विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2019

दुरदृष्टी असलेला रयतेचा राजा " राजर्षी शाहू पुत्र छत्रपती तिसरे राजाराम महाराज " बाल विवाह प्रतिबंधक कायदा -


दुरदृष्टी असलेला रयतेचा राजा " राजर्षी शाहू पुत्र छत्रपती तिसरे राजाराम महाराज "
बाल विवाह प्रतिबंधक कायदा -
भारतीय संस्कृती मध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या प्रमाणे काही अनिष्ठ रूढीही आहेत . त्या पैकी एक म्हणजे बालविवाहाची प्रथा होय. अगदी लहान वयात मुला मुलींची लग्ने होत होती. राजाराम महाराजांनी कोल्हापूर संस्थानात पासुन बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. हा कायदा कोल्हापूर संस्थानातील सर्व धर्माच्या व जातींच्या लोकांना लागू करण्यात आला. या कायद्यानुसार मुलींचे विवाहाचे पूर्ण वय 12 वर्षे व मुलाचे पूर्ण वय 16 वर्षे करण्यात आले.
बालविवाह कायद्याच्या अंमलबजावणी करिता जे नियम केले, त्या मध्ये अधिक मजकूर घालून 6 जुलै 1926 रोजी कोल्हापूर गॅझेट मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्या मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या विरुध्द लग्न करेल त्यास रूपये 25 दंड म्हणून वसूल करण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट यांना देण्यात आला.
राजाराम महाराजांनी कोल्हापूर संस्थानात बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला ती तारीख होती -
11 जुन 1926.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...