"गड मे गड चितौड गड बाकी सब गढीया"
अशी ख्याती असणारा हा गड ज्यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी अवघ्या १८ दिवसात तो गडघेतला.पानिपतानंर मराठ्यांस गतवैभव अन मानाचे स्थान ज्यांनी मिळवून दिले ,प्रथम इंग्रज-मराठा युद्धात इंग्रजांना सळो कि पळो करून
सोडणारे,दिल्लीच्या तख्तावर सलग २५वर्षे भगवा फडकावून थोरल्या महाराजांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर
माधवराव सिंदे (महादजी शिंदे ),थोरल्या महाराजांचे स्वप्न पूर्णकरणाऱ्या या महान सरदारास मानाचा मुजरा .......
रियासतकारांनी महादजी शिंदे यांविषयी म्हटले आहे कि शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि महादजी शिंदेंनी तिच्यावर कळस चढवला..
महादजींची लष्करी प्रतिमानेपोलीयानाहून
कमी नव्हती,नेपोलियन एका लष्करी साम्राज्याचा एका बलाढ्य देशाचा प्रमुख होता.
महादाजींकडे यांपैकी काहीच नव्हते ..त्याना आयुष्यभर स्वकीयांच्या विरोधास सामोरे जावे लागले तो विरोध मोडून काढून त्याना त्यांचा मार्गकाढावा लागला..
त्यांनी जिंकलेला प्रदेशनेपोलीयानाने जिंकलेल्या परदेशाहूनवेगळा नव्हता..
महादजी जर युरोपात जन्माला आले
असते तर त्यांची प्रतिमा नेपोलियनहून थोर झाली असती..
त्यांच्या अलौकिक कारकिर्दीचे वर्णन करणारी कित्येक पुस्तके लिहिली गेली असती..
महादजी शिंदेंचा आंग्ल चरित्रकार कीन याने त्याना अठराव्या शतकात आशिया खंडात होऊन गेलेला सर्वात मोठा पुरुष
म्हणून संबोधले आहे.
आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे ह्या महान लष्करी नेत्याच्या आणि थोर मुत्साद्द्याच्या जीवनावर विशेष साहित्य उपलब्ध नाही..
महादाजींच्या शंभराव्या पुण्यतिथी दिनी बेळगावचे नातू प्रकाशित केलेले चरित्र यांनी लिहिलेले चरित्र हे मराठी साहित्यातील महादजींचे एकमेव
चरित्र आहे..
पानापाताच्या लढाईत महाराष्ट्राची एक संपूर्ण पिढी गारद झाली,महाराष्ट्रात एक लक्षबांगड्या फुटल्या.,पण शिंदे घराण्याला या लढाईचा जबरदस्त तडाखा बसला.,
महादजी शिंदे यांचे एक बंधू तुकोजी आणि पुतण्या जनकोजी हे दोघे पानिपतावर कामी आले,
बंधू दत्ताजी शिंदे हे अगोदर नजीबाच्या कट कारस्थानाला बळी पडलेहोते..आणि वडील बंधू जयाप्पा राजपुतांकडून दगाबाजीने मारले गेले होते..
नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंशकरायची शपथ घेतली आणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त
केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत हावेत भीरकावले. नजीबाचा नातू गुलाम कादर ह्यालाही महादजींनी यातनामय मरण देऊनत्याचा निर्वंश केला..
महादजींनी मराठ्यांच्या इतर शत्रुनासुद्धा चांगलेचवठणीवर आणले..
दिल्लीच्या बादशाहाला नामधारी बनवून
सगळ्या सत्तेची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली..
देशातील सर्व सत्तांना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याच्या कल्पनेचे ते जनक होते.,
यांच्याबाबत म्हणताना कर्नल म्यालेसन(malleson) म्हणतो..
It must never be lost sight of that great dream
of Mahadaji Sindia;s life was to unitew all the
nation powers of India in one Great Confedaracy
against The English. In this respect he was the
most far sighted statesman that India has ever
produced...
It was grand idea capable of realization by
Mahadaji but by him alone...
महादजींनी पानपताचा कलंक धुऊन
काढण्यासाठी अवघे जीवन वेचले..
ह्या अगोदर सुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानातकित्येकवेळा स्वारी केली होती पण कोणीही महादाजीं सारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही..महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून
जी दूरदृष्टी दाखवली त्याला तुलना नाही.
त्यांच्या ह्या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलनाच केली.तसाही त्या तथाकथितमुत्सद्द्यांनी पानपताचा पराभव गंभीरपणेमनाला लावून घेतलाच कुठे होतां.??
पानपतावरील सदाशिवभाऊंचे आणि विश्वासरावांचे रक्त वाळते ना वाळते तोच पुणे दरबाराने अब्दालीकडे मैत्रीचा तह केला..
१७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलातपुण्यास आली तिचा तळ अहमदनगर इथे पडला होता..
त्यांची पुणे दरबाराने उत्तम बडदास्त
ठेवली.. तिची व्यवस्था अजून चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल
ह्यांच्या नावे सनदा काढल्या:
" गणेश विठ्ठल यांचे नावे सनद कि गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उटे व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले
आहेत..
त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे
"
पुणेदरबाराने
अब्दालीच्या माणसांची चांगली सरबराई
केली शिवाय भद्रगज नावाचा हत्ती अब्दालीसनजर केला...त्याबद्दलची सनद
"गणेश विठ्ठल याचे नावे सनद कि, किले
अहमदनगर इथे भद्रगज हत्ती आहेव तो अब्दाली शाहास देविला.तरी राजश्री पुरुषोत्तम महादेव वकील यांजकडील कारकून येईल त्याचे स्वाधीन करून
पावालीयाचे काबाज घेणे म्हणून सनद
संदर्भ (सनदा , पत्रे आणि याद्या माधवराव पेशवे १)
असा नामुष्कीजनक समजौता जगात कोणीच केला नसेल ..मराठ्यांनी पानिपतावर स्वत:चे कपाळ फोडून घेतले असले तरी गिलच्याला सुद्धा त्यांनी गुडघ्यावर आणले होते..अब्दालीची ग्वाल्हेरमध्ये उतरायची हिम्मत
नव्हती..मग पुणे दूरच राहिले असते.पानापाताच्या पराभवानंतरही माळव्यात मराठ्यांच्या मजबूत शिबंद्या तळ ठोकून होत्या पानापातावरून जीव
वाचवून परत आलेल्या मराठा सैनिकांना त्यांनी सामावून घेतले होते...त्यांचा धाक अब्ब्दालीला होताच .शिवाय शिखानीही अब्दालीच्या परतेच्या वाटेवर जागोजागी अडथळे आणून त्याच्या नाकी नऊआणले
होते..पण पुणे दरबारातील तथाकथित
मुत्सद्द्यांना अब्दालीशी तह करण्याची घाई झाली होती, म्हणून त्यांनी हा अपमानास्पद तह केला...
असे स्वाभिमानाशुन्य आणि अदूरदर्शी धोरण पुणे दरबारानेमराठ्यांच्या इतर शत्रूंशीही ठेवले ..नजीबनेमराठ्यांचा सर्वनाशकरायची प्रतिज्ञा केली होती त्या नजीबाशीही पुणेदरबाराने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले..नजीबामुळे शुक्रतालावर
दत्ताजीची जशी कोंडी झाली होती..तशी दुआबात मराठ्यांची कोंडी करण्याचा नजीबाने घट घातला पण महादाजींच्या दक्षतेमुळे तो डावमराठ्यांनी हाणून पाडला...
पुणे दरबाराने केलेल्या घोडचुका निस्तरता निस्तरता महादजीच्या नाकी दम आला पण पुण्यातील मुत्सद्द्यांनी कधीच
स्वत:ची चूक मान्य केली नाही आणि त्यांचा पदोपदी अपमान केला ..
पुणे दरबाराच्या ह्या मत्सरग्रस्त वृत्तीवर
सर जदुनाथ सरकार यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत..
"These records prove that in establishing
Maratha control over The Imperial Government
of Delhi and wiping off the disgrace of Panipat,
Mahadaji Sindia Had to Labour alone, nay in the
teeth of pin-pricks and covert opposition by the
court of poona.. and armed help in his sorest
need and insulted him in public..He was called
in Poona Governments letters a cheat, a disloyal
Governments letters a cheat,a disloyal servant, a
selfish upstart....All this Mahadji bore with
infinite patience, just he broke through the
successive nets of intrigue woven around him by
his foreign enemies and nominal allies .He
triumphed in the end....
He Towers over Maratha History in solitary
grandeur a ruler of India, withought any ally,
withought a party, without even able and
reliable civil and diplomatic service..."
जदुनाथ सरकार म्हणतात :"
नाना फडणीसांनी ज्याना त्यांचे चाहते
मराठी Machiavelli म्हणतात त्यांनी Machiavelli चा अर्धा देशाभिमान दाखवून महादजी शिंदे यांना मदत
केली असती महादाजींची पदोपदी अडवणूक केली नसती तर महादजींनी ५ वर्ष अगोदरच दिल्लीवर कब्जा केला असता...आणि इंग्रजाना कलकत्त्याच्या समुद्रात लोटले असते... तसे झाले असते तर महादजी अजून काही वर्षे जगले असते आणि इंग्रजांचे राज्य ह्या देशावर कधीच आले नसते...
पण नाना फडणीसांनी मत्सरी वृत्तीने
महाद्जींच्या मार्गात अडथळे निर्माण केले.."
संदर्भ :- १)सनद १ (सातारा महाराज व
पेशवा दैनंदिनी )
२)सनदा , पत्रे आणि याद्या माधवराव पेशवे

No comments:
Post a Comment