विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 23 September 2023

भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर… भाग ३

 


भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर…
भाग ३
1804 च्या सुरुवातीला कर्नल fawcett ला बुंदेलखंडात हरवले.नंतर कर्नल मांसोन आणि लेऊकें ला बुंदी आणि कोटा मध्ये हरवले.
1804 मध्य ब्रिटिशनी शाह आलम 2 ला देखील कैदेत ठेवले त्यावर हल्ला करून बादशहा ला सोडवले.नंतर मेजर फ्राझेर ला यशेत राव नि हरवले.टेंव mason या ब्रिटिश योद्ध पळून गेला फरुखाबाद येथे यशवंतरावा आणि लेक, मानसीओन ,कर्नल मरे ,कर्नल दोन, जनेरल स्मिथ,कर्नल जेटलांड,जनेरल जॉन, सेटन यांच्यात तीन महिने युद्ध चालले .या युद्धाने पूर्ण भारत मध्ये यशेत राव चे कौतुक झाले त्यात एक वेळी तर यशवंतराव नि 300 ब्रिटिश सैनिकांचे नाक कापले.पण इंग्रजनी एक खेळी खेळली त्यांनी होळकर समाजाच्या तुकडे करून जो इंग्रजांना मदत करेल त्याला देण्याचे जाहीर केले.मीर पंढरी नि भवानी शंकर ने होळकर ची साथ सोडून इंग्रजांना सामील झाले.आमिर खान ला टोंक ची जहागीरदार दिल्ली तर भवानी शंकर ला दिल्ली चा काही भाग दिला…आज पण भवानी शंकर च्या दिल्ली मधील हवेली ला नमक हराम की हवेली असे ओळखतात .सररॉबर्ट लिहितात की होळकर हे युद्ध जिंकत असताना अचानकपणे जाट राजा रंजितसिंग ने इंग्रजांशी करार केला त्यामयले होलकर तिथून निघून गेले
होते.यशेतरावणी ऍक्टरोनी आणि बेरने यावर हल्ला केला.
त्यांच्या मागणीला – दोआब आणि बुंदेलखंडमधील प्रदेश द्यावा यास – ब्रिटिशांनी नकार दिला तेव्हा होळकरांच्या सैन्याने पुष्कर आणि अजमीर (अजमेर) लुटले. तसेच यशवंतरावांनी आपल्या सैन्यातील तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना( व्हिकर्स, डॉड व रियन) कंठस्नान घातले (१८०४). ब्रिगेडियर विल्यम मॉन्सनचा पराभव केला. यशवंतरावांनी गनिमी युद्धतंत्राने इंग्रजांना हैराण केले. त्यांच्याकडे ६०,००० घोडदळ, १६,००० शिपाई व १९२ बंदुका होत्या. त्यांचा सेनापती हरनाथ सिंग याने दिल्लीवर हल्ला केला. ). त्यानुसार त्यांस बुंदी टेकड्यांच्या उत्तरेकडील प्रदेश व टोंक, रामपुरा व इंदूर मिळाले. स्थिरस्थावर झाल्यावर यशवंत-रावांनी सैन्यात सुधारणा करून निरुपयोगी फौज काढून टाकली. बाणपुरा येथे तोफा ओतविण्याचा कारखाना काढला (१८०७).1806 मध्ये खंडेराव(द्वितुय)आणि काशीराव होळकर चे 1808 मधील निधन, सततचे युद्ध, अपेक्षा-भंग, तापट स्वभाव यांमुळे यशवंतरवांचा ब्रेन स्ट्रोक झाला. या व्याधीतच भानपुरा येथे त्यांचे निधन झाले. त्या काळात (१८०९–११) त्यांची उपस्त्री तुळसाबाई हीच सर्व राज्य चालवीत असे मात्र राज्य-कारभारात अनागोंदी माजली तेव्हा तिने यशवंतरावाचा औरस पुत्र तिसरे मल्हारराव (कार. १८११–३३) यांच्या नावे राज्य केले.
तळ टिपा:
1]त्याशिवाय ब्रिटिशांची अनेक पत्र आहेत
2]मराठी मध्ये ना स इनामदार यांनी त्यांच्या जीवनानावर झुंज आणि संजय सोनवणी यांनी पण सुंदर कादंबरी लिहली आहे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...