विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 27 December 2020

छत्रपती थोरल्या शाहू

 राष्ट्रात हजारो नवीन कर्तबगार माणूसे निर्माण केली हे शाहू महाराजांचे कृत्य न सांगताही आज चिरस्मरणीय झाले आहे. हजारो कुटुंबे सर्व जातीची व सर्व वर्गातील शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने पुढे आली, त्यांच्याच कर्तबगारीने आजचा मराठ्यांचा इतिहास बनला आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने ती कुटुंबे अद्यापही पुर्वजांच्या उद्योगाचे फल उपभोगत आहेत.

शाहू महाराजांनी दिलेल्या सनदाच आपल्या पुढे हजारोंनी मोजण्या सारख्या असून त्याच महाराष्ट्राच्या कर्तबगारीची साक्ष देतात. सध्याची मराठी राज्ये, सरदार घराणी, इनामे मिळवलेली देवस्थाने वगैरे बहुतेक शाहू महाराजांच्या काळातील आहेत.
धनाजी जाधव व पिलाजी जाधव, संताजी घोरपडे व त्यांची कुटुंबे, नागपूरचे भोसले व एकेकाळी अर्ध्या हिंदुस्थानास व्यापणारा त्यांचा उद्योग, समस्त चिटणीस घराणे, प्रतिनिधि वगैरे अष्टप्रधान व त्यांचे मुतालिक, आंग्रे, दाभाडे, राजाज्ञा, इचलकरंजीकर, बारामतीकर, पटवर्धन मंडळी अशा कित्येक हयात व कित्येक दिवंगत कुटुंबाची नुसती नावानिशी यादी देणेही शक्य नाही.
शिंदे, होळकर, पवार, गायकवाड यांची राज्ये तर आज आपल्या पुढे आहेतच. राष्ट्राच्या उद्योगास भरपूर क्षेत्र पुरवणे आणि ते क्षेत्र व्यापण्यास लायक माणसे निर्माण करणे हे शाहू महाराजांचे दोन्ही कार्य इतिहासात चिरस्थाई बनले आहे. त्यांचे दृश्य प्रतिक शाहू नगर उर्फ सातारा अर्ध्या दशकभर देशभर गाजले ते शाहू महाराजांची मुख्य राजधानी होती.
अखंड हिंदुस्थानात आपला भगवा ध्वज गाजवणाऱ्या

छत्रपती थोरल्या शाहू महाराजांना मानाचा मुजरा

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...