विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 June 2022

छत्रपती राजाराम महाराज आणि पोर्तुगीज

 

छत्रपती राजाराम महाराज आणि पोर्तुगीज
पोस्तसांभार :: इतिहास अभ्यासक मंडळ ( चेतन दादा )


औरंगजेबाच्या दक्खन स्वारीत एकीकडे छत्रपती संभाजी राजे धारातीर्थी पडले तर दुसरीकडे स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाईंनी यावेळी संपूर्ण छत्रपती घराणे मुघलांच्या ताब्यात न जाऊ द्यायचा निर्णय घेतला आणि छत्रपती राजाराम महाराज आणि ताराऊंना रायगडावरून बाहेर पाठवले, छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्यावर आले, इथेही पडलेल्या वेढ्यातून निघून त्यांनी जिंजी कडे जाण्याचे निश्चय केला. छत्रपती राजाराम महाराजांच्या मागे केवळ मोगल नव्हते तर त्यांचा मागे पोर्तुगीज सुद्धा होते. छत्रपती राजाराम महाराजांची ही मोहीम अत्यंत धोकादायक होती. खूप मोठी जोखीम त्यांनी उचलली होती.
पोर्तुगीजांची ह्या दरम्यानची दोन पत्र उपलब्ध आहेत. पहिलं पत्र १२ मे १६८९ रोजी बहादूरखानास लिहल होत. ह्या पत्रात "छत्रपती राजाराम महाराज हे गोवामार्गे कर्नाटकात निसटू नयेत म्हणून गोव्याच्या हद्दीवर पहारे बसविण्यात येत आहेत", असे आश्वासन गोव्याचा व्हॉइसरॉय दों रुद्रीगु द कॉशत" देतो. दुसरे पत्र ३ सप्टेंबर १६८९ रोजी पुन्हा बहादूरखानास लिहले होते. त्यात पोर्तुगीज "छत्रपती राजाराम महाराज ह्यांच्या हालचालीवर पाळत ठेवत असून, पहारे दुप्पट करण्यात येत आहेत" अशा आशयाचे आहेत.
इतका आणीबाणीचा प्रसंग असताना सुद्धा महाराज सुखरूप जिंजी वर पोहचले. दुसरीकडे पोर्तुगीजांची छत्रपती राजाराम महाराजांच्या विरोधात कारवाई चालूच होती. त्या संदर्भात १५ ऑगस्ट १६९० रोजी अब्दुल राजा खानास दिलेल्या पत्रावरून कळते. हे पत्र नवीन व्हाइसरॉय दों मिगेल बंद आल्मैद ह्याने लिहले आहे त्यात तो असे लिहतो की, " छत्रपती राजाराम महाराज ह्यांना सामील झालेल्या मणेरी व साखळी येथील देसायांचा आपण बंदोबस्त करतो".
पोर्तुगीज असुदे किंवा इंग्रज जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट आले त्यावेळी हे परकीय शत्रू नेहमी मराठ्यांचा विरोधातच उभे राहिले. छत्रपती राजाराम महाराजांनी ह्या परिस्थिती सुद्धा स्वराज्य राखलं. एक मोठा लढा त्यांनी दिला आणि अखेर त्यांची प्राणज्योत सिंहगडावर ३ मार्च १७०० रोजी मालवली.
छत्रपती राजाराम महाराज ह्यांना ३२२ व्या पुण्यतिथी दिनी निमित्त विनम्र अभिवादन🙏💐
संदर्भ -
१) ताराबाईकलीन पत्रे खंड १

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...