विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 29 March 2022

दिल्लीच्या सनदा .. आणि गुलामी

 

दिल्लीच्या सनदा .. आणि गुलामी
पोस्त सांभार ::सुरेश जाधव
___________________________
छत्रपती थोरले शाहू महाराज आणि
बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब
...............................................
छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कुशल आणि आक्रमक नेतृत्वाखाली १७३० पर्यंत माळवा , बुंदेलखंड आणि गुजरात मराठ्यांच्या ताब्यांत आले होते . थोरल्या बाजीरावानंतर प्रधानपदी आलेल्या त्यांच्या मुलास , बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांस , लोभ उत्पन्न झाला . त्यांनी सवाई जयसिंगामार्फत दिल्लीच्या बादशहाकडे बोलणी करून काही प्रांतांची सुभेदारी
मिळावी अशी ' अर्जी ' केली . बादशहास हे संशयास्पद वाटले . छत्रपती थोरले शाहू महाराजांवर विश्वास असल्याने ते जिवंत असेपर्यंत त्यांनी याची काही दखल घेतली नाही .
छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या माघारी दिल्लीत परिस्थिती बिघडत गेली . पण तोपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व भारतभर प्रस्थापित झाले होते . त्या जोरावर पुन्हा एकदा बाळाजी बाजीरावांची इच्छा उफाळून आली . परत एकदा ' अर्जी ' दाखल झाली .
त्या ' अर्जीस उत्तर ' म्हणून बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांचे मांडलिकत्व दिल्लीच्या बादशहाने मान्य केले . ही जी सनद नानासाहेबांनी मिळविली त्यात काय कलमे होती हे पाहू .
या सनदेत सातारच्या छत्रपतींचा उल्लेख नाहीय . कारभाऱ्यांनी स्वामींच्या परस्पर हा कारभार केला होता . या करारनाम्याच्या परिणामस्वरूप राजस्थानात मराठा-रजपूत , मध्य भारतात मराठा-जाट आणि पंजाबात मराठा-अफगाण संबंध बिघडले व त्याची परिणती म्हणजे सदाशिवराव भाऊंना पानीपत युद्ध हाताळण्यात अपयश आले ,
लाखभर मराठ्यांचा मृत्यू झाला .
या करारानुसार : -
१ . मोगल साम्राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी प्रधानांची असेल .
( छत्रपतींची नाही )
२ . मोबदला म्हणून बादशहाने काही रक्कम देऊ केली .
३ . अब्दालीच्या ताब्यात असलेल्या पंजाब आणि सिंध प्रांताचे चौथ वसुलीचे अधिकार दिले . अर्थात ते प्रांत जिंकूनच वसुली करता येणार .
३ . बादशहाने बाळाजी बाजीराव यांची आग्र्याचे सुभेदार व मथुरेचे फौजदार तसेच अजमेरचे सुभेदार व नरनाळाचे फौजदार म्हणून नेमणूक केली .
४ . ही ' जागिर ' दिल्लीच्या बादशहाचे मांडलिक म्हणून त्यांनी संभाळायची आहे .
५ . मराठा सरदार हे बादशहाचे मनसबदार असतील .
६ . श्रीमहादेवाची व खंडेरावाची व धर्माची व स्मृतीची शपथ व साक्ष ठेवून , आम्ही आमरणांत तुमची आज्ञा, सेवा , चाकरी करू या खेरीज आपली आज्ञा विशेष मानून धर्म व स्मृती यांचे जागी आपली आज्ञा मानू ....
मराठ्यांच्या इतिहासावर लिहिणाऱ्यांना ही सनद माहित आहे . पण चर्चा मात्र छत्रपती शाहू महाराजांनी दिल्लीतून सनदा मिळवून बादशहाची मांडलिकत्व मान्य केले , गुलामगिरी स्विकारली असा प्रचार होतो . पण तसे काही घडलेले नाही . प्रत्यक्षात दिल्लीच्या बादशहाने वारसाहक्काने छत्रपती थोरले शाहू महाराजांचे राज्य त्यांना परत केले होते व पुढे छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सय्यद बंधुना वठणीवर आणून त्यांना शरण येण्यास भाग पाडले व त्यांच्या सोबत सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली १५ हजारांची फौज देऊन दिल्लीच्या तीन बादशहाची हत्या करवून राजमाता येसूबाई साहेब व इतर राजकैद्यांची सुटका करवून घेऊन दक्षिणेतील सहा सुभ्यांचे चौथ व देशमुखी चे अधिकार आपल्या सारखे करवून घेतले होते...
उत्तरकालीन लेखकांनी विशिष्ट व्यक्तींना प्राधान्य देऊन गौरविण्याचा जो खटाटोप केला त्यात सत्य इतिहासाची मोडतोड झाली व जे खरोखरच स्वराज्यासाठी लढले त्यांना अडगळीत टाकले, यात रियासतकार सर्वात पुढे होते . इतिहासाला हे जे अनिष्ट वळण लागले तेच अनेकांनी स्विकारले व महाराष्ट्राचा इतिहास गढूळ झाला .आणि मग ब मो पुरंदरे सारखे कादंबरीकार मराठा साम्राज्याला ' दिल्लीच्या मोगलाई सुलतानांचे ' #फिद्वीय ' ( म्हणजे #गुलाम ! ) मांडलिक ' म्हणून हिणवतात . हे सर्व प्रकार अत्यत निंदनीय आहेत .

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...