विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 22 June 2023

शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया भाग २

 



शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया
भाग २
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
२ ) तारापूरची लढाई
दुसर्या लढाईमध्ये नजर टाकूया तारापुरच्या लढाई वर. गोष्ट आहे सुमारे १६८३ च्या आसपासची. ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या वाक्याप्रमाणे औरंगजेबाने इंग्रज, फ्रेंच, डच, इत्यादींना शंभूराजाना विरोध करण्याचे आदेश पत्रव्यवहाराने दिले. यापुढे पोर्तुगीजाने मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजि यांना अटक केली. हे समजताच स्वतः शंभूराजे सुमारे १००० घोडदळ व २००० सैन्य घेऊन आले आणि तारापूरच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि बाहेरील शहर बेचिराख केले.
तारापूर मधील वाखारींच्या अधिकार्यांनी मराठी फौजेवर हल्ला केला आणि सोबतच गोव्याकडुन मदत मागविली. पोर्तुगीज येत आहेत म्हणून मराठ्यांनी त्यांची रसदच अडविली त्यामुळे, पोर्तुगीज जेरीस आले आणि अखेर त्यांनी मराठ्यांचे वकील येसाजी यांची सुटका केली. पुढे पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी शंभूराजांनी आपली मोहीम गोव्याकडे वळविली आणि त्यामुळे तारापूर ताब्यात येता येता राहिले.
३ ) चौलची लढाई
आता आपण पाहूया चौलची लढाई. सुमारे १६८२ च्या सुमारास शंभूराजांनी डिचोली येथे दारूगोळ्याचा कारखाना सुरु केला होता. यामुळे गोवेकर पोर्तुगीझ नाराज झाला आणि त्यांनी कोकणात रयतेची छळवणूक सुरु केली. याच काळात मराठ्यांची सिद्दीशी चकमक सुरूच होती आणि त्यातच पोर्तुगीझांनी चौल नजीकच्या किनाऱ्याजवळ सिद्दीच्या सैन्याला आणि गलबतांना आश्रय देऊ केला.
हि खबर जशी शंभुराजांना लागली तसे शंभूराजांनी आपले सैन्य घेऊन मोहीम चौल कडे वळविली. राजांच्या सैन्यांनी चौलचे ठाणे गाठले आणि या ठाण्याबाहेर तट उभारण्याचे काम सुरु केले. पोर्तुगीझांनी मराठ्यांवर हल्ले सुरु केले आणि मग मराठ्यांनी सुद्धा जोरदार प्रतिउत्तर दिले आणि शेवटी चौलचे ठाणे ताब्यात घेतलेच आणि तट बांधून पूर्ण केला आणि विजय मिळविला

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...