मोगल इतिहासकार खाफिखान सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या खालील वर्णनातून दिसून येते..
“समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजींची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजींशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजींच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे..”
युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत..
संदर्भ : मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध लेखक डाॅ.जयसिंगराव पवार.
――――――――――――




No comments:
Post a Comment