विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 11 September 2023

#स्वराज्यनिष्ठ #गणोजीराजे #शिर्के

 

सावधान...बुद्धिभ्रष्ट लेखकांनो स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के निर्दोष असून महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख खात्याचे माहिती अधिकारातील खुलासा पत्र जाहिर झाले असून गणोजीराजे शिर्के यांच्या बद्दल कलंकित इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून लिहुन अथवा चित्रपट, मालिकातुन प्रदर्शित करू नका किंवा सोशियल मिडियातही पोस्ट शेयर करु नये अन्यथा असे खोटारडे आरोप केल्याचे निदर्शनास आल्यास इतिहासप्रेमी मंडळ तात्काळ गुन्हा दाखल करणार - #शंभुसेन #संघटन
👉

#स्वराज्यनिष्ठ
#गणोजीराजे #शिर्के#छत्रपती #संभाजीमहाराज यांच्या गोड आणि प्रेमळ #नात्यातील कलंकाचे निवारण झाले असून त्या #संदर्भात आणखी काही वस्तुस्थितीसह,परिस्थितिजन्य म्हणजेच प्रत्यक्षदर्शी जिवंत पुराव्यानुसार महत्वाची #पूरक #माहिती शेकडो वर्षापुर्वीपासून उपलब्ध असताना काही समाजकंटक लेखकांनी ध.. चा मा..तसेच पराचा.. कावळा.. करुन आवर्जून शिर्के घराण्यांचे कर्तुत्व समाजासमोर न आणता काही समाजकंटक लेखकांनी जवळच्या नातेवाईकांनाच फ़क्त कलंकित केले होते पण खालील प्रत्यक्षदर्शी माहितीमुळे त्यांचे कपट- कल्पित मनसूबे पर्दाफाश झाले आहेत.
👉कोकणातील संगमेश्वर येथे अचानक घनघोर युद्ध झाले असताना त्यावेळी छत्रपती संभाजीराजांसह अनेक राजेशिर्के मंडळींनी व सैन्यांनी तीव्र लढा दिला पण दुर्दैवाने त्यात राजांसह अनेकांना अटक झाल्यानंतर सर्वांनाच औरंगजेबचा सरदार मुक़र्रबखान नेमके कुठे घेऊन जातो यांची खबर-बातमी कानोसा मिळवण्याकामी कुलमुखत्यार महाराणी येसुबाईंनी आपल्या माहेरच्या मंडळींना म्हणजेच सख्खे भाऊ गणोजीराव राजेशिर्के व पित्यास स्वराज्यनिष्ठावंत पिलाजीराव राजेशिर्के यांना सांगितले की, शंभुराजांच्या मार्गाचा-माग काढत जाऊन वेळप्रसंगी मोघलांच्या विरोधात वेळप्रसंगी आणखी तीव्र प्रतिकार करण्यास सांगितले होते त्यानुसार..
गणोजीराजेसह त्यांचे इतर तिन्ही बंधु म्हणजेच पिलाजीराव यांचे शूरवीर मुले वाघोजीराव,गणोजीराव, संभाजीराव, देवजीराजे ही चारही मुले व इतरही असंख्य राजेशिर्के मंडळी व इतर हजारो सैन्य घेऊन आपल्या जावयास/मेहुण्यास मदत करण्यास गेले असताना..
त्यावेळेच्या परिस्तिथिनुसार गणोजीराजे शिर्के यांनी प्राचीन गामिनी कावा वापरत मोघलांच्या छावणीत ठीक-ठिकाणी वेशांतर करुन प्रवेश करत मोठे नियोजन केले होते परंतु त्यात अनेक विघ्ने,अडचणी आल्या होत्या..
त्यातील काही अडचणी व त्यातून काढलेले गामिनी कावा मार्ग खालीलप्रमाणे सांगता येतील.
💪 मार्गामध्ये काही राजेशिर्के मंडळी पकडली गेली असल्याने त्यांनी "गामिनी कावा" वापरत आपली आडनावे वेगळी सांगून आपल्या सुटका करुन घेतल्या होत्या म्हणुन त्यासर्व राजेशिर्के घराण्यांचे आजही..
रिकामे, कुंभार,पडवळ, सह अन्य काही वेगवेगळी आडनावे पडले आहेत त्या मंडळीचे वंशज आजही जिवंत आहेत तर काही राजेशिर्के मंडळीनी विविध जातिवर्णीय व्यावसायीकांचे वेशांतर करुन म्हणजेच.. नाभिक बनून,मंदिरात गुरव होऊन, काहीजन पालखीचे भोई बनून, काही पाणी देणारे पखाले होऊन, कुंभाराचे साहित्य विकणारे बनून तसेच अन्यही व्यावसायिकांचे वेशांतर करुन मोघलांच्या छावणीत प्रवेश केला होता आणि नंतरही अनेक वर्ष (काळ) मोघलांच्या छावणीत त्या वेशांतरितांना दबावाखाली तोच व्यवसाय करण्यास भाग पडावे लागले म्हणुन आजही (उदा.नाभीक, गुरव,पालखीचे भोई, कुंभार इतर अन्य जातीत ही शिर्के आडनावे आढळतात हे ऐतिहासिक संदर्भ इतिहासात तर्कशास्त्रानुसार सांगता येतीलकारण की, विशेष म्हणजे हजारो वर्ष राजेशिर्के घराणे हे फक्त पंचकुळी- क्षत्रिय मराठा जातीत असताना देखील 1689 नंतरच इतर जातीत शिर्के अडनावाची घरे असणे ही देखील महत्वाचीच माहिती असून तर्कशास्त्रानुसार आपणास(इतिहासकाराना) लक्षात घ्यावी लागेल
👆तसेच कोकणातच दिसणारा राजेशिर्के घराणा आजही कोकणातील शृंगारपूर पासून- संगमेश्वर- पेड़गावचा बहादुरगड- तुळापुर- वढु-बुद्रुक पर्यंतच्या मार्गावर तसेच ( किल्ले बहादुरगडाच्या तटबंधी लगत व बहादुरगड परिसरात तसेच 25-30 किलोमीटर अंतरावर म्हणजेच श्रीगोंदा तालुक्यात शिर्के घराण्यांच्या त्याकाळच्या छावण्याच पहावयास आढळतात ( म्हणजे आजची शिर्के घराण्यांची संपूर्ण गावच अस्तित्वात आहेत ) तसेच पेडगाव मध्ये म्हणजे बहादूरगडावर देखील आजही काही स्थायिक शिर्के घराणे आढळतात आणि हे राजे-शिर्के घराणे मोगलांना न डगमागता तेच आडनाव कायम ठेऊन बहादुरगडावर नजर ठेऊन होते तर काही शिर्के मंडळीनी त्याप्रसंगी वेशांतर करुन गडामध्ये प्रवेश करत असताना अनेकांनी बलिदानही दिल होत म्हणून आजही शिर्के मंडळी या परिसरात प्रत्यक्ष जीवन जगताना दिसत आहे नंतर तेव्हा पासून शिर्के घराणे अवघ्या महाराष्ट्रात विखुरलेले दिसत आहे..
💪तर काही राजेशिर्के मंडळींना गामिनी कावा करत असताना पकडल्याने मोघलांनी त्यांचे हात पाय कलम करुन त्यांना अपंग करुन सोडून दिल होत म्हणजे "थिट" करुन सोडून दिले म्हणुन त्यांचे आजही "थिटे" असे अड़नाव पडले आहे.. तसेच तुळापुर येथे औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना हलहल करुन छळ करत शरीराचे तुकड़े करुन मारल्यानंतर...त्याप्रसंगी आता प्रतिकार करणे शक्य झाले नसल्यामुळे हतबल झालेल्या काहि शिर्के मंडळीनी आपल्या राजांचे अवयव गोळा केले म्हणून त्यांचे "वेचले" असे आडनाव पडले तर काहींनी त्यांचे अवयव शिवून एकत्र जोडले म्हणुन त्यांचे "शिवले" असे आडनाव पडले.. म्हणूनच तुळापुर येथे राजांचे "बलिदान स्थळ" व थोड़े दुरवर म्हणजे वढु- बुद्रुक या ठिकाणी शंभुराजांचे "समाधी स्थळ" आहे म्हणूनच या परिसरात आजही शिर्के मंडळी अर्थात शिवले व वेचले आडनावाची मंडळी आढळतात.
👉#स्वराज्यनिष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के यांच्या घराण्याविषयक थोडक्यात महत्वाची माहिती
|
|
|
#रामोजी उर्फ़ #गणोजी राजेशिर्के (एक अपत्य)
---------------------|-----------------------
#कान्होजी राजेशिर्के (पाच अपत्य- त्यातील एक पिलाजीराव)
|-----------|------------|--------------|-----------|
#पिलाजीराव राजशिर्केे (पाच अपत्य)
|----------------------|-------------------------|
1)वाघोजीराव 2)संभाजीराव 3) देवजीराजे
|-----------------------------------|
4)#गणोजीराव राजेशिर्के-5)#जिऊबाई उर्फ #येसुबाई
(शिवरायांचे जावई) (संभाजीराजांच्या पत्नी)
____________|___________
अनेक गमिनीकावे व ऐतिहासिक घडामोडी नंतर
|
राजेशिर्के+शिर्के+रिकामे+पडवळ+थिटे+शिवले+वेचले+ अन्य इतर ही असंख्य नवीन आडनावे बदलली गेली आणि ही सर्व मंडळी 1689 नंतर च्या काळानंतरच #कोकण,#शिरकाण #प्रदेश ,#संगमेश्वर, #बहादुरगड, #तुळापुर ,#वढु #बुद्रुक,सह इतर भागात आणि अखंड #महाराष्ट्रसह इतर #राज्यात #देशात #विदेशात विस्तारली गेली..!
👉 #वरील_ऐतिहासिक_अडनावांच्या अनेक घरांपैकी काही प्रमुख मोजकी प्रत्यक्षदर्शी घराण्यांचे वंशज खालील प्रमाणे*
👍संपूर्ण कोकण, शिरकाण प्रदेश, संगमेश्वर सह इतर भागात लाखो राजेशिर्के घराणे आताही आहेत/पूर्वीही होती त्यातीलच राजधानी सातारा येथील उपनगराध्यक्ष मा.सुहासजी राजेशिर्के, निशांतजी राजेशिर्के सह अन्य राजेशिर्के मंडळी वंशज आहेत
👍वाई जवळील पसरणीचे प्रसिद्ध उद्योगपती कै.'बी.जी.शिर्के' यांचे पूर्वी 'रिकामे' असे आड़नाव होते परंतु स्वतः बी.जी. शिर्के यांनी आपले आडनाव बदलून घेत पुन्हा शिर्के करुन घेतले त्यांचे घराणेही वंशज आहे म्हणूनच आजही "शिवप्रताप दिना" निमित्त किल्ले प्रतापगडावरील शिवरायांच्या मूर्तिवर कित्येक वेळा त्यांच्याच स्व- मालकीच्या हेलीकॉप्टर ने पुष्पवृष्टि झाली आणि होत असते.
👍 15 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वरला घनघोर युद्ध झाले होते पण दुर्दैवाने छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर ला कैद केल्यानंतर नगर जिल्ह्यातील पेड़गाव येथील किल्ले बहादुरगडावर (धर्मवीरगड) आणले असता मागावर असणारे राजेशिर्के मंडळीही आले होते त्यांचेच वंशज #शंभुसेना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकराजे शिर्के व मी, लक्ष्मीकांत शिर्के सह अनेक शिर्के घराणे आजही बहादुरगड तटबंदी लगत राहतात . अनेक शिर्के बहादुरगडाच्या (धर्मवीरगड) तटबंदी पर्यंत आले होते त्यातील काही शिर्के थेट गडामध्ये प्रवेश करत असताना प्रवेशद्वारातच पकडले गेल्याने त्यांच्या कत्तली झाल्या तर काही शिर्के मंडळींनी गुप्तपणे संभाजीराजांपर्यंत पोहचत, महाराणी येसुबाईंनी दिलेली महत्त्वाची माहिती सांगून काही लिखित खलीदेही दिले होते.
👍सातारा,कोल्हापुर येथील राजगादीचे वंशज छत्रपती भोसले घराण्याचे अनेक नातेवाईक व सगे-सोयरे मंडळी हे आजही शिर्के घराण्यातील आहेत.
👍ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'थिटे' असे पडले त्यापैकी एक प्रमुख वंशज घराणे म्हणजे माजी खासदार,माजी मंत्री मा.कै. बापूसाहेब थिटे यांचे होय.
👍वाई जवळील पसरणीचे भूमिपत्र व प्रसिद्ध वृत्तपत्र पवनेच्या प्रवाहचे संपादक व इतिहास लेखक शिवाजीराव शिर्के, पैठण,नागपुर, सह प्रत्येक जिल्ह्यातील ही अनेक शिर्के घराणे वंशज आहेत.
👍अ.नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याजवळील बहादुरगडापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर 'संपूर्ण गावच शिर्के घराण्याचे' आहेत (त्या काळातील छावण्या) तेही मंडळी वंशज आहेत.
👍संगमेश्वर ते बहादुरगड या मार्गावरील अनेक गावात शिर्के घराणी वंशज म्हणून आढळतात ( गुप्त माहिती मिळवण्याकामी ही मंडळी आलेली होती. )
👍ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'पडवळ' असे पडले आहे त्यातील अनेक वंशज शिर्के लोक पानशेत धरणा लगत मौजे शिरकोली, तालुका- वेल्हे येथेही राहतात त्यातील एक घर 'शिरकाई देवीच्या मंदिरात पुजारी' म्हणून काम पाहतात.
👍डेरवण येथील शिवसृष्टी चे व्यवस्थापक आबासाहेब शिर्के आणि इतर अन्य मराठा संघटनेचे राजेशिर्के ही आहेत
👍ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'कुंभार' असे पडले ते लोक 'कुंभारवळण' या गावात राहत असून त्यांची ज़ात मराठाच आहे हे विशेष होय.
👍तसेच तुळापूर, वढु बुद्रुक येथील अनेक शिर्के मंडळींचे आडनाव 'वेचले' आणि 'शिवले' अशी झाली असून हा इतिहास अनेक लोकानां माहित आहे याचेही पुरावे प्रत्यक्ष पाहायला मिळतात.
👍1689 नंतर समस्त शिर्के घराणे वैयक्तिक कामानिमित्त अवघ्या महाराष्ट्रासह, बाहेरील राज्यात- बडोदे व देशविदेशात स्थलांतरित झालेले दिसतात.
👍तसेच 1689 पूर्वी शिर्के आडनाव हे फक्त मराठा घराण्यातच असताना 1689 नंतर मात्र शिर्के हे आडनाव अनेक जातीत आढळतात त्या घराण्यांचे 'देवक' मरिक्ताचा वेल (समुद्र वेलवर्णी वनस्पती) एकच आहे ( त्यातील शिर्के लोकांनी गामिनी कावा करत थेट जातीवर्णीय व्यावसायिक वेशांतर करुन मोघलांच्या छावणीत नाभिक, गुरव, पालखीचे भोई,पखाल्या, कुंभार,आदि अनेक रूप घेतली असावीत तर्कशास्त्रनुसार...
#टिप:- #येसुबाईंच्या_नामकरणाचा_इतिहास--
👉पूर्वीच्या काळी पुरुषप्रधान सत्ता परंपरा असल्याने वंशावळी दर्शीवीतांनाही महिलांचा उल्लेख आढळत नाहीत तरी देखील पिलाजीराव शिर्के यांच्या कन्येचे नाव स्वताःच्या आईच्या नावाची म्हणजे पिलाजींच्या मातोश्री जिऊसाहेब शिर्के यांच्या आठवणीच्या स्मरणार्थ आपल्या लेकिचे नामकरण "जिऊ" असे केले होते म्हणूनच माहेर कडील नाव "जिऊबाई" असे होते परंतु शंभुराजांशी विवाह झाल्यानंतर आशीर्वाद देतानाच राजमाता जिजाऊ यांनी येसूबाई असे नामकरण केले होते ही एक ऐतिहासिक महत्वाची आठवण आहे.
👉 या सर्व माहिती वरुन एकच सिद्ध होते की, संभाजीराजांचे सख्खे मेहुणे गणोजीराजे शिर्के,त्यांचे इतर तिन्ही बंधु, गणोजीराजांच्या पत्नी (शंभुराजांच्या बहिण), सासरे पिलाजीराव शिर्के यांनी शेवट पर्यंत संभाजीराजांना वाचवण्यासाठी मोगलांविरुद्ध प्रतिकार करुन मोठी पराकाष्ठा केली असल्याचा हा प्रबळ पुरावाच आहे आणि विशेष म्हणजे राजेशिर्के घराण्यांचा महाराष्ट्रातील साधारणता 1500 वर्षा पासूनचा कणखर इतिहास पहिला तर त्यातील सुमारे 500 वर्ष शिर्के हे रायगडचे स्वामी होते म्हणजेच शिर्के घराण्यांची रायगडावर राजसत्ता होती इतक्या वर्षापासून राजेशिर्के कधीही धर्मांतर करुन मुसलमान झालेले इतिहासात उल्लेख अथवा संदर्भ दिसत नाही, राजेशिर्के घराणे किती हिंदुधर्म स्वाभामिनी होते हा पुरावाही निष्ठावंत असण्यासाठी महत्वाचा आहे.
👆छत्रपती शिवरायांची एक पत्नी शिर्के घराण्यातील होत्या, संभाजीराजांच्या पत्नीही शिर्के यांच्या होत्या, एवढेच नाही तर शंभुराजांच्या बलिदानानंतर शंभुपुत्र छत्रपती थोरले शाहूराजे यांची पत्नी ही राजेशिर्के घराण्यातीलच होत्या इतकेच नाही तर त्यानंतरही अनेक भोसले+राजेशिर्के सोयरिकी झाल्या हा पुरावा भक्कम नाही का ? म्हणूनच गणोजीराजे, पिलाजीराजे सह त्यांचे सर्व बंधु व समस्त शिर्के घराणे निर्दोष असून ते कट्टर स्वराज्यनिष्ठच असल्याचे सबळ पुराव्यानुसार निष्पन्न होत आहे..!
जय शंभुराजे..!
जय येसूबाई..!
जय गणोजीराजे..!
जय शंभुसेना..!
लेखन - लक्ष्मीकांत गणपतराव राजे शिर्के (पत्रकार)
एम.ए.बी.एड. (His + Gio ), इतिहास अभ्यासक,
ऐतिहासिक राजेशिर्के घराणे वंशज (बहादूरगड शाखा)
( मार्गदर्शक, प्रवक्ते, शंभुसेना सामाजिक संघटना)

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...