विनोद जाधव एक संग्राहक

Monday 31 October 2022

फर्जंद शहाजी राजे भाग 2

 

फर्जंद शहाजी राजे
पोस्तसांभार ::आशिष माळी

भाग 2
  • खेळोजी भोसले आणि शहजी भोसले यांच्यात संबंध बिघडले त्यावेळी १६२५ ला शहाजी महाराज नि निजामशाही सोडून पुन्हा आदिलशाही मध्ये गेले . १६२७ मध्ये इब्राहिम आदिल शाह मेल्यानंतर पुन्हा शहाजी राजे पुन्हा निझाम शाहीत गेले . त्यावेळी मलिक अंबर चे निधन झालेले होते , त्याचा मुलगा फतेह खान ह्याच्या हातात निझाम शाहीच्या चाव्या होत्या . त्यावेळी निजामशाहीची ताकद कमी झालेली . जहांगीर चा मृत्यू झाला आणि शाहजहान दिल्लीत सत्तेवर आला . शहाजहान ने दक्खन ला एक मोठी फौज निझामाविरुद्ध पाठवली पण शहाजी महाराजांनी खान्देशात पराभूत केले .१६३० ला लखुजी जाधव झाल्यावर शहाजी राजांनी पुन्हा मुघलकडे परतले .
शिवाजी महाराजांना इतिहासात एवढे मोठे झाले की अनेक लोक त्यापुढे खुजे झाले. मंदिर पाहताना आपण पाया मात्र विसरलो.दख्खनेतील राजकारणात सांभाळले दिल्लीच्या बादशाही कडून निजामशाही कुतुबशाही व आदिलशाही यांचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे आहे हे महाराज साहेब शहाजीराजांनी पुरते ओळखले होते.
त्यामुळे मूर्तुझा सारखा लहान बालक त्यांनी मांडीवर घेऊन निजामशाही ला पुनर्जीवन देण्याचे काम केले. दुर्दैवाने निजामशाही टिकली नाही आणि मुर्तुजाला दिल्लीच्या बादशहाच्या स्वाधीन करण्यात आले व महाराज साहेब शहाजीराजांना आदिलशाहीत नोकरी पत्करावी लागली.
आदिलशाही दरबारात महाराज ना मान खूप होता त्यांनी मराठी लोकांना सरदारां पद द्यायला लावली . शहाजी महाराजांसाठी त्या भागातले छोटे नायक राजे शहाजी राजाना शरण येऊ लागले. शहाजी राजांनी या लहान लहान राजन अंकित बनवून मुळे त्यांची राज्य वाचली नाहीतर आदिशाही ला यांची राज्ये खुपत होती पण शहाजी राजांनी या लोकांना घेऊन अदृश्य फळी केलेली . आदिलशहा पेक्षा हे सर्व सर्व जण शहाजी राजन मनात होते . महाराज साहेबांच्या मुत्सद्देगिरीने व तलवारीच्या धाकाने आदिलशाहीच्या सीमा चार पटीने वाढल्या.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...