आज गुढीपाडवा सनातन वैदिक आर्य हिंदू धर्माचा नववर्षारंभ आजच्याच दिवशी श्रीब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. हे आपण सर्वजण जाणतो पण त्याचबरोबर या दिवसाचे एक फार मोठे महत्त्व आहे फार मोठा इतिहास आहे. आज शालिवाहन शक १९४३ ला प्रारंभ होत आहे आपण कायम शालिवाहन शक हे नाव ऐकतो आणि अजूनही दोन हजार वर्षे झाले तरी ते वापरतो पण या मागचा महाराष्ट्राचा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास दुर्दैवाने कोणालाच माहिती नाही फार क्वचित लोकांना माहिती आहे.
जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विदेशी मोगलांनी भारतावर आक्रमण केले होते आणि भारत हा महाराष्ट्र पारतंत्र्यात होता हिंदू धर्म धोक्यात होता त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य (मराठा साम्राज्य) निर्माण केले आणि ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळापर्यंत संपूर्ण भारतावर पसरलेले होते त्यामुळे आज हिंदू धर्म आणि हा भारत अस्तित्वात आहे. तसेच दोन हजार वर्षांपूर्वी देखील या भारतावर महाराष्ट्रावर विदेशी आक्रमक शकांनी आक्रमण केले होते. शक म्हणजे मध्य आशियात राहनाऱ्या लुटारू आक्रमणकारी टोळ्या होत्या आणि त्यांनी भारतावर महाराष्ट्रावर आक्रमण केले होते आणि हा भारत देश महाराष्ट्र पारतंत्र्यात होता.
तर ही गोष्ट आहे १९४३ वर्षांपूर्वीची त्यावेळी महाराष्ट्रावर पहिले क्षत्रिय मराठा राजघराणे सातवाहन राजांचे राज्य होते आताचे पैठण राजधानी व जुन्नर उपराजधानी होती. आणि त्यांच्यावर विदेशी शंकांचे अतिक्रमण झाले होते त्या वेळी सातवाहन साम्राज्याचे २३ वे मराठा सम्राट #गौतमीपुत्र_सातकर्णी गादीवर होते. सातवाहन वंशात एकूण ३० राजे झाले त्यापैकी गौतमीपुत्र सातकर्णी हे सर्वात पराक्रमी सम्राट होते.
विदेशी शकांचा नहपान नावाचा राजा होता त्याच्यात आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यात अनेक युद्ध झाले आणि त्यांची शेवटची अंतिम लढाई नाशिक येथील गोवर्धन या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शक राजा नहपान याचा पराभव केला त्याचा शिरच्छेद करून त्याला ठार केले व या दक्षिण भारताला महाराष्ट्र भूमीला विदेशी शकांपासून मुक्त केले.
आणि उरलेल्या शक लोकांना गुजरात कच्छ च्या पुढे राजस्थान पर्यंत हाकलून दिले पुढे याच शक लोकांना राजस्थानातील अबू पर्वतावर अग्निसंस्कार करून हिंदू केले तेच लोक आज स्वतःला रजपुत म्हणतात.
ज्या दिवशी गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव केला तो दिवस होता गुढीपाडव्याचा शकांवर विजय मिळवून जेव्हा गौतमीपुत्र सातकर्णी आणि सर्व सैनिक महाराष्ट्रात राजधानी पैठण येथे आले तेव्हा सर्वांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. शकांवर विजय मिळवला म्हणून गौतमीपुत्र सातकर्णि यांनी शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली. आज शालिवाहन शक १९४३ ला प्रारंभ होत आहे आणि विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठण येथे गोदावरी नदीच्या किनारी एका विजयस्तंभाची निर्मिती केली जो आज १९४३ वर्षे उलटून गेली तरी देखील डौलाने उभा आहे आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे.
त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढीपाडवा हा सण ब्राह्मणांनी सुरू केला वगैरे या भंपक गोष्टी आहे आपले पूर्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज काय मूर्ख नव्हते गुढीपाडवा करायला गुढीपाडवा हा सातवाहन कालापासून साजरा होतोय.
विदेशी शकांना हरवून या दक्षिण भारताचे महाराष्ट्राचे हिंदू धर्माचे रक्षण करणारे महापराक्रमी, दिग्विजयी, दक्षिनापथपती, त्रिसमुद्रतोयपितवाहन महान क्षत्रिया मराठा सम्राट श्री गौतमीपुत्र सातकर्णी यांना मानाचा मुजरा













सर्व हिंदू बंधू-भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक भगव्या शुभेच्छा





No comments:
Post a Comment