विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 March 2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे पाईक सेनापती कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर कुटुंबांने मराठा साम्राज्यासाठी दिलेले असीम बलिदान



छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे पाईक सेनापती कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर कुटुंबांने मराठा साम्राज्यासाठी दिलेले असीम बलिदान
या महाराष्ट्र साठी ,हिंदू धर्मासाठी फक्त शिवाजी महाराजांचे कुटुंब खर्ची नाही पडले ,आणखी एक कुटुंबाने स्वतः कर्ता पुरुष (सेनापती ), आणि त्यांच्या चार मुलांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि संपवले पण आज त्यांचा साधा उल्लेख ही कुठे कोण करताना दिसत नाही
दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही
ते म्हणजे स्वराज्याचे पाईक सेनापती कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर !
गुजर कुटुंबाने आपले सर्व काही या महाराष्ट्राच्या साठी असीम त्याग केला याची कुठेच तोड नाही ,या गुजर कुटुंबाची तेवढीच वाताहात झाली जेवढी शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची पण झाली.
कुडतोजी गुजर उर्फ प्रताप राव गुजर स्वराज्याचे सेनापती, असंख्य लढाया मध्ये मराठ्यांना विजय मिळवून दिला.वेडात वीर दौडले सात मधील हे पहिले.नेसरी च्या मैदानात आज पण यांची समाधी डौलाने उभी आहे.पण त्यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबांची शिवाजी राजांच्या कुटुंबसरखे हालहाल झाले .
प्रतापराव गुजर यांना चार अपत्य
  1. पहिलं अपत्य जानकीबाई जी प्रतापरावांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस अगोदर राजाराम महाराज बरोबर लग्न लावले.
1689 मध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि रायगडला इतिहादखान उर्फ झुल्फिकारखान चा वेढा पडला .झुल्फिकारखान च्या वेढ्यातून राजाराम महाराज आणि त्यांच्या तीन राण्या ताराबाई राजसबाई अंबिकाबाई शिवाय प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ संताजी धनाजी सर्व आरामात निसटून गेले .मात्र प्रतापराव गुर्जर यांची कन्या आणि राजाराम महाराजांची पहिली राणी जानकीबाई ह्या येसूबाई आणि शाहू महाराजा बरोबर मुघलांच्या तावडीत सापडले.तिथून जानकीबाई चा मुघल कैदेतच अंत झाला.कारण 1719 ला बाळाजी पेशवानी येसूबाई ला सोडवले त्यात त्यांचे नाव नव्हते.
औरंगझेबाने शाहू महाराजांना आणि येसूबाई आणि जानकीबाई ला कैदेत ठेवले, मात्र औरंग्याची मुलगी झेबुनिस्सा ने मात्र त्यांची काळजी घेतली.औरंग्याने अनेकदा शाहूमहाराजना मुस्लिम होण्याची सांगितले त्यावेळी झेबुनिस्सा ते टाळले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलाला युवराज शिवाजी ऊर्फ शाहू महाराजांच्या धर्मांतर करण्यासाठी बादशहा औरंगजेब यांना सन 1700साल आदेश दिला दिले तेव्हा पण महाराणी येसुबाई यांनी ज्योतोजी आणि झेबुनिस्सा द्वारे बादशहा शी अप्रत्यक्ष तह केला ज्यात औरंगजेब यांना एक अट वर शाहू महाराजांच्या धर्मांतर रहीत किंवा रद्द केले" तो बोलला...
मी निश्चित केला तो मोडल्यास माझ्या शब्दाची किंमत जाते, बादशहाचा उच्चार लटका पडता नये, तर एक युवराज शाहु ऐवजी दुसरे दोन प्रसिद्ध पुरुष मुसलमान होत असतील तर मी शाहुपुरता आपला हुकुम मागे घेतो।।
2) दुसरा आणि तिसरा अपत्य खंडेराव गुजर आणि जगजीवन गुजर
सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर आता आपल्या राजाच्या (शाहू) बचावासाठी आले, 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजानी कधी विसरले नाही . (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनीबलक्षात घायवे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बहीण राजाराम महाराजांची राणी होती)
" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रे मधुन दिसते
खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला.
3)चौथा अपत्य मुलगा सिधोजी गुजर
हे धाकटे अपत्य मात्र मराठांच्या आरमार आणि नंतर औरंगझेबविरुद्ध यांनी प्रचंड कामगिरी केली.कान्होजी आंग्रे आधी सिधोजी गुजर यांचे सहाय्यक होते.1690 नंतर कैक वर्ष मराठ्यांचे आरमार मधून त्यांनी कोकण पट्टीवर मराठ्यांचा धाक ठेवला.त्यांना सरखेल ही पदवी राजाराम महाराजांनी दिली , मात्र त्यांचा ही अंत लवकर झाला आणि पुढी सरखेल कान्होजी आंग्रे झाले.(बहुतेक १६९८)
4)पानिपतच्या युद्धात सुद्धा यांचे अनेक वीर कामी आले.
5) 1850 नंतर रघुनाथ गुजर हे त्यांच्या वंशजांचे एक जण त्याकाळी तत्कालीन सातारा चे शिवाजी महाराज यांचे वारस प्रतापसिंग याना मदत केली.आजही सज्जनगड जवळ कामठी गावात प्रतापरावांचे वंशनज भाऊसाहेब हैबतराव गुजर राहतात आणि त्यांची मुस्लिम वंशनज अमिनसाहेब देशमुख पण राहतात.आता कामाघी गाव धारणात गेले
6) वेडात मराठे वीर दौडले सात महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश असताना युद्धात मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला सह्याद्री मध्ये घाईला आणले . बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी बहलोलखान च्या गोड बोलण्याला पाघळला . प्रतापरावांनी त्याला माफी दिली तो जीव वाचवून गेला.शिवाजी महाराजांना खबर पोहोचली,“प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” तेंव्हा राजांनी प्रतापरावाना खडसावले " सला काय निमित्य केला " बेहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. २४फेब्रुवारी १६७४ हाच तो दिवस. नेसरी जवळ बेहलोलखान होता हेराला त्यांनी सैन्याकडे पाठवले . आणि सैन्याला स्वारीचे हुकूम दिला. पण सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. हे सात शिपायी म्हणजे प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होते .
काहींना तो आत्मघात वाटेल पण केवळ मृत्यूवर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक "पराक्रम पर्व" आहे, जे इतिहासात कुठेच सापडणार नाही . प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. स्वराज्याची खूप मोठी नुकसान झाली.
शिवाजी महाराज आणि कडतोजी ची भेट झाली कशी?
कडतोजी गुजर हे आपल्याच गावातून मुघलविरुद्ध लढा द्यायचे , एके दिवशी मुघलांच्या खजिन्यावर दोन मराठा वाघांनी एकदम धाड टाकली, शिकार तर मारली पण आता हक्काची वेळ आली, तेंव्हा यातील एक वाघाने म्हणजे शिवाजी महाराजांनी दुसऱ्या वाघाला म्हणजे कडतोजी ला स्वराज्याची संकल्पना सांगितली आणि स्वराज्यात सामील करून घेतले.[1]

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...