विनोद जाधव एक संग्राहक

Monday 31 October 2022

फर्जंद शहाजी राजे भाग 3

 

फर्जंद शहाजी राजे
पोस्तसांभार ::आशिष माळी

भाग 3
महाराज साहेब ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र कष्ट करत होते. त्यांची होणारी प्रगती अर्थातच आदिलशाहीच्या काही सरदारांना खुपू लागली होती. अफजल खान, मुस्तफा खान, बाजी घोरपडे, बडी बेगम यांसारखा एक गट महाराज साहेबांना कायम पाण्यात पाहू लागला होता. त्यांनी आदिलशहाला मशहाजी राजांविषयी भडकवले व आदिलशहाच्या मनात विषयी घृणा निर्माण करू लागले.शहाजी राजांवर कित्येकदा कटकारस्थाने रचण्यात आली परंतु बुद्धीच्या आणि शौर्याच्या बळावर त्यांनी ती सर्व कटकारस्थाने मोडीत काढली.__________________________________________
महाराज साहेब फक्त प्रदेश जिंकत राहिले नाहीत तर त्यांनी दक्षिण भारतात आपले राजकीय संबंध इतके मजबूत करून घेतले की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, संताजी धनाजी ,ताराबाई , या मराठ्यांच्या पुढच्या पिढीला ते पावलोपावली मदातीलच आले.
शहाजी महाराज यांचे काल आणि कर्तृत्व पाहताना एक गोष्ट मात्र नक्की दृष्टीआड करता येत नाही ती म्हणजे त्यांचे दोन कर्तृत्ववान पुत्र, एक संभाजी महाराज आणि दुसरे शिवाजी महाराज. दोघेही एकमेकांपेक्षा पराक्रमी आणि सरस. राजाधिराज संभाजीराजे म्हणजे महाराज साहेब शहाजीराजे यांची प्रतिकृती होय. . महाराज साहेब शहाजीराजे यांनी आपले दोन्ही पुत्र इतके कर्तृत्ववान आणि मुत्सद्दी घडवले की नियतीला ही त्याचा हेवा वाटावा. आणि कदाचित त्यामुळेच कि काय नियतीने महाराज साहेबा पासून संभाजी महाराजांना वेगळं केलं. कनकगिरीच्या एका लढाईत थोरले संभाजी महाराज धारातीर्थी पडले. एक पिता आपली स्वप्न आपल्या पुत्रामध्ये बघत असतो. महाराज साहेबांनीही आपली स्वप्न संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांमध्ये बघितली असतील यात शंका नाही. स्वतःचा पराक्रमी पुत्र गमावल्यावर त्या महान पुरुषाला काय यातना झाल्या असतील हे त्यांचे त्यांनाच माहीत.
त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच होदीगेरे या ठिकाणी शिकार करत असताना महाराज साहेबांच्या घोड्याचा पाय एका विवरात अडकला आणि महाराज साहेब घोड्याच्या रिकिबीत पाय अडकून फरफटले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
शहाजीराजे यांच्या मृत्यूने स्वराज्याला फार मोठा धक्का बसला आणि स्वराज्या बरोबरच दक्षिण भारताचाही फार मोठा आधार नाहीसा झाला होता. नंतरच्या पुढच्या पिढीनी व्यंकोजी राजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज ही स्वराज्याची आधार श्रंखला महाराज साहेबांना कधीच विसरली नाही. कारण शहाजीराजे केवळ त्यांचे पूर्वज च नव्हते तर उभे राहिलेल्या स्वराज्यरुपी वटवृक्षाचे मुळाधार शहाजीराजे होते. छत्रपती शाहू महाराज म्हणजे शहाजीराजांचा पणतू ने आपल्या पणाजोबंचे स्वप्न पूर्ण केले.
होदिगेरे या छोट्याशा खेड्यात संधी रुपात घेणारा हा राष्ट्रपुरुष आमच्या हृदयात कायम मराठा साम्राज्याचे प्रतीक रुपाने जिवंत राहील.
  1. शहाजी महाराज माहिती जेधे करीना
  2. मराठ्यांची बखर ग्रँड duff.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...