विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 27 February 2024

|| शिवरायांची एक शपथ आणि त्यात शंभुराजांची कामगिरी. ||

 


|| शिवरायांची एक शपथ आणि त्यात शंभुराजांची कामगिरी. ||
शाहिस्तेखानाची फ़जीती केल्यानंतर मोगलांनी शिवाजी महाराजावर जयसिंघाची स्वारी रवाना केली. मोठा संघर्ष घडुन आला आणि शिवरायांनी जयसिंघाशी यशस्वी तह केला. पुढे औरंगजेबाला भेटण्यासाठी शिवरायांना आग्र्याला जावे लागले, हि घटना या प्रसंगी घडलेली आहे.
महाराज औरंगजेबाच्या जन्मदिवसावर त्याला भेटण्यास त्याच्या दरबारात गेले होते. दिवाने खास मध्ये गेल्यानंतर महाराजांना पान विडे दिले पण मानाची जागा आणि खिल्लात दिली गेली नाही. याचा महाराजांना फ़ार मोठा संताप आला कारण औरंगजेबाने शिवाजी महाराजांना मोठी मानाची जागा दिली होती पण त्याने तशे वचन दरबारात पाळले नाही. महाराज स्वाभीमानी व्यक्ती होते. त्यांनी भर दरबारात या बाबी विषयी संताप व्यक्त केला, या विषयी परकलदास लिहितो_ “उन दी(न) सालगिरह की जलूस का पान शाहजदा जी वगैरह उमरावां ने दिया, सु सेवा ने भी दीया। पाछै सरोपाव जलुस का शाहजादा ने व जाफ़र खां ने व राजा जसवंतसिंघ ने दिया। तव सेवो (शिवाजी राजे) दिलगीर हुवो, गुस्सो खायो, गलगली सी आंख्यां हुवो। सु पातशाह जी की नजरी आये। तब पातसाह (औरंगजेब) जी कंवर जी ने फ़रमायो "सेवा को पूछो "क्यों हो?" तब कंवर (रामसिंघ) जी सेवा काठो आया, तब सेवो कही "तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशाही देख्या। मैं एसा आदमी हों जु मुझे गोर करने खडा रखो। मैं तुम्हारा मनसीब (मनसब) छोड्या। मुझे खडा तो करीना सीर रख्या होता।" वैठा थे मरोड खाई उठी चालो। तब श्री महाराज कंवार जी हाथ पकड्यो सु हाथ भी छुडाई बगलाउ आणी वैठो। जठै कंवरजी फ़ेरी आनी समझायो, सु मानी नहीं; कही "म्हारो मरण आयो। यो तो तुम मुझे मारोगे, या मैं अपघात कर मरोंगा। मेरा सिर काट कर ले जावो तो ले जावो, में पातशाह जी की हजूरी नहीं चलता।"
अर्थ:- " त्या दिवशी बादशाहाचा जन्मोत्सव असल्याकारणानें पादशाहाजादे व उमराव यांना पानविडे दिले. त्यासोबत शिवाजीलाही दिले. सरोपाव शाहजादे व जाफ़र खां आणि राजा जयवंतसिंघ यांना(च) दिले. तेव्हां शिवाजीं हे पाहुन दिलगीर जाला व त्याला राग आला. डोळे लाल होऊन अश्रुहि भरले. हे बादशाहाच्या नजरेत आले. तेव्हा पादशाहाने कुमारला सांगितले की, "शिवाजीला विचार काय झाले?" तेव्हा कुंवर शिवाजी जवळ आला. तेव्हा शिवाजी म्हणाला. "तु पाहात आहेस, तुझ्या पित्यानेही पाहिले आहे, तुझ्या बादशाहानेही पाहिले आहे की, मी कसा मानुस आहे तरी मला दुसर्याच्या जागी उभे केले. मी तुमची मनसब सोडतो. मला उभेच करायचे होते तर माझ्या मानाच्या जागी समोर उभे करावयचे होते. तो नंतर ताबडतोब पाठ फ़िरवून (दरबारातुन) निघुन जात होता. तेव्हा श्री महाराज कुंवर जी (रामसिंघ) ने त्यांना हाथ पकडला परंतु शिवाजीने तो झिडकारून टाकला आणि एका बाजूला जाऊन बसला. तेव्हां कुंवरने जाऊन समजावन्याचा व दरबारात परत आनण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु शिवाजी ऐकण्यास तयार झाला नाही. तो म्हणाला "माझे मरण आले आहे. एक तर तुम्ही मला मारा नाही तर मी स्वत:ला मारीन. माझे डोके कापुन न्या पण मी बादशाहाच्या दरबारात येनार नाही." माझा जीवहि गेला तरी मी दरबारात जानार नाही, हि त्याप्रसंगी शिवरायांनी घेतलेली शपथच होती. औरंगजेबाने मुलतफ़ीखान, आकीलखान, मुखलिसखान यांना पाठुन माहाराजांना संम्मान देऊन दरबारात आनन्यासाठी पाठवले पण महाराजांनी तेही नाकारले. मला बादशाची मनसब नको आहे. मी त्याचा चाकर होनार नाही. तुम्हाला वाटत असेल तर माझा खुन करा किंवा कैद करा मी सिरोपाव घेनार नाही व बादशाहाच्या दरबारातही जानार नाही!
महाराजांची हि शपथ पुर्ण करने महाराजांसाठी फ़ार अवघड होते, पण त्यांनी ती पुर्ण करून दाखवली. या कामी शिवाजी महाराजांनी बाल शंभुराजांची मदत घेतली. महारजांवर दरबारात जाण्याचा बराच दबाव येत होता हे पाहुन महाराजांनी आपल्या जागी शंभुराजांना दरबारात पाठवले आणि शंभुराजांनी देखील औरंगजेबाच्या दरबारात आपली भुमीका योग्यरीत्या सांभाळली. अगदी सुरवाती पासुन ते शेवटपर्यंत शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधीच गेले नाही... सर्व जबाबदारी शंभुराजेच उचलत असत. शिवाजी महाराजांना आपली शपथ पुर्ण करण्यात फ़ार काही अडचन आली नाही कारण राजकारणाचा धुरंधर शंभुराजा या कारयात त्यांची साथ देत होता.
शिवाजी महाराजांनी शंभुराजांना बाल वयातच राजकारनातील घडामोडित नेहमीच अग्रेसर ठेवले होते. तसेच याही वेळेस महाराजांनी शंभुराजांनाच मुख्य भुमीका निभावण्याची जबाबदारी दिली होती, जी शंभुराजांनी योग्य रीत्या सांभाळली. पित्याच्या जीवावर आलेले संकट शंभुराजांनी आपल्या जीवावर लिलया पेल्ले हि काही साधी गोष्ट नव्हती. मराठा आज स्वत:ला स्वाभिमानी समजतात ते शिवरायांमुळे. पण शिवराय स्वत:चा स्वाभिमान टिकवुशक्ले ते शंभुराजांमुळे! हि बाब ध्यानात घेतली पाहीजे.
संदर्भ:-
Shivajis Visit to Aurangzib att Agra, Rajasthani Records_ J. Sarkar & R. Sinh
पुरन्धर की संधि_ राजस्थान राज्य अभिलेखागार, बीकानेर

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...