विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 January 2024

गोवेकर पोर्तुगीजाला धडा शिकवायचा चंगच त्यांनी बांधला, असे सरदार बाजी भिवराव रेठरेकर

 


गोवेकर पोर्तुगीजाला धडा शिकवायचा चंगच त्यांनी बांधला, असे सरदार बाजी भिवराव रेठरेकर...🙏🏼🚩
२४ जानेवारी १७३९ च्या,
तारापुरच्या मोहिमेत तोंडात गोळी लागून मृत्युमुखी पडलेल्या या योद्धयाचे खरे नाव भिवराव रेठरेकर.. परंतू जीवाची बाजी लाउन त्यांनी युद्धात पराक्रम गाजवला म्हणून बाजीरावांचे छोटे भाऊ चिमाजी अप्पा यांनी त्यांचा बाजी असा उल्लेख केला...
इ.स १७३४ मधील सिद्धीवरील बाणकोटच्या मोहिमेत बाजी भिवराव यांनी अतिशय पराक्रम गाजवला. तसेच इ.स १७३६ मधे बुंदेलखंड येथे चौथाई वसूल करण्याचे कामसुद्धा यांनी केले. भिवराव हे बाळाजी विश्वनाथ यांचे अतिशय खास सरदार त्यांच्या दोन्ही मुलांची नावे सुद्धा बाजीराव व चिमणाजी अशीच होती. त्यांच्या मृत्यूनंतर चिमाजी अप्पा यांनी बाजीराव पेशवे यांना लिहिलेल्या पत्रात ‘तारापुर घेतले.. फत्ते झाली परंतू बाजी भिवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी झाले परम दुःख झाले...’ अशाप्रकारे आपला शोक व्यक्त करतात...
तर त्यांच्या मातोश्री वेणुबाई यांना लिहिलेल्या पत्रात बाजीराव पेशवे म्हणतात, ‘माझा मोठा भाऊ गेला इथून पुढे आता मीच तुमचा बाजी...’
● सरदार रेठरेकर घराणे :
रेठरेकर घराण्याचे मूळ पुरुष भिवराव रेठरेकर हे रेठरेवड गावाचे कुलकर्णी. १६८०-८५ या सालात अर्थाजनसाठी आलेले हे घराणे काही कारणास्तव तळेगाव येथे राहिले. तेथेच तळेगाव च्या दाभाड्यांकडे त्यांना फडणीशी मिळाली. धनाजी जाधव व येसाजी दाभाडे यांचा उत्तम स्नेह असल्या मुळे बाळाजी विश्वनाथ ही तळेगावला येणेजाणेबकरीत. येथेच भिवराव रेठरेकर आणि बाळाजी विश्वनाथ यांची चांगली मैत्री झाली. बाळाजी विश्वनाथ हि जेव्हा कामानिमित्त दाभाड्यांकडे तळेगावला येत असत तेव्हा त्यांचा मुक्काम हा रेठरेकरांच्या घरीच असत. दोघेही हुशार व बुद्धिमान असल्याने कामात एकमेकांशी सल्लामसलत करत असल्याने दोघेही एकमेकांची योग्यता जाणून होते. पुढे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली आणि ते त्यांच्या कामात गुंतून गेले आणि भिवराव रेठरेकर हि आपल्या मूळ गावी आले आणि तेथेच कालांतराने मृत्यु पावले..
रेठरेकरांचे कुटुंब व भट पेशवे कुटुंब यांचा घरोबा निस्सीम होता, इतका की भिवराव रेठरेकर यांनी आपल्या मुलांचे नाव ही बाजी भिवराव आणि चिमणाजी भिवराव अशी ठेवली. हे दोघे भाऊ पुढे बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांच्या सोबत शेवट पर्यंत राहिले. दोघेही बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांचे बालमित्र. हे दोघेही भाऊ महापराक्रमी..!

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...