विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 31 January 2024

३१ जानेवारी १९४८ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे एक अपूर्ण स्वप्न साकार झाले.

 


३१ जानेवारी १९४८ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे एक अपूर्ण स्वप्न साकार झाले...🚩
भारत जरी १५ ऑगस्ट १९४७ ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाला असला तरी ब्रिटिशांचे मांडलिक असलेल्या सिद्दी नवाबाच्या जंजिरा संस्थानाच्या पारतंत्र्यातून मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन हे तीन तालुके मुक्त व्हायला ३१ जानेवारी १९४८ चा दिवस उजाडावा लागला...
१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने मुघल बादशहा कडून स्वतंत्र सनद मिळवून जंजिऱ्याची जहागीर मिळवली आणि मुघलांचे मांडलिकत्व पत्करले छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करुनही थोडक्यात जंजिरा हातातून निसटला त्यांना जर या मोहिमेसाठी पुरेसे आयुष्य आणि पुरेसा वेळ मिळाला असता तर त्यांच्यासाठी जंजिरा जिंकणे अशक्य नव्हते छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात जंजिरा येत आहे हे पाहून औरंगजेबाने त्याची फौज कल्याण भिंवडीच्या मार्गे रायगडाच्या दिशेने पाठवली त्यामुळे नाईलाजास्तव संभाजी महाराजांना रायगडावर परत यावे लागले मराठ्यांच्या हाती जाऊ नये म्हणून मोगल, इंग्रज, आणि पोर्तुगिजांसारख्या शत्रूंनाही एकत्र आणणारा जंजिरा हा बहुतेक एकमात्र किल्ला...
१८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर सिद्दी नवाबांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले पुढे १९४८ पर्यंत तो नवाबांच्याच ताब्यात होता १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर शेवटच्या नवाबाला सिद्दी मोहम्मद खान त्याचे नाव भारतात सामील होणे मान्य नव्हते त्याला जंजिरा संस्थान पाकिस्तानात न्यायचे होते विचार करून पहात सध्याच्या महाराष्ट्राचा एक भाग जर पाकिस्तानचा भाग बनला असता तर कसे चित्र दिसले असते आणि त्यात वर पेशव्यांची मूळ गावं श्रीवर्धन, मुरुड आणि म्हसळा...
२८ जानेवारी १९४८ रोजी म्हसळा तर ३० जानेवारी १९४८ रोजी श्रीवर्धन ताब्यात घेतले लोकांच्या दबावामुळे घाबरलेल्या नवाबाने ३१ जानेवारी १९४८ रोजी सामीलनाम्यावर सही केली आणि जंजिऱ्यावर तिरंगा फडकला...🇮🇳
———————————
📷 सह्याद्री प्रतिष्ठान

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...