त्यागमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवराय हे त्यागमूर्ती होते. त्यांनी त्यागाची परिसीमा गाठली होती. शिवरायांची त्याग करण्याची शक्ती अफाट होती, परंतु त्याचबरोबर त्यामध्ये सुसंगतता होती. आयुष्यात एकदाच कोणता तरी त्याग करून पुढचे संपूर्ण आयुष्य त्यांनी रयतेकढून सहानभूती मिळवली नाही तर जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर त्यांनी फक्त त्यागच केला. अनंत त्याग केल्या शिवाय चांगली गोष्ट प्रत्यक्षात उतरत नाही. शिवरायांनी जर दुसरा मार्ग निवडला असता, ज्यामध्ये त्यांनी कोणत्यातरी त्यावेळच्या शासकाची चाकरी केली असती तर कदाचित ते खूप सुखी, समृद्ध व आरामदायी जीवन जगू शकले असते. परंतु, त्यांनी या सर्वांचा त्याग केला व दुसरा मार्ग स्वीकारला जो देश भक्तीकडे जात होता. शिवरायांबरोबर त्यांच्या प्रत्येक सहकाऱ्याने हीच भूमिका स्वीकारली. शिवरायांनी हा मार्ग स्वीकारला कारण त्यांना देशाला स्वतंत्र करून, देशाची महानता आणि स्वाभिमान टिकवायचा होता. शिवरायांच्या या कार्यामुळेच महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि त्याचबरोबर भारतातल्या इतर राज्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली. पुढे ते म्हणतात, नुसताच आपल्या प्राचीन महानतेचं उदो-उदोकरून काहीच उपयोग नसतो, तर त्या महानतेला आधुनिक महानतेच्या प्रकाशाकडे घेऊन जाणे महत्वाचं असतं, कोणतीही परंपरा, संस्था, श्रद्धा, अंधश्रद्धा अशा गोष्टी जर देशाच्या प्रगतीपुढे आडव्या येत असतील तर त्या आपण बाजूला केल्या पाहिजेत. जे शिवरायांनी त्यावेळी केले, 'शिवरायांचा अभ्यास करत असताना जर आपण त्यांच्या जीवनाचे हे निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवले तर तुम्ही व तुमचे राष्ट्र हे जगाच्या पातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही'...
―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #छत्रपतीशिवाजीमहाराज
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #त्यागमुर्ती

No comments:
Post a Comment