विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

२३ फेब्रुवारी १७३९ “किल्ले रेवदंडा”..

 


२३ फेब्रुवारी १७३९ “किल्ले रेवदंडा”...

🚩
एक डच आरमार फेब्रुवारी १७३९ मधे गोव्याजवळ आले होते. व्हॉईसरॉयने रेवदंडा डच सत्तेला देण्यास कबूल केले व मराठ्यांविरुद्ध मदत मागितली. पण डच नी नकार दिला. मानाजी आंग्रे यांनी २३ फेब्रुवारी १७३९ रोजी रेवदांड्यावर झडप घातली. मोर्चे लावले ते पोर्तुगीजांना भारी पडले व उडवून लावले पण मानाजी आंग्रे ह्यांनी जिद्द काही सोडली नाही. उलट एप्रिल १७३७ मधे रेवदांडा पडकोट जिंकला व स्वराज्यात आणला आणि मराठ्यांचे वर्चस्व चालू ठेवले. हे बघून पोर्तुगीज सत्ता कमजोर झाली व त्यांनी पार वसईच्या शरणागती नतंर हयातीत ठेवलेले किल्ले होते फक्त दिव दमण...
२५ नोव्हेंबर १७४० रोजी तहानुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांना कुंकळली व असोळणे हि साष्टीतील दोन गावे दिली आणि त्याबद्दल पोर्तुगीजांकडून रेवदांडा कोट ( चौल ) व कोरलाई किल्ला ( castle curlew ) हे समोरा समोर चे दोन किल्ले स्वराज्यात परत शामिल करून घेतले...
१९ डिसेंबर रोजी चिमणाजी बल्लाळ प्रधान रेवदांड्यावर वर्चस्व गाजवायचे म्हणून निशाण चढविले पण आंग्रे घराणं हे समुद्रावरची शिवरायांची स्वाभिमानी मराठा सत्ता असून पेशव्यांचे वर्चस्व समुद्र किनाऱ्यावर त्यांना नको होते.. (रेवदांडा व कोरलाई किल्ले हे माझे किल्ले आहेत आणि आपण श्रीमंतास एकंदर देत नाही आणि आयुष्यात कधी देणार हि नाही त्यामुळे आम्ही स्वता सर्वस्वास उदक घातले आहे) अशी पवित्रा आंग्रेंनी घेतला.. हा आंग्रे घराण्याचा दरारा कुठल्या हि समुद्रावर हुकूमत चालू करणाऱ्या सत्तेला भारी पडला पण दुसरे बाजीराव पेशवे परत रेवदांडा घेण्यास तय्यार झालेले तरीपण त्यांना किल्ला हासील झाला नाही १८०६ मधे परत इंग्रजांच्या ताब्यात येत असताना आंग्रे ह्यांना मोहिमेवर असलेलं कळालं तेव्हा त्यांनी पुन्हा झडप घालून इंग्रज कापले व १८१७ पर्यंत स्वराज्यात आणला आंग्रे ह्यांनी तेव्हा लगेच गोपाळ शेणवी यांना रेवदांडा व कोरलाई ह्याचे सुभेदार पद दिले....
(दुर्ग- सतीश अक्कलकोट).
――――――――――――
📷 @animeshkshatriya ♥️🔥

No comments:

Post a Comment

“बसरूर स्वारी”

  २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी १६६५... बखरीतील जळपती सर्जा शिवछत्रपतींची, “बसरूर स्वारी”.... इ.स.१६६५ च्या फेब्रुवारी महिन्यात शिवाजी महार...