विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2019

राजाभिषेक का ? कशासाठी ?

राजाभिषेक का ? कशासाठी ?
शिवाजी महाराजांनी आपल्या छोट्या जहागिरीचे राज्यात रूपांतर केले.
बलाढ्य फौज जमविली, आरमार बांधले, राज्यकारभार यंत्रणा उभारली, हिरे, माणके, सोने यांची अगणित संपत्ती जमा केली, तरी कायदेशीर दृष्ट्या ते सामान्य जहागीरदार होते,
ज्यांच्यावर ती राज्य करीत होते त्यांची राजनिष्ठा ते मिळू शकत नव्हते.
महाराजांच्या देणग्यांना, त्यांच्या वतनपत्रांना किंवा त्यांनी केलेल्या करार-मदारांना कायदेशीरपणा प्राप्त होऊ शकत नव्हता.
एक राजांची राजवट गेली आणि दुसऱ्या राजांची राजवट आली तरी नवा राजा पूर्वीच्या राजवटीतील इनामपत्रे करारनामे प्रमाण मानतो.
महाराजा संबंधी ते अभिषिक्त राजे नसल्याने ही अडचण होती.
एवढेच नव्हे तर हिंदू राजनीती शास्त्राच्या दृष्टीने जोपर्यंत ते राजपद स्वीकारत नव्हते तोपर्यंत त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर राज्य करण्याचा ही नैतिक व शास्त्रीय हक्क त्यांना प्राप्त होत नव्हता.
तसेच कर वसूल करणे, नवे कर जारी करणे, न्यायदान करणे, शिक्षा करणे इत्यादी राज्यकारभाराच्या बाबींनाही महाराजांनी राजपद निर्माण न केल्याने कायदेशीरपणा नव्हता.
चातुर्वर्ण्य पद्धतीत फक्त राजेच ब्राह्मण गुन्हेगारांना शिक्षा करू करत असे.
परंतु आतापर्यंत राज्याभिषेक न झाल्याने ब्राह्मण गुन्हेगारांची प्रकरणे न्यायदानासाठी ब्रह्म सभेकडे अथवा आपल्या पंडितराव या मंत्र्यांकडे महाराजांना सोपवावी लागत. अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी महाराजांच्या राज्याभिषेकाचे आवश्यकता भासत होती...!

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...