विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 27 September 2023

छत्रपती प्रतापसिंह महाराज व इंग्रजांच्यात अकरा कलमी तह

 

छत्रपती प्रतापसिंह महाराज व इंग्रजांच्यात अकरा कलमी तह
१८०८ मध्ये धाकटे शाहू महाराज मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह याला राज्याभिषेक करण्यात आला. प्रताप सिंह अल्पवयीन असल्याने प्रारंभीची काही वर्षे कारभार मातोश्री माईसाहेब बघत असत. १८११-१२ पर्यंत तरी छत्रपती आणि बाजीराव यांचे संबंध चांगले होते. त्यानंतर हे संबंध उत्तरोत्तर बिघडत गेले,पुणे दरबार कडून छत्रपतींच्या खर्चासाठी देण्यात येणाऱ्या रकमा कमी पडत गेल्या, छत्रपती न साठीचे नजराणे पण साताऱ्या ऐवजी पुण्यात वळवले जात, वगैरे बऱ्याच तक्रारी, गाऱ्हाणी छत्रपतींनी बाजीरावाकडे केल्या होत्या.
छत्रपती असूनही कैद्या सारखी अवस्था, पारतंत्र्य, बाजीरावच्या स्वतःच्या स्थानाचा पण भरोसा नाही, अशा स्थितीत प्रतापसिंह महाराजांनी नरसू काकडे व बळवंत मल्हार चिटणीस ह्या विश्वासू लोकांमार्फत इंग्रजांशी-एलफिस्टन -बरोबर बोलणी सुरु केली. हे बाजीरावास कळताच त्याने 'आम्हास अनुकूल असावे' अशी छत्रपती प्रतापसिंह न माहुली मुक्कामी विनंती केली, छत्रपतींचे लढाई च्या काळात महत्व जाणून बाजीरावाने महाराजांना इंग्रजां बरोबरच्या संघर्षात आपल्या सोबतच ठेवले होते. परंतु छत्रपती व इंग्रज ह्यांच्यात आधी ठरल्या प्रमाणे आष्टी मुक्कामी जनरल स्मिथ ने बाजीराव वर छापा टाकला, जनरल स्मिथच्या फौजेत प्रतापसिंह, मातोश्री व अन्य कुटुंबीय मिसळले. यापूर्वीच इंग्रजांनी सातारा शहर व किल्ला काबीज केला होता पण राजा अध्याप हाती आला नव्हता. एल्फिनसटन व प्रतापसिंह यांची प्रथम भेट ४ मार्च १८१८ रोजी बेलसर( सातारा) येथे जनरल स्मिथच्या तळावर झाली. १० एप्रिल १८१८ ला प्रताप सिंह महाराजांनी सातार्यात प्रवेश केला, याच दिवशी इंग्रजांनी त्यांची 'राजा'म्हणून पुनःस्थापना केली. जेम्स ग्रांट डफ ची पोलिटिकल agent म्हणून नेमणूक झाली. छत्रपती प्रतापसिंह गादीवर आरूढ जरी एप्रिल १८१८ मध्ये झाले होते तरी इंग्रजांबरोबर तह होण्यास सप्टेंबर १८१९ उजाडावा लागला कारण तोपर्यंत बाजीराव पूर्णपणे शरण आला नव्हता. कंपनी सरकार व प्रतापसिंह महाराज ह्यांचात २५ सप्टेंबर १८१९ ला अकरा कलमी तह झाला.
राज्यकारभारा मध्ये प्रतापसिंह तयार झाल्यावर राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण असे सातारा राज्य प्रतापसिंह ह्यांना ग्रांट डफ ने सोपविले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...