रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा मोठा समारंभ झाला.
स्वराज्यातल्या गडकोटांवरुन भांड्यांचे आवाज उठले. दुदुंभी वाजल्या, डफ कडाडले शिंगाच्या ललकार्या ढोल झांजा नी करताळांचा आवाजाने रायगडाचे कातळकडे रोमांचित झाले. राज्याभिषेक समारंभानिमित्त झालेल्या शस्त्रास्त्रांच्या स्पर्धांमध्ये अनेक वीरांनी भाग घेतला. सर्वस्व ओतून या स्पर्धा संताजींने गाजवल्या .हत्यारांचं त्याचं कसब पाहून लोक अचंबित झाले. हंबीररावांसारख्या मर्दालाही वाटलं, हे बावनकशी सोनं आपल्या हाताखाली असावं.संधी दिली तर भविष्यात मोठं नाव काढील. स्पर्धेच्या मैदानात इतका उसळतो तर रणमैदानात पराक्रमाच्या किती ठिणग्या पाडील !
स्पर्धेचा निकाल जाहीर करताना संताजींना सर्वश्रेष्ठ वीर ठरवून मानाचं जाडजूड सोन्याचं कडं त्यांच्या शिसवी मनगटात स्वहस्ते त्यांनी चढवलं.
" बहाद्दरा,आज आमच्या डोळ्यांचं पारणं फेडलंस बघ. तुझ्या मर्दानगीला वाट काढून दिली पाहिजे."
महाराचांची भेट घेऊन त्यांनी आग्रहाने संताजींची मागणी केली.
या पोराला आमच्या हाताखाली द्यावं. मोठमोठी कामे अंगेजणीने सिध्दीला नेईल.
या बाबत म्हाळोजी घोरपड्यांशी बोला.ते नाही म्हणणार नाहीत. महाराज म्हणाले म्हाळोजींनी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. हंबीरराव केवळ स्वराज्याचे सेनापती नव्हते. थोरा करीन्याचा धारकरी असा त्यांचा लौकिक होता. त्यांची संगत म्हणजे लष्करी पाठशाळेतली शिकवणीच.म्हाळोजी आनंदाने म्हणाले,
पोर तुमच्या पदरात घातला त्याला लढायांचा हुन्नर शिकवा .
लष्करी जीवनातली इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली असं संताजींना वाटलं. हंबीररावांना त्यांनी हमी दिली,
तुमच्या हुकुमासरशी आगीशी भिडेन.पण मागे हटणार नाही.,
शाब्बास,! हंबीररावं त्यांची पाठ थोपटत म्हणाले ,लष्करात तोलदारीनं राहायचं तर एक गोष्ट ध्यानी धर पोरा. नुसत्या अंगबळाने अस्कारा होत नाही. डोळे उघडे अन् डोकं ठिकाणावर राहिलं पाहिजे . मैदानावर हरघडी बदलणारी परिस्थितीची फिरंत अकलेचं बक्कळ बळ असल्याशिवाय काबूत ठेवता येत नाही.,,
त्या महान समशेरबहाद्दराने केलेला हा उपदेश संताजीराव घोरपडे यांनी कायमचा लक्षात ठेवला,,.!
सुरुवात पराक्रमाची पुढील भाग लवकर ...

Art_ @ravishdhanawde
लव नामदेव घोरपडे 

Post - @sarsenapati_santaji_ghorpade
No comments:
Post a Comment