विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 August 2023

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग ८

 



मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ८
“… अब्दाली दिलीस दाखल झाला. नजीब, इतर खासे आसामी व बापुजी महादेव वकील वगैरे मिळोन सहा कोस दिल्लीस राहता. फौज त्याची भारी. नित्य तीस कोस घोडा धावतो. सारा पेंच आम्हावरी पडिला. आम्ही फारीदाबादेस येत बारा कोस अफगाण फौज पाठीवर आली. वजीर कैद. बादशाह कैद. दिल्लीतील फितुऱ्या (नजीब) धरिता एक लाख स्वर त्याकडे जमा झाले. एक सुरजमलाकडे नित्य पत्रे पाठवितो. बादशाहचे रात्रंदिस म्हणणे की पातशाही बाळाजी रायाची आहे. सरदारास सत्वर बोलावून कार्य सिद्धीस नेणे. घरात आता कवडी नाही. राहिला मुलुख तोही घेणे. समशेरबहादर व नारोशंकर मिलाफी झाले आहेत. वकील बापुजी कडे निराळा जाबसाल लाविला आहे. त्यांनी समशेरबहाद्दरास ग्वालेरीस गोवून आम्हावरी सत्यानाश करविला. त्यास आमच्या सहाय्यास येवो दिले नाही. नारोशंकरांनी नामर्दी करून जो घात करविला तो त्याची शिरच्छेदच करावासा केला. बापू वकील मात्रा गमनी. तो व त्याची कलावंतीण सडी दिल्लीत आहे. आता आशा दोन. नादिरप्रमाणे अब्दाली शाह हेच वजीर व बादशाह स्थापून माघार फिरला तरी आपला पाया कायम होईल अन्यथा काही तजवीज आपण व जाठ मिळोन करावी व ह्याच कामासाठी दिल्लीभोवती मरमर फिरतो. धरणीकंप झाला तेथे आमची काय कथा ?….याउपरी श्रीमंतांनी आमचे श्रमावरी काहीतरी दृष्टी द्यावी. बापू वकील सर्वथा लबाड आहे. सुरजमल्लाचे अवसान ठिकाणी नाही. नारोशंकर परम दुष्ट मिळोन अंतर्वेद राखील तर उत्तम अन्यथा बरे नाही !”

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...