विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 27 September 2023

इंग्रजांच्या पत्रात "अत्यंत धोरणी राजा शिवाजी" असा उल्लेख

 

२५ सप्टेंबर इ.स.१६७१
इंग्रजांच्या पत्रात "अत्यंत धोरणी राजा शिवाजी" असा उल्लेख
पत्रासारसंग्रहातील एकुण तीन पत्रे वाचनाच्या सोयीकरीता एकाखाली एक दिली आहेत. पत्रांचा कालावधी हा सन १६७१ मधील एप्रिल ते सप्टेंबर असा सहा महिन्यांचा आहे. अवघ्या सहा महिन्यात शिवाजी माहाराजांच्या संबधी धुर्त इंग्रजांची तीन वेगवेगळी मते बदललेली दिसतात.
दिनांक ८ एप्रिल सन १६७१ रोजीच्या पहिल्या पत्रात इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध मोठे मोगल सैन्य येत असल्यामुळे आनंदात आहेत.
दिनांक १ मे सन १६७१ रोजीच्या दुसर्या पत्रात इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांचा "दरोडेखोर शिवाजी" असा उल्लेख करत आहेत.
दिनांक २५ सप्टेंबर सन १६७१ रोजीच्या तीसर्या पत्रात इंग्रज शिवाजीचा " पूर्वेकडीलअत्यंत धोरणी राजा शिवाजी" असा उल्लेख करत आहेत.
अवघ्या चार महिन्यापूर्वी दरोडेखोर म्हणणार्या इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराज "अत्यंत धोरणी राजा" भासू लागले. यातच दडले आहे शिवछत्रपतींच्या कुटनिती, राजनिती, शौर्य, धैर्य, पराक्रम, राज्यव्यवस्था, न्याय आणि दूरदृष्टीचे सार..
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...