विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 24 June 2023

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा भाग २

 

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा
लेखन ::निखील पाटील (INFOBUZZ)


भाग २
उमाबाईंना एकूण ३ मुले, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने आणि इतर दोन्ही मुले वयाने लहान असल्याकारणाने त्यांच्याकडे हि जबाबदारी सोपविता येत नव्हती. या परिस्थितीमुळे घराणे व वतन दोन्ही वाऱ्यावर आले होते. घराण्यात कोणीही वतन संभाळण्यायोग्य नसल्यामुळे दाभाड्यांचे वतन नाहीसे होण्याच्या मार्गावर होते. एकंदरीत पाहता आता उमाबाईच घरातल्या मुख्य आणि कर्त्या स्त्री म्हणून राहिल्या होत्या. साहजिकच त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या म्हणूनच त्यांनी आणखीन एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे स्वतः वतन सांभाळणे होय.
उमाबाईंनी हे मोठे आव्हान स्वतः घेतले आणि समर्थपणे पेलले देखील. त्यांनी घरदार तर संभाळलेच, शिवाय दफ्तरीचे कामकाज पहिले, सेनेचे नेतृत्व देखील केले, वेळप्रसंगी स्वतः सैन्यासोबत लढाईत उतरून लढल्या सुद्धा. एक स्त्री असून त्या काळात असे धाडस करणे हे फार मोठे पाऊल होते. त्यांचे शौर्य, कर्तव्यदक्षपणा आणि कामकाज लक्षात घेऊन शाहू महाराजांनी त्यांना सरदार केले आणि उमाबाई दाभाडे आता सरदार उमाबाई दाभाडे झाल्या. त्यांना सरसेनापती व सेना सरखेल हे अधिकार देखील देण्यात आले.
उमाबाई दाभाडे या मराठ्यांच्या पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. एक स्त्री म्हणून उमाबाईंचे धाडस खरंच कौतुकास्पद आहे. परंतु उमाबाईंच्या या निर्णयाला सगळ्यांचेच समर्थन होते असे नाही, अनेक वेळा अनेक प्रकारचे विरोध उमाबाईंना झाले. पुढे जेव्हा रामराजे सत्तेवर छत्रपती म्हणून आले परंतु ते नामधारीच राहिले आणि त्यांच्या अनेक सरदारांनी उमाबाई एक स्त्री आहेत म्हणून त्यांना कमी लेखून त्यांच्या अधिकारातील बराचसा प्रदेश कमी करण्याचा प्रयत्न केला. इतके विरोध होऊनही उमाबाईंनी आपले वर्चस्व टिकवून ठेवले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...