विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 23 April 2023

*श्रीमंत सरदार पाटणकर वाडा*🚩 *पाटण*

 


















*श्रीमंत सरदार पाटणकर वाडा*🚩
*पाटण*
*श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याचा थोडासा इतिहास*
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात तसेच ते स्वराज्य आपल्या पराक्रमाने रक्षिण्याच्या कार्यात अनेक मराठा घराण्यांनी पिढ्यांनपिढ्या मोलाचे योगदान दिलेले आहे. या योगदानात चालुक्यवंशीय पाटणकर घराण्याचे योगदान उल्लेखनीय आहे.
सरदार पाटणकर घराण्यातील वंशजांनी स्वराज्य उभारणीच्या कार्यात शत्रू सैन्याविरुध्द लढताना ते शौर्यगाजवले, शर्थीचे पराक्रम केले, प्रसंगी रक्त सांडून स्वराज्याचे रक्षण केले त्याबद्दल छत्रपतीनी सरदार पाटणकरांचा उचित गौरव केल्याची ऐतिहासिक साक्ष म्हणजे ही शिवकलीन पत्रे होत.
या ऐतिहासिक पत्रावरुन ध्यानात येते की, सरदार पाटणकरांना एतिहासात आपले नाव अजरामर करुन महाराष्ट्रधर्म व स्वामीनिष्ठा सांभाळली. आपल्या पराक्रमाने आणि स्वामीनिष्ठेने अनेक मान- सन्मान, किताब, जहागिरी वतने आणि सरदारकिचा बहुमान मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार पाटणकरांना सन १६७८ मध्ये लिहिलेले एकमेव पत्र उपलब्ध आहे. पाटणकर घराण्यातील यशवंतराव लढाईत मारले गेले म्हणून महाराजांनी बाळाजीराव व चांदजीराव पाटणकरांचे सांत्वन करणारे हे पत्र लिहल आहे.या पत्रात महाराज म्हणतात, *'' तुम्ही मानाचे धनी वतनी लोक आहांत ''* या पत्रातील 'जकुरावरुन शिवशाहीतमध्ये सरदार पाटणकरांना मोठा मान सन्मान होता, वतनदार देशमुख म्हणून मोठी प्रतिष्ठा होती हे लक्षात येते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्त्येनंतर अनेक वतनदार सरदार लोक स्वार्थापोटी मोगलांना जाऊन मिळाले. पण स्वराज्याच्या या बिकट परिस्थितीत सरदार पाटणकर मात्र छत्रपतींच्या सेवेसाठी एकनिष्ठ राहिल्याची साक्ष या ऐतिहासिक दस्तऐवजावरून लक्षात येते. सरदार पाटणकर घराण्यातील कोणतीहीती वंशज वतनच्या आशेने मोगलांना मिळालेला नाही हे या घराण्याचे नमूद करण्यासारखेमोठे वैशिष्ट्य आहे.
छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात मराठा दौलतिची एक निर्णयकी म्हणजेच ' ना राजा ना राज्य ' आशीच अवस्था निर्माण झाली होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात तर या घराण्याणे उल्लेखनीय स्वामीसेवा व स्वराज्य रक्षणाची कामगिरी केली. त्या बद्दल छत्रपतींनी सेनापतीच्या खालोखाल असणारे पद हे चांदजीराव पाटणकरांना बहाल केल्याचे घ्यानात येते . संताजी घोरपडे व धनाजी जाधव या सेनापतींन बरोबर राहुन खुप उल्लेखनीय काम त्यानी केले. रामराव पाटणकर व पदाजीराव पाटणकर यांच्याकडे शिलेदाराची पंचसहस्त्री होती. संताजी व धनाजी या मात्तबर सेनानीत वितुष्ट निर्माण झले त्यावेळी या उभय सेनानींत दिलजमाई घडवून आणण्याचे प्रयत्न चांदजीरावानी केला.
छत्रपती राजाराम महाराजांनी पाटणकरांना लिहलेला १६९० एका पत्ररात १२ गावे इनाम दिल्याचा उल्लेखही आढळतो. १० नोव्हेंबर १६८१एका पत्रात पाटणकरांनी स्वामीकार्य केल्याबद्दल त्यांना एक हत्ती बक्षीस दिल्याचे समजते
इ.स.१६९२ मध्ये संताजी घोरपडे यांच्या फौजांनी कर्नाटकात जुल्फिकारखानाचा जिंजीचा वेढा उठवला. या मोहिमेत चांदजीराव पाटणकरांनी आपल्या जमावासह शर्तीचा पराक्रम केला. या शौर्याबद्दल संपुष्ट होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना संपूर्ण पाटण परगण्याची इनामाची सनद १४ ते १६९३ दिली.
यातून आपल्याला आजुन एक समजते की कोल्हापूर करवीर संस्थान चे श्री छत्रपती राजाराम महारा(फ्लॉरेन्सला निधन झालेले ) करवीर संस्थान हे ( नागोजीराव पाटणकर )पाटणकर घराण्यातून दत्तक आहेत.
बहामनी सुल्तानाकडून ज्योत्याजीराव पाटणकर यांना दातेगड व गुणवंतगड ची देशमुखी भेटली नंतर विजापूर च्या बादशाहकडून त्यांना पाटण ची ६० गावांची देशमुखी भेटली . १५७२ च्या वेळेस ज्योत्याजीरावणी पोर्तुगीजचा बिमोड समुद्रकिनारी केला होता . शिवकाळात जे देशमुख घराणी स्वराज्यात सामील झाली त्यापैकी पाटणकर हे एक घराणे होते , राजाराम महाराजांच्या काळात या घराण्याला पाटण मधील वाडा व ६० गावांची सनद देण्यात आली.
वाचनामध्ये असा आढळतो की त्या काळात सरदार पाटणकर वाडा हा ६० हजार रुपयात बांधून झाला होता.
श्री गगनगिरी महाराज गगनगड हे पण पाटणकर घराण्यातील आहेत.
●लेखन :- सिध्देश पवार
सरदार पाटणकर घराण्याचे वंशज श्री.विक्रमसिंह पाटणकर (माजी सार्वजनीक बांधकाम व पर्यटनमंत्री,महाराष्ट्र राज्य ) यांनी मला त्यांचे दोन पुस्तके भेट दिली.या बद्दल मी त्यांचा शतशः आभारी.
●संदर्भ :-
१ )छत्रपतींचा पत्रव्यवहार सरदार पाटणकर घराण्याचे दस्तऐवज, *संपादक - प्रा.दादासाहेब डी चव्हाण
2) क्षत्रिय कुलावंत चालुक्य - सोळंखी - साळुंखे उर्फ श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याचा इतिहास
3) श्रीमंत सरदार पाटणकर हुजूरवाडेकर (चालुक्य उर्फ साळुंके) क्षत्रिय कुळाचा इतिहास व ऐतिहासिक कागदपत्रे ,*लेखक - सुनील दापुरकर
शेवटी पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🚩
आपला सिध्देश पवार
gad_durganchya_dharkari_007

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...