विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 March 2020

किल्ले रायगडावर असणाऱ्या लोहस्तंभाचे रहस्य

रायगड किल्ला वरील लोहस्तंभ.
फोटो स्रोत : Google
रायगड किल्ल्यावर एक लोहस्तंभ आहे .त्या लोहस्तंभा बद्दल अनेकांची वेगवेगळी मते आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की शिवाजी महाराजांनी जो हत्ती आणला होता त्या हत्तीला बांधन्यासाठी तो लोहस्तंभ उभारला होता .पण हत्तीला कधीही लोहस्तंभाला बांधले जात नाही.त्यामुळे तो हत्तीसाठी नव्हता आसे वाटते. काही लोक ही सुर्य घटी आहे म्हणतात.सुर्य घटी म्हणजे त्या वेळीचे घड्याळ.त्या लोहस्तंभाची सावली वरून वेळेचा आदाज लावला जायाचा .पण ज्या ठिकाणी तो लोहस्तंभ उभा केला आहे, तेथे ऊनपडण्यासाठी बराच वेळ जातु कारण समोर बाजार पेटेची भित आहे.त्यामुळे हा स्तंभ सुर्य घटी ही नसावी.सुर्य घटीजर उभी करायाची आसेल तर ती होळीच्या माळा वर केली आसते कारण तेथे कायम ऊन येथे त्या ठिकाणी सुर्य घटी उभा केली आसती.आणि जर ती सुर्य घठी आसते तर त्याला कढी वर बसवली गेली नसते.
काही लोकांनचे म्हणूने आहे की तो मल्लखांब आहे पण काही जन म्हणतात मल्लखांब शिवकाळात खेळला जात नव्हता . तो यादव काळात नामशेष झाला होता त्याची पुनर्स्थापना 1785 ला बाळंभट देवधर ह्यांनी पुण्यात दुसऱ्या बाजीरावाच्या प्रोत्साहनात केली .तर काही चे म्हणने आहे की शिवकाळात मल्लखांब नव्हते कारण कान्होजी आंग्रे यांनी जहाजावर व्यायाम करता यावा म्हणून मल्लखांब शोधला आसे म्हणतात.आणि मल्लखांब लोखंडी कधीच नसतो त्यामुळे तो मल्लखांब ही नव्हता. आसे म्हणता येवू शकते.
तर काही वेक्ती म्हणातात कि तो महाराणीसाहेब पुतळाबाई ह्यांची सती गेल्याची यादगीर म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी हा खांब उभारला आणि म्हणून त्यास सतीचा खांब असे नाव पडले . छावा कादंबरी मध्ये देखील असाच काहीसा उल्लेख आढळतो . पण सती गेल्याची यादगीर म्हणून कोणी कधी खांब उभा करण्याचे कुठेच पाहण्यात आलं नाही . त्यामुळे हा सतीचा खाब नसावा आसे वाटते.
आनेक लोकांनचे म्हणने आहे कि त्या जागी फटक्यांची शिक्षा देण्यासाठी तो लोहस्तभ उभारला आहे. व हा आदाज सर्वात योग्य वाटतो.कारण त्या लोहस्तभाला जी कढी केलेली आहे. कैद्यांला शिक्षा देताना त्याचे हात त्या कढीला बाधून त्याला फटक्यांची शिक्षा दिली जात आसावी. त्यामुळे त्या लोहस्तभाचा वापर फटक्यांची शिक्षाच देण्यासाठी केला जात आसवा.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...