विनोद जाधव एक संग्राहक

Friday 9 December 2022

गानिमिकावाच्या जनक मलिक अंबर भाग १

 

गानिमिकावाच्या जनक मलिक अंबर
लेखन :ओंकार ताम्हणकर ( चारुस्थली )

भाग १
एकेकाळी गुलाम असलेला, पुढे निजामशाहीचा पडता डोलारा सांभाळणारा, सामान्य जनतेला सुखावह शासनपद्धती सुरू करणारा मलिक अंबर!
मलिक अंबर हा एक ऍबेसिनिअन(हबशी, सिद्दी) १५४६ च्या असपास बगदाद येथे जन्मला. तिथे त्याला मीर कासीम नावाच्या व्यापाऱ्याने विकत घेतले आणि पुढे अहमदनगर येथील चेंगीजखान नावाच्या निजामशाही सरदाराला विकले.
पुढे तो निजामशाहीत १५० स्वरांचा नायक झाला. दरम्यान आदिलशाहीला जाऊन मिळाला. तेथे त्याला हीन वागणूक मिळल्यामुळे पुन्हा १५९४ मध्ये निजामशाहीत परतला. त्यांनतर त्याच्या साहसी वृत्तीमुळे चांदबीबीने त्याला आपल्या पक्षात करून घेतले.
निजामशाहीत चाललेल्या अनागोंदीचा फायदा घेऊन मुघल सम्राट अकबर ने अहदनगर वर हल्ला केला. त्यावेळी मलिक अंबर चांदबीबीबरोबर शौर्याने लढला. याच धामधूकीत चांदबीबीचा खून झाला. त्यानंतर बुऱ्हाण निजामशहा चा नातू बहादूर व पुढे त्याचा भाऊ बुऱ्हाण हा निजामशाही गादीवर बसला. या बुऱ्हाण ला गादीवर बसविण्यात मलिक अंबर ने मदत केली होती.
वर उल्लेख केल्याप्रमाणे अकबराने १५९५ साली अहमदनगर ला वेढा घातला आणि अहमदनगर जिंकून घेतले. पुढे मलिक अंबर ने मराठा सरदारांच्या गनिमी कावा या युद्ध पद्धतीने मुघलांना डोंगराळ प्रदेशात खेचून त्रस्त करण्यास सुरुवात केली. गनिमी काव्याचा मोठ्या प्रमाणात वापर शिवाजी महाराजांच्या आधी मलिक अंबर याने केला होता! मलिक अंबरच्या या सतत च्या हल्ल्यांना कंटाळून पुढे ७-८ वर्षांनी मुघलांनी मलिक अंबर शी तह केला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...