विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले.

 


सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे.
अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठ्यांनी चालूच ठेवला होता. मराठी सैन्य काही शांत बसले नव्हते. त्यांनी चिनाब, झेलम या मोठ्या नद्याहि ओलांडल्या. मराठ्यांनी रावळपिंडीही सर केले. मराठा फौजा सिंधू नदीच्या काठावर येऊन पोहचल्या. नदीच्या पलिकडच्या काठावर अटक किल्ला आहे. सध्या हा किल्ला पाकिस्तानात आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक बांधला होता. मराठी सैन्याने सिंधू नदीच्यावेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार करण्यात आला. मराठा फौज होडीच्या पुलावरून सिंधू नदी पार करून अटक किल्ल्यावर आल्या. किल्ल्यावर हल्ला करून अटक मराठ्यांनी काबीज केला. मराठा सैन्यानं अटकेपार झेंडा रोविला. मराठा साम्राज्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. १० ऑगस्ट १७५८
या मोहिमेमध्ये मराठा फौजेत त्यावेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे,तुकोजी होळकर अशी मातब्बर सरदार मंडळी होते. या अटक मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले होते. बिपाशा नदीतीरावरून सड्या फौजा मानाजी पायगुडे यांच्यासह पुढे रवाना केल्या. पेशवे दफ्तर २७ / २१८ यामध्ये याबाबतचे पत्र उपलब्ध आहे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...