विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 March 2021

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग १

 ‘व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग १
पोर्तुगीज भारतात व्यवसाय करण्याच्या हेतूने आले आणि इथेच कायमचे स्थायिक झाले. या पोर्तुगीजांना ‘गोव्याचे फिरंगी’ अथवा ‘वसईचे फिरंगी’ या नावाने देखील ओळखले जात असे. मराठे आणि पोर्तुगीज यांचे संबध शिवाजी महाराजांपासूनच कधीच सलोख्याचे नव्हते. ज्यावेळी पासून ह्यांचा संबध स्वराज्यासोबत आला त्यावेळ पासून ह्यांचे धोरण एकच – ‘मुघल-मराठा संघर्षामधून फायदा घायचा’. यांची ही असली दुटप्पी निती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज चांगलीच ओळखून होते. शिवाय पोर्तुगीज मंडळी ‘धर्मांध’ वृत्तीची. इतर धर्माच्या लोकांना त्रास देणे हा त्यांचा ‘उद्योग’ सतत सुरु असे. याचा प्रत्यय खुद्द शिवाजी महाराजांना देखील १६६७ साली आला होता. अश्या दुटप्पी वागणा-या फिरंग्यांनी कधीच मराठ्यांशी सख्य ठेवले नाही. लहान मोठे खटके हे अधून-मधून कायमच उडत असत. त्यामुळे त्यांचे समूळ उच्चाटन करणे जरुरी होते आणि याच कारणास्तव श्रीशंभूछत्रपतींनी गोव्यावर एक नियोजित ‘थोरली स्वारी’ आखली. सदर प्रकरणामधे संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी, या स्वारीत केलेला पराक्रम, गोव्याचा विजरई (Viceroy ) कोंदि द आल्व्होर याची झालेली फजिती, मराठ्यांनी गोव्यात घातलेला धुमाकूळ या सर्व घटना क्रमाने पाहणार आहोत.

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...