विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 29 December 2020

सह्याद्रीचा सिंह सिद्दी च्या वेढ्यात अडकलेला होता.

 


सह्याद्रीचा सिंह सिद्दी च्या वेढ्यात अडकलेला होता..

राजेंची बातमी नेतोजींपर्यंत पोहोचली.
रणमार्तंड नेतोजी विजापूर ला विध्वंस करत सुटले , पण आदिलशाही ला नेतोजींकडे कमी सैन्य असल्याची खबर मिळाली होती..
आदिलशाही ने खवासखान ला पाच हजार सैन्यासह नेतोजींचा पडाव लावण्यासाठी पाठवले खवासखान ला मदतीला गोवळकोंड्याचे सैन्य आले , तुटपुंज्या सैन्यामुळे हे युद्ध नेतोजी हारले ...
जिजाऊंना सर्व पराजयाच्या खबर मिळत होत्या, शाहिस्तेखान शिरवळ ला आपल्या अवाढव्य सैन्येसह स्वराज्यात येऊन पोहोचला होता..
शाहिस्तेखान च्या मदतीला अनेक मराठे सरदार आले.
आणि हेच काय कमी होते की, त्र्यंबकराव भोसले, बाबाजी भोसले, दत्ताजीराव जाधव आणि स्वतः आपल्या भाच्या विरूद्ध शिवरायांचे मामा रुस्तमुराव जाधव हे सुद्धा खानाला मिळाले..
मासाहेब जिजाऊ कणखरपणे उभ्या झाला , मावळ्यांना गनिमी काव्याने लढण्यासाठी आदेश दिले..
मराठा फौजांनी शाहिस्तेखान ला बेजार केले ,खान शिवापूर सोडून सासवड ला आला ,तिथून पुण्याला आणि खुद्द शिवरायांच्या लाल महालात त्याने मुक्काम ठोकला...
वनवा पसरावा तसे खानाचे लष्कर पसरले..
दिवस पुढे जात होते पण महाराजांची कुठलीच खबर येत नव्हती , मासाहेबांनी कित्येकहेर पाठवले पण कुणीही वेढा पार करून जाऊ शकले नाही.. प्रत्येक येणारा दिवस नवीन संकट उभे करत होते..
जिजाऊंमासाहेबांच्या मनात काही तरी विचार सुरू झाला... जिजाऊंनी जेवढे हातात लष्कर आहे ,तेवढे गोळा केले.. शस्त्र तयार करण्यास सांगितले...
आणि अखंड वज्रचुडे मंडीत ,सकल सौभाग्य संपन्न, जिजाऊ मासाहेब स्वतः पुढे आल्या हातात तलवार घेऊन , महिषासुर ला मारण्यास स्वतः जशी अष्टभुजा जगदंबा उभी राहिली तश्याच म्लेंच्छ मर्दनास राजगडाची जगदंबा उभी राहिली...
सर्व मंत्रीमंडळ विचारात पडले , मोरोपंत पुढे आले, मासाहेबांना त्यांनी न जाण्यासाठी शब्द टाकला...
जिजाऊ मासाहेब म्हणाल्या..
"इथे थांबुन काय करावे पंत ! शिवबा वेढ्यात अडकले, खान स्वराज्य गिळण्यासाठी नागाप्रमाणे येऊन बसलाय आम्हाला निघावे लागेल..."
मोरोपंत म्हणाले,
"आऊसाहेब, एवढ्या सैन्यात वेढा तोडणे अशक्य आहे, क्रुपया थांबावे....."
जिजाऊ मासाहेब म्हणाल्या.....
"किती थांबावे आता पंत !! स्वराज्य धोक्यात आहे ,, आम्हाला जावं लागेल पंत.....
आई भवानी च्या मनात असेल तर शिवबांची सुटका करून , परत येऊ आणि जर नाही..., तर आम्ही स्वराज्यासाठी विरमरण पत्करु.."
"पण आऊसाहेब....." पंत काही बोलणारच की, मासाहेबांनी हात वर केला...
आणि आपल्या तुळजाऊ डोळ्यांनी विजयश्री भगव्या ध्वजाकडे बघतांना म्हणाल्या...
"हा हिंदवी स्वराज्याचा भगवा , हे स्वराज्य संपतांना आम्ही नाही बघू शकत...
या वेळी स्वराज्याला त्यांच्या राजांची रक्षणकर्त्याची , शिवबांची गरज आहे पंत..राजमाता जिजाबाईंची नाही... आणि या एका शब्दाने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले....क्रमशः
✍🏻अक्षय चंदेल (लेख अधिकृत)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...