विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 27 September 2023

जंजिरेकर सिद्धी व मराठे यांच्यात ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम

 

२५ सप्टेंबर इ.स.१७३६
जंजिरेकर सिद्धी व मराठे यांच्यात ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम समाप्त झाली
मराठी फौजा १७३१-३२ पर्यंत विविध कारणास्तव विविध ठिकाणी अडकलेल्या मराठी फौजा इ.स.१७३२-३३ मध्ये मोकळ्या झाल्या. थोरल्या बाजीरावने फेब्रुवारी १७३२ ला कुलाब्याला जाऊन सेखोजी आन्ग्रेशी बोलणी केली. ब्रह्मेंद्र स्वामींच्या सततच्या टोचणीमुळे शेवटी इ.स.१७३३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धीस शासन करण्यासाठी कारवाई करण्याचे ठरविले. त्याच दरम्यान फेब्रुवारी १७३३ मध्ये याकुत्खान मरण पावला व त्याचा मोठा मुलगा अब्दुर रहमान मराठ्यांच्या आश्रयाला आला. उन्हाळा सुरु असताना छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्याच्या हाताखाली एक फौज राजपुरी, जंजिऱ्यावर तर प्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली दुसरी फौज राजगड व आसपासचा भाग काबीज करण्यासाठी रवाना केली. मराठी लष्कर अचानक चालून आल्यामुळे त्याला फारसा प्रतिकार झाला नाही व सिद्धीचे सरदार किल्ल्यात पळून गेले.पेशव्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा नव्हत्या तसेच सिद्धीची रसद तोडण्यासाठी तो सर्वस्वी सेखोजी आंग्रे वर अवलंबून होता ज्याला छत्रपतींनी आपल्या मुलखात हस्तक्षेप करणे आवडले नव्हते. परिणामी तो ताबडतोब पेशव्याच्या मदतीस आला नाही. इकडे सिद्धी सरदारांनी मुंबईकर इंग्रजांशी संधान बांधून इंग्रजी आरमार जंजिऱ्यात आणले. पावसाळा पण जवळ आला होता.पेशव्याने जंजिरा सर करणे अवघड असल्याचे छत्रपतीना कळविले व रायगड तेथील किल्लेदाराला लाच देऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण बातमी फुटून दिलेले पैसे वाया गेले.पुन्हा साताऱ्याहून पैसे मागवि पर्यंत प्रतिनिधीच्या फौजा २५ मे ला रायगडला पोहचल्या व त्यांनी ८ जून ला किल्ला सर केला. प्रतिनिधी व पेश्व्यातील परस्पर स्पर्धा, आकस इ.मुळे त्यांच्या फौजात परस्पर सहकार्य कठीण झाले. पेशव्याने छत्रपतीना पत्र लिहून इंग्रजांच्या मध्यस्थीने युद्धबंदी घडवून आणली व बाजीराव ११ डिसेम्बर १७३३ ला जंजिर्याचा वेढा उठवून निघून गेला. पेशवा परतताच सिद्धीच्या सरदाराना चेव येऊन त्यांनी मराठ्यांनी जिंकलेल्या ठिकाणांवर, रायगडावर हल्ले सुरु केले. छत्रपतींनी धावाधाव करून फौज जमवून कोंकणात रवाना केली. पाचाड जवळ १० जानेवारी १७३४ ला सिद्धी लष्कराला मराठ्यांनी घेरून त्यांचा धुव्वा उडवला, प्रमुख सरदार सिद्धी अंबर अफवानी त्यात मारला गेला. सेखोजी आंग्रे १७३३ मध्ये मृत्यू पावला. त्याच्या नंतर सरखेल झालेला संभाजी पेशवे व सातारा दरबार बरोबर फटकून वागायचा. त्यामुळे अलिबागला पेशव्याने मानाजी अंग्रेस नेमले होते. चिमाजी अप्पा १८ एप्रिल १७३६ ला रेवस जवळ फौज घेऊन दाखल झाला. ह्या फौजेने सिद्धी सात, सिद्धी याकुब, सुभानजी घाटगे आदी सिद्धी सरदाराना ठार केले व सिद्धी चा शेवट केला. शेवटी २५ सप्टेंबर १७३६ ला पूर्वी ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम समाप्त झाली
‘’युद्धाचे वर्तमान तपशीलवार श्रवण करून राजश्री स्वामी ( छत्रपती शाहू महाराज ) बहुत संतोष पावले.भांडी मारिली,नौबत वाजविली,खुशाली केली.सिद्धी साता सारखा गनीम मारिला,हे कर्म सामान्य ण केले ऐसा स्तुतिवाद वारंवार केला.आप्पास वस्त्रे व पदक व तलवार बहुमान पाठवला.तसाच मानाजी आंग्रे यांचाही बहुमान केला.’’

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...