विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 29 June 2021

रत्नागिरी व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील चांदोली अभ्यारण्यामधील “किल्ले प्रचितगड”.

 ती झुंज व्हती ती कर्तुत्वशील व्हती, आणि ती मराठ्यांची रूढ़ी व्हती ती रयतेस जाणीव करुन देण्याची व्हती....


रत्नागिरी व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील चांदोली अभ्यारण्यामधील “किल्ले प्रचितगड”....🚩
कोकणातून घाटावर जाणाऱ्या रेडे घाटावर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता काही वर्षापूर्वी पर्यंत प्रचितगडला जाण्यासाठी घाटावरुन पाथरपुंज, भैरवगड, चांदोली मार्गे वाटा होत्या तर कोकणातून रेडेघाट आणि शृंगारपूर मार्गे वाटा होत्या पण आता या वाटा चांदोली आणि कोयनानगर अभयारण्याच्या कोअर/बफर झोन मध्ये गेलेल्या असल्यामुळे प्रचितगड किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट उरली आहे ती आहे शृगांरपूर या कोकणातल्या गावातून संभाजी महाराजांच या गावात काही महिने वास्तव्य होतं त्या वास्तव्यात त्यानी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला होता...
आदिलशहाचे शृंगारपुरचे सरदार सुर्वेंच्या ताब्यात १६६१ साली मंडणगड, पालगड हे किल्ले होते उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले वाटेत मंडणगड किल्ला होता शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच सुर्वेंची तारांबळ उडाली व मंडणगड सोडून आपली जहागिरी असलेल्या शृंगारपूरला पळून गेला महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला केला त्यावेळी दळवींचे कारभारी (दिवाण) पिलाजी शिर्के यांची योग्यता पाहून महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामिल करुन घेतले पुढे पिलाजीची मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी संभाजी महाराजांचा विवाह झाला तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला...
शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सुभेदार म्हणुन नेमणुक केली शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजी महाराजांमधील लेखक, कवी जागा झाला त्यांनी “बुधभूषणम” हा संस्कृत ग्रंथ लिहिला नायिकाभेद, नखशिक, सातसतक हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले...
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : Avinash Gaykar...👌🏼♥️

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...