तूजा कंटाळला होता. त्यात मराठ्यांचा तिसरा पक्ष निर्माण झाला. या तिसर्या पक्षाचे नेतृत्व मालोजीराजे भोसले यांच्याकडे आले. त्यांनी ते नेतृत्व यशस्वीपणे केले. मालोजी नंतर या पक्षाचे नेतृत्व शहाजी महाराजांकडे आले.
शहाजी महाराजांनी कर्तबगारीने आपले राजकीय शहाणपण पणास लावून, तत्कालीन राजकीय परिस्थिती लक्षात घेत सन्मानाने व कर्तव्यदक्षतेने वेगवेगळ्या राजदरबारांत नोकरी केली.
शहाजी महाराजांनी निरनिराळ्या शाह्यांमरध्ये नोकरी करत असतांना आपला स्वाभिमान आणि वैभव सांभाळले. मुसलमान दरबारी चाकरी करित असताना देखील त्यांनी आपल्या स्वाभिमानास, मोठेपणांस इजा पोहोचू दिली नाही. ज्यावेळी काही मानहानीचे प्रसंग निर्माण झाले त्यावेव्ठी त्यांनी नोकरीवर लाथ मारली आणि आपले स्वत्व जपले. स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक धन, हत्यारे, सैन्य, प्रभावळ आणि आपली जहागीरी कायम आबाधित ठेबली.
शहाजी महाराजांनी मराठ्यांचे महत्व जाणले. मराठ्यांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही शाहीस दक्षिणेत स्वतंत्रपणे अंमल प्रस्थापित करणे अशक्य आहे हे धूर्त शहाजीमहाराजांनी ओळखले. त्याचप्रमाणे शहाजीमहाराजांना स्वतःच्या कार्यकर्तृत्वाची जाण होती. आणि त्याबळावर आपण कोणत्याही शाही दरबारात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो असा विश्वास त्यांना होता. म्हणून वेळप्रसंगी त्यांनी नोकरी बदलूनही आपले वर्चस्व सिध्द करून दाखविले. यामुळे इस्लामी सत्तेचा जो दरारा मराठ्यांच्या मनात घर करून होता, तो हळूहळू कमी झाला. मराठयांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास, आत्मभान निर्माण झाले, त्या सर्व सुप्त भावनांचा हुंकार शहाजीराजे होते.
@maratha_riyasat #maratha #marathi #maharashtra #म #मराठा #shivajimaharaj #shahajiraje #shivajimaharajhistory #history #इतिहास
Subscribe to:
Post Comments (Atom)
! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!
! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...

-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment