विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 21 September 2021

शुरवीर श्रीमंत शंभुसिंह सुज़नसिंह जाधवराव

 

शुरवीर श्रीमंत शंभुसिंह सुज़नसिंह जाधवराव 
पोस्तसांभार ::

Raje Amarsingh Udaysingh Jadhavrao




पावन खिंडीत जाधवराव घराण्यातील पहिले शुरवीर स्वराज्य निर्मीतीसाठी धारातिर्थ पडलेले पडले त्याच्या कार्याचा आढावा
शुरवीर श॑भुसिंह जाधवराव हे श्रीमंत लखुजीराव राजेज़ाधव याचे पणतु आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव याचे वडील होते ते छत्रपती शिवाजी महाराजाचे मेहुणे होते
त्याचे वडील सुजनसिंह आणि श्रीमंत शहाजी राजेभोसले आणि जिज़ाऊचे जेष्ठ पुत्र श्रीमंत संभाज़ीराजे कर्नाटकातीलं कनकगिरी येथे १६५३ ला सरदाऱ आपाखान याच्या बरोबर तुबळ युद्धात हें दोघे श्रीमंत लखुज़ीराजेचे दोन नातु शहिद झाले
सुज़नसिंह कर्नाटक मोहिमेवर असताना त्यांच्या पत्नी मुलगा शंभुसिंह आणि मुलगी काशीबाईसाहेब हे राजामाता जिज़ाऊ जवळ राहत होते. ( छत्रपती शिवाजीमहाराज ह्यांच्या ८ एप्रिल १६६७ ला विवाह श्रीमंत काशीबाईसाहेब यांच्याशी राजगड येथे मोठ्या थाटामाटात करुन राजमाता जिजाऊसाहेबानी राजेभोसले - जाधवराव संबध परत एकदा जवळ केले )
शंभुसिंह हे छत्रपती शिवाजीमहाराज याचे बालमित्र होते. या दोघानाही शिक्षण राजमाता जिजाऊच्या हाताखाली मिळत होते
छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर ते प्रत्येक कार्यात बरोबर असत.
छत्रपती शंभुसिंह इतर मावळ्यासोबत रायरेश्वराच्या मंदीरात स्वराज्याची शपथ घेतली.
ते प्रतापगडच्या पायथ्याशी अफज़ल खान वधावेळी सुद्धा ते महाराजासोबत अंगरक्षक म्हणुन सुध्दा होते
१६६० ला छत्रपती शिवाजीमहाराज आणि शंभुसिंह जाधवराव जेथे राहत होते त्या पन्हाळा किल्यास सिद्धी जोहर याने वेढा दिला .त्यामुळे किल्यावरचे दळणवळण बंद झाले ,तेव्हा छत्रपती शिवाजीमहाराज याने किल्ला स्वाधीन करतो असा निरोप दिला,त्यामुळे शत्रुचे सैन्य बेसावध राहिले. छत्रपती शिवाजींवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी हुबेहूब छत्रपती शिवाजीराजेंसारखे दिसणारे शिवा काशीद त्यांना पोशाख घालुन शत्रुची दिशाभुल करण्यासाठी पाठविले .
पण सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वीर शिवा काशीदांला ,छत्रपती शिवाजी समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. मात्र, हे छत्रपती शिवाजी नाही असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खुपसली
त्या पौर्णिमेच्या मध्यरात्री छत्रपती, शंभुसिंह , बाज़ी बांदल,, बाज़ीप्रभु, आणि बांदल सेना आपल्या निवडक मावळ्याना सोबत घेऊन शत्रूच्या पहार्याच्या चोक्या चुकवत खाली उतरून थेट विशालगड किल्याकडे प्रयान केले. ज्यावेळी सिद्धीच्या सैन्याला समजले मग सिद्धी जोहरचा मुलगा शिद्धी उजीज़ ह्या सैन्य घेऊन पाठलाग सुरू केला .त्यावेळी महाराज रांगणा किल्याचां घाट चढत होते शत्रु सैन्य पाठलाग करीत आहे हे समजल्यावर छत्रपती ने बाज़ीप्रभु देशपांडे शंभुसिंह जाधवराव , बाजी बांदल आणि त्यांची सेना आणि इतर मावळे खिंडीत थांबविले आपण किल्यावर सुखरूप पोहचल्याचा तोफेचा आवाज आवाज एैकूर येई पर्यंत शत्रुला थोपुन धरावे असे सांगितले
शंभूसिंह जाधवराव प्राणपणाने लढत होते.... जिजाऊसाहेबांचा विश्वास सार्थ करत होते....
शंभूसिंहांची तरबेज तलवार गनिमावर सपासप वार करत होती....शत्रूचा अक्षरशः खुर्दा होत होता.... अशातच गनिमानी शंभूसिंहांना घेरले ...पण तो सिंह होता तो... थांबणार कसा....! आपल्या धन्याला विशाळगडी सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठीच हा नरशार्दुल खिंडीत पाय रोवून उभा होता...
जसा महाभारती अभिमन्यू...त्याप्रमाणेच शंभूसिंह शत्रूच्या वेढ्यात एकाकी लढत देत होते....
शेवटी गनिमानी डाव साधला...
अभिमन्यू धारातीर्थी पडला, पण शेकडो गनिमांना मातीत मिळवून अमर झाला.... जाधवराव, बांदल घराण्यांच्या लौकीकाला साजेसा इतिहास पुन्हा एकदा रचला गेला.... शंभूसिंह जाधवराव ,
खिंडीत शत्रुचे १५००० सैन्य आणि महाराजाचे ३०० सैन्य याच्यात घनघोर युद्ध झाले यामध्ये शंभुसिंह बाजी बांदल, बांदल सेना शहिद झालें,एक गोळी बाजीप्रभुना लागली महाराज गडावर पोचले तोफेचा आवाज आला आणि बाजीप्रभुचा प्राण समाधानाने गेले
अश्या या सर्व शुरविर याच्या ३६१ व्या पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन
🙏 राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...