विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 23 September 2022

जामखंडी आणि तासगाव संस्थान




जामखंडी आणि तासगाव संस्थान

जामिखडी हे गाव कोल्हापूरपासून ११० कि.मी. अंतरावर तर तासगाव हे सध्या सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण सांगलीपासून २३ कि.मी. अंतरावर. रत्नागिरीजवळचे हरिभट यांच्या मुलांपकी ित्रबक, गोिवद आणि रामचंद्र यांनी मराठय़ांच्या सन्यात विशेष कामगिऱ्या बजावल्यामुळे पेशव्यांनी त्यांना कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांमधील प्रदेश जहागीर म्हणून इनामात दिला. हरिभट यांच्या नातवांपकी परशुराम भाऊ हे विशेष पराक्रमी निघाले. त्यांच्या जहागिरींपकी जामिखडी हा एक टापू होता. त्यांचे पुढचे वंशज गोपाळ रामचंद्र पटवर्धन यांनी १८११ साली जामिखडीचे राज्य स्थापन केले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने गोपाळ रामचंद्र पटवर्धन यांच्याशी संरक्षण करार करून ३००० स्वारांची फौज तनात करावयास लावली. १३६० चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या संस्थानाला ब्रिटिशांनी नऊ तोफ सलामींचा मान दिला.
कोल्हापूरच्या पोलिटिकल एजंटाच्या देखरेखीखाली असलेल्या या संस्थानात जामिखडी, बिद्री आणि कुंदगोळ हे तालुके होते. मराठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत होते. शेतीच्या उत्कर्षांसाठी जामिखडीत जनावरांचे प्रदर्शन भरविले जाई. हातमागांचा संस्थानात प्रसार होऊन वस्त्रोद्योगाचा विस्तार झाला होता. जामिखडीच्या पटवर्धन राज्यकर्त्यांनी आपल्या प्रजेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी दरबार भरविण्याचा परिपाठ ठेवला होता. गोपाळ रामचंद्र यानंतर रामचंद्र गोपाळ, परशुराम रामचंद्र आणि शंकर परशुराम असे जामिखडी संस्थानचे पुढील राज्यकत्रे झाले. परशुराम रामचंद्र यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश लष्कराचे मानद कॅप्टन म्हणून फ्रान्समध्ये महत्त्वाची कामगिरी बजाविली.
१८२० साली जामखंडी संस्थानातून तासगावचे संस्थान निराळे निघाले. गणपतराव पटवर्धन हे याचे पहिले राजे. १८४८ साली लॉर्ड डलहौसीच्या संस्थाने खालसा करण्याच्या मोहिमेत तासगाव संस्थान खालसा होऊन कंपनी सरकारच्या राज्यात सामील केले गेले.
जामिखडी संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...