विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 29 March 2022

धार पवारांचा इतिहास


 इतिहास:- येथील संस्थानिक पवार आडनांवाचे मराठे असून, ९ ते १३ शतकापर्यंत माळव्यावर राज्य चालविणाऱ्या परमार रजपुतांचे ते वंशज आहेत. स. १६५० त धार अकबराच्या हातांत गेलें व त्याचा समावेश माळव्याच्या सुभ्यांत करण्यांत आला. १६९४ सालीं मराठ्यांनीं नर्मदा नदी ओलांडून ह्या प्रदेशांतील धरमपुरी जिल्हा व गांव लुटलें. यानंतर येथें एकसारख्या परकीय स्वाऱ्या येत गेल्या. १७२३ सालीं निजामानें माळव्याच्या सुभेदारीचा राजीनामा दिल्यावर त्याच्या जागीं गिरिधर बहादूर हा आला. त्यानें मराठ्यांनां जोराचा विरोध करून, मध्य हिंदुस्थानांत त्यांची सत्ता कांहीं वेळपर्यंत बसूं दिली नाहीं.सांप्रतच्या धारच्या पवार घराण्यानें शिवाजीपासून पुढें दीडशे वर्षें मराठी राज्यांत अनेक लहान मोठ्या कामगिऱ्या केल्या आहेत. शिवाजीच्या वेळीं यांचा मूळ पुरुष साबूसिंग (साबाजी अथवा शिवाजी) यानें कल्याण काबीज करतांना आंबेगांवच्या घाटांत मुसुलमानांशीं लढाई दिली, तींत तो जखमी झाला. साबूसिंगानें नगर जिल्ह्यांतील सुपें गांव हें आपलें मुख्य ठाणें केलें; तेव्हां शेजारच्य हंगे गांवच्या दळव्याची झटापट होई. अशा एका झटापटींत (जांभुळ ओढ्यांत) साबाजी मारला गेला: हल्लीं तेथें एक चबुतरा बांधलेला आहे. साबाजीच्या मरणानंतर त्याचा मुलगा कृष्णाजी हा लहान असल्यानें आजोळीं संगमनेरास राही. कृष्णाजी हा मोठा झाल्यावर त्यानेंहि शिवाजीच्या पदरीं नौकरी धरली यानें आदिलशाहींतील आपल्या शेजारच्या प्रांतांत स्वाऱ्याशिकाऱ्या केल्या व एका ब्राह्मणाच्या मुलीस मुसुलमानांच्या हातून सोडविलें. कृष्णाजीस बुवाजी, रायाजी व केरोजी अशीं तीन मुलें होतीं; कृष्णाजीचें व बुवाजीचें नांव शिवाजीच्या सरदारांच्या यादींत आहे. बुवाजी, रायाजी व केरोजी यांनीं राजारामाच्या वेळीं मोंगलांनां तोंड देऊन तापी तीरापर्यंत आपला अंमल बसविला, आणि मोठमोठीं मसलतीचीं कामें पार पाडलीं म्हणून राजारामानें यांनां विश्वासराव हा किताब व सरंजाम दिला. केरोजी याला सेनाबारासहस्त्री मनसब दिली. चाकणप्रांत त्याजकडे वहिवाटीस होता. केरोजी हा शाहूच्या कारकीर्दीतहि होता. त्याला चंद्रसेन जाधवावर शाहूनें एकदां धाडलें होतें (१७२४). बुबाजी, केरोजी व रायाजी यांचीं तीन निरनिराळीं घराणीं विद्यमान आहेत. बुवाजीपासूनच धार व देवास ही संस्थानें उगम पावलीं.बुबाजीचे पुत्र दोन, काळोजी व संभाजो. संभाजीस रामचंद्रपंत अमात्यानें योग्यतेस चढविलें (ज्ञा. को. वि. ९ यांत संभाजीस शिवकालीन म्हटलें आहे, तें गोडबाले यांच्या हिंदुस्थानांतील ऐ. वि. राज्यें या पुस्तकाच्या आधारें म्हटलें आहे.). पुढें १६९४-१७०० पर्यंत मराठ्यांच्या माळव्यांतील स्वाऱ्यांत ही पवारमंडळी असावींत. कारण स. १६९६ मधील मांडवगडच्या स्वारींत त्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. संभाजी हा शाहूच्या वेळीं बराच पुढें आला; तो दीर्घायु होता. त्याचें ठाणें मलठण येथें असून त्यानें नगर जिल्ह्यांत बऱ्याच पाटिलक्या खरेदी केल्या. संभाजीस उदाजी, आनंदराव व जगदेव अशीं तीन मुलें होती (उदाजीबद्दलची माहिती ज्ञानकोश विभाग ९ मध्यें पहा; आंनदरावाबद्दलची माहिती विभाग ८ मध्यें पहा. त्याविरहित माहिती येथें दिली आहे).उदाडीनें स. १७०९ त मांडवगड सर केला. त्यानें गुजराथेंतहि बरींच ठाणीं घातलीं, तीं आपल्याकडे घेण्याची खटपट पिलाजी गायकवाडानें केली, परंतु ती साधली नाहीं. नारो शंकर यास (१७२०-२१) यावेळीं उदाजीच्या दिमतीस दिलें होतें. बाजीरावानें उदाजीस १७२२ सालीं माळवा व गुजराथ प्रांताचा निमा मोकासा सरंजामी करून दिला. यापुढें बहुधा दरसाल उदाजीनें माळव्यांत स्वाऱ्या केल्या. गुजराथबद्दल मात्र उदाजी व गायकवाड यांच्यांत नेहमीं संटे होत. ते शाहूनें तोडून, उदाजीस गुजराथमाळव्याची चौथाईसरदेशमुखी दिली (१७२६). यानंतर पालखेडच्या लढाईंत उदाजी लढला होता, व माळव्यांतील मोंगली सुभ्यावरहि त्यानें चढाई केली होती (१७२८). खानदेश, सोंधवाडा, काठेवाड, मेवाड, मारवाड, कच्छ वगैरे भागांतील मोकासावसुली उदाजीकडेच होती (१७३० पर्यंत). मात्र यावेळीं तो चिमाजीआप्पाच्या दिमतीखालीं होता. शाहूराजा हा उदाजीची सल्लामसलत घेत असे. सवाई जयसिंगाशीं या सालीं (१७३० मार्च) जी मसलत चालली होती तींत उदाजी हा होता. त्याचा व गुजराथचा निकट संबंध इ. स. १७३४ पासून सुटला असावा पेशव्यांचें व याचें वांकडें आलें असतां होळकरानें त्यांची समजूत केली होती. मध्यंतरीं (१७३५) शाहूची त्याच्यावर गैरमर्जी झाली होती, ती ब्रह्मोंन्द्रस्वामीच्या खटपटीनें नाहींशीं झाली (१७३५). उदाजी शूर व मुत्सद्दी असल्यानें माळव्यांत "जिधर उदा उधर खुदा" अशी म्हण लोकांच्या तोंडून अद्यापि ऐकूं येते. उदाजी ब्रह्मोन्द्राच्या प्रेमांतील होता. तो तापट व आग्रही असल्यानें आणि पेशव्यांच्या विरुद्ध तेढीनें वागत असल्यानें सन १७३६ नंतर त्याच्या उत्कर्षास आळा बसत

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...