विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 April 2021

गुढी पाडव्यामागील सत्य

 

आता आपण


गुढी पाडव्यामागील सत्य जाणून घेऊया. गुढीपाडव्याचा सर्वात जुना उल्लेख हा शालिवाहन म्हणजेच सातवाहन याच्या काळातील.
याने परकीय शकांचा पाडाव केला आणि जनतेचे राज्य स्थापन केले. याच दिवशी त्याने आपल्या राज्याचा नवीन शक चालू केला जो आजतागायत चालू आहे. आणि शिवकाळातही याच शकाच्या आधाराने सर्व नोंदी केलेल्या आहेत.
सातवाहनाची राजधानी होती प्रतिष्ठाण म्हणजे महाराष्ट्रातील पैठण.
सातवाहन राजाचे पालनपोषण कुंभार कुळात झाले होते, स्वाभिविकपणे घडा किंवा कलश हे त्याचे कुलचिन्ह ..
आजही कुंभार समाजात घडा हे पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक माणले जाते अगदी लग्नकार्य असो वा आवा लुटणे असो वा मकरसंक्रांत या मधे घडा अर्थात गाडगे याला मांगल्याचे प्रतीक माणतात .
स्वाभिविकपणे घडा किंवा कलश हे कुलचिन्ह
म्हणून रेश्मी वस्त्रासोवत घडा काठीवर ठेऊन खारीक खोब-याच्या हारासह गुढी उभारली गेली असेल .
पुर्वी विजयाचे प्रतिक म्हणून सम्राट राजधानीत व कुलदैवतेसमोर दगडी विजयस्तंभ निर्माण करत असतं!
गुढी या अशा विजयस्तंभाचं लोकप्रिय प्रतिक म्हणावे लागेल आणि यावरून सातवाहनांच्या लोकप्रियतेचाही अंदाज येतो
हा विजयस्तंभ -तीर्थ खाम्ब हा पैठण नागरित आजही 2000 वर्षोंनंतर उभा आहे। आणि दर वर्षी तेथे गुढी सुद्धा उभारली जाते .
सातवाहनाने ज्या दिवशी नवीन शक चालू केला तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही गुढी पाडवा या नावाने साजरा केला जातो. म्हणजेच या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे.
गुडी म्हणजे कन्नड मध्ये मंदिर .मंदीरावर जो कळस अस्तो त्याची प्रतीकृती म्हणून उलटा तांब्या ठेवला जातो अश्या जुण्या काही नोन्दी आहेत ..
यादवकाळात देखील गुढी असल्याचे संदर्भ आहेत. अनेक संताच्या रचनेत देखील 12 व्या शतकापासून गुढीचा उल्लेख आढळतो.
1689 पुर्वीही गुढी उभारली जात असल्याचे अनेक संदर्भ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या लेखनात आढळतात.
पहिली गुढी उभारण्याच्या घटनेला आज 1937 वर्ष झाली. या कालखंडात ईतिहासात बरीच स्थित्यंतरे झाली.
दररोजच्या वापराच्या वस्तु बदलल्या, तशी गुढीही बदलली. मातीच्या घड्याऐवजी धातुचे तांबे आले.
माझ्या लहानपणी तर पितळी तांबे असायचे, अगदी स्टीलचा ग्लाससुद्धा मी गुढीवर पाह्यला आहे.
आता पितळी तांबे जसे वापरातून नाहीसे झाले, तसे गुढीवरूनही नाहीसे झाले .
त्यातल्यात्यात सधन कुटूंबात तांबे धातुचा कलश आणि अतिश्रीमंत कुटूंबाच्या गुढीला चांदीचा तांब्या कांही क्वचित प्रसंगी पहायला मिळतो.
हे बदल त्यामुळेच होऊ शकले की, अमुक एक धातुचा, आकाराचा, यात आग्रह नाही.
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कलश वापरता य़ेईल. विजयाचे प्रतिक म्हणून ध्वज हा रेशमी वस्त्र या स्वरूपात होता. पैठण ही रेश्मी वस्त्रांसाठी प्रसिद्ध असणारी नगरी ! पैठणची पैठणी आज हजारो वर्षानंतरही लोकांना भुरळ पाडते आहे. घरात वापरायच्या भांड्याचा जसा आपण विचार केला तसा वस्त्रांचा विचार केला तर, सर्वसामान्यांना पैठणी घेण्याचा योग निदान लग्नात तरी यायचा!
म्हणजे घरात पैठणी हेच, एकमेव रेश्मी वस्त्र. दुसरे रेशमी वस्त्र घरात असण्याची शक्यता तशी कमीच.
तेच गुढीला घातलं जाऊ लागल्यानं विजयाचे प्रतिक असणारा हा पुल्लींगी ध्वज स्रीलंगी होऊन गुढी झाला असावी. परंतु कलश हा गर्भाशयाचे प्रतिक म्हणून , गुढी ही शाक्त पंथीय उपासनेचे प्रतिक असल्याचेही कांही संशोधकांनी मांडले आहे, आणि ते संयुक्तिक देखील आहे .
पण लोक मात्र , गुढीसाठी रेशमी वस्त्राचा आग्रह धरताना दिसत नाहीत, नवीन असणारे कोणतेही वस्त्र चालू शकते ! कारण गरीब कुटूंबतील कांही गुढ्या साध्या छापील साड्याच्या सुद्धा आढळतात.
जे कलशाचे आणि साड्याचे तेच खारीक खोबरे या गोड पदार्थांचे! तेही स्वरूप बदलले आणि साखरेचे हार आले.
हे बदल टप्याटप्याने होत गेले, हे आपल्याला निरीक्षणावरून समजु शकते. यावरून गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि जनाधार असणारा सण असल्याची खात्री पटते.
कर्नाटक, आंध्र या प्रदेशातही हा सण नव संवत्सर , उगादी या नावाने साजरा केला जातो
वास्तविक पाडवा हा विजयोत्सव आहे त्यामध्ये गुढी ची पुजा केली जाते या पुजेत पाडव्याला घरात गुढी यजमान उभा करू शकतो,न. ती उभी करण्यासाठी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहिताची आवश्यकता नाही.
दिवसभर गुढी उभा करून रात्री उतरताना उत्तरपुजेसारखा विधी नाही ,त्यालाही ब्राह्मण बोलावण्याची गरज नाही .अशी एकमेव पुजाकार्य ब्राह्मानाशिवाय होते ..
गुढी मधे कलश ,एखादे रेशमी सुती छापील नवे वस्त्र हा पेहराव अस्तो ..काही ठीकाणी गुढी हे भवानीच मातेचे स्वरूप असलयाची श्रद्धा मानून तीचे पुजन करतात ..
त्या गुढीस अलंकार हार अर्पण केले जातात तसेच कडुनिंब ची पत्ते या विषयी सुद्धा लिंबाचा पाला यल्ल्म्मा , मरिआई दक्षिणेतील दुर्गा मंदिरात असणारऱ्या देविला श्रद्धेने अर्पण केला जातो.....
गुढीपाडवा ही राजस्थानात ,गुजरात चा काही भाग ,आंध्र चा काही भाग ,कर्नाटक आणि मध्यप्रदेश च्या काही भागात म्हणजे ज्या ठिकाणी सातवाहन ची सत्ता होती तिथे साजरा केला जातो .
मागील काही काळात सातवाहन राजाचा विजयोत्सव "गुढी" न उभारता "पताका "भगवा" ध्वज फडकावून साजरा करत आहेत त्या निमीत्ताने का होयीना राजाचे कर्तुत्व मान्य करत आहेत हे स्वागतार्ह आहे ..
सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .......

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...